शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

हुशारीने खेळी खेळणाऱ्या राजकीय शक्तींना सलामच ठोकणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 20:56 IST

संमेलन अर्थकारणामुळे वादात सापडले आणि स्वागताध्यक्षांच्या दबावाखाली आयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले असा घणाघाती आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे.

ठळक मुद्देडॉ. श्रीपाद जोशी यांचा सवालस्वागताध्यक्षांचाही पलटवार

प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : संमेलन सुरळीत पार पडत असल्याचे चित्र वरवर पहायला मिळत असले तरी वादाची धगधग अद्याप कायम आहे. संमेलन अर्थकारणामुळे वादात सापडले आणि स्वागताध्यक्षांच्या दबावाखाली आयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले असा घणाघाती आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे. दुसरीकडे, आपण सहिष्णू आहोत, अशी भूमिका घेत स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री मदन येरावार यांनी पलटवार केला आहे. त्यामुळे वादामागचा नेमका सूत्रधार कोण, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.अरूणा ढेरे यांनी भाषणात हुशारीने खेळी खेळणाºया शक्तींचा जो उल्लेख केला, त्या शक्तींना सलाम करायचा, त्यांना उघड करायचे की सगळ्यांना सगळे ठाऊक असूनही सामूहिकरीत्या दुर्लक्ष करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे, असे मत डॉ. श्रीपाद जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.नयनतारा उपस्थित राहिल्यास संमेलन उधळून टाकण्याचा इशारा मनसेच्या स्थानिक नेत्याने दिला आणि वादाची पहिली ठिणगी पडली. आयोजक आणि महामंडळ अध्यक्ष यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना अचानक जोशी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. चूक आपली नसली तरी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण राजीनामा देत असल्याचे डॉ.जोशी यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात, या घटनेचा कर्ता-करविता कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे.संमेलन संपेपर्यंत माध्यमांशी संवाद साधणार नाही, अशी भूमिका घेतलेली असतानाच डॉ. श्रीपाद जोशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'घडलेल्या घटनेला स्वागताध्यक्ष जबाबदार आहेत', असा आरोप केला आहे. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले नाही, तर संमेलनाच्या अर्थकारणावर परिणाम होईल, असे एकीकडे सांगण्यात आले आणि दुसरीकडे सर्व घटनेचे खापर महामंडळाच्या अध्यक्षांवर फोडले, ही लाजीरवाणी घटना आहे’, असेही ते म्हणाले.विश्वसनीय सूत्रांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, नयनतारा यांचे निमंत्रण रद्द केल्यास काय परिणाम होऊ शकतात, याबाबत पूर्वकल्पना दिली होती. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसळकर यांच्या मध्यस्थीने आयोजक समितीने निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि नयनतारा सहगल यांना खेद व्यक्त करणारे पत्र पाठवायचे, असे ठरवण्यात आले. यावेळी झाल्या प्रकाराचे काय पडसाद उमटू शकतात, याची कल्पना आणि त्यातील भीषणता याबाबत जोशी यांनी आयोजक समितीला कल्पना दिली होती. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावरही आयोजकांना भूमिका बदलता येणे शक्य होते. मात्र, आगामी निवडणुकांचा माहोल लक्षात घेऊन सहगल याचे भाषण विपरित परिणाम साधणारे ठरू शकते, असे वाटल्याने आयोजकांवर स्वागताध्यक्षांनीच दबाव टाकला. नयनतारा व्यासपीठावर आल्यास संमेलनासाठी एक पैसाही मिळणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे समजते. संंमेलनातील अनेक सहभागी निमंत्रितांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतर आयोजकांनी महामंडळाशी संवाद साधणेच बंद केले. त्यामुळे राजकीय दबाव हेच यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.हा आगळावेगळा जीवनानुभव हीच लेखकांची उर्जा असते. कोणी डावा, कोणी उजवा ठरवल्याने माझे मला ठाऊक असलेले मूल रूप मलिन, प्रदूषित न होऊ देता मी ते व्यवस्थित जपलेले आहे. तुकाराम वाचून कळत नाही. तो असे जगून कळतो, हे कळायला सहकार्य हा अनुभव देणाऱ्यांनी केले आहे. अरूणा ढेरे यांनी हुशारीने खेळी खेळणाऱ्या अशा शक्तींचा जो भाषणात उल्लेख केला, त्या शक्तींना सलाम करायचा, त्यांना उघड करायचे की सगळ्यांना सगळे ठाऊक असूनही सामूहिकरीत्या दुर्लक्ष करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. वेड पांघरून साऱ्यांनाच पेडगावलाच अजूनही जाण्याचीच इच्छा कायम असेल तर ती ज्याची त्याला लखलाभ असो.- डॉ. श्रीपाद जोशीसहगल यांचे निमंत्रण रद्द होण्याबाबत डॉ. श्रीपाद जोशी यांनी सुरुवातीला मनसेला, नंतर आयोजकांना जबाबदार धरले. आयोजकांनी निमंत्रण परस्पर रद्द केले असे आधी जोशी म्हणाले, मग आपण केवळ इंग्रजी मसुदा लिहुन दिल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर मी आयोजकांवर राजकीय दबाव टाकल्याचा आरोप जोशी यांनी केला. कोणा-कोणावर आरोप करायचे आहेत, याची यादी एकदा त्यांच्याकडून मागवून घ्यायला हवी.यवतमाळमधील संमेलन हे येथील लोकांसाठी गौरवास्पद बाब आहे. कोलते यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. संमेलनाचे निश्चित झाल्यानंतर मी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. स्वागताध्यक्षपदही भूषवण्याचा माझा आग्रह नव्हता. संमेलनामध्ये कोणाला बोलवावे, कोणाला बोलवू नये यामध्ये मी पहिल्यापासून हस्तक्षेप केलेला नाही. संमेलनाच्या पूर्वी सर्व प्रक्रिया सुरू असताना जोशी यांनी माझ्याशी एकदाही संवाद साधलेला नाही. त्यामुळे एकूणच निमंत्रण रद्द करण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग नाही.- मदन येरावार, स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन