शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

हुशारीने खेळी खेळणाऱ्या राजकीय शक्तींना सलामच ठोकणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 20:56 IST

संमेलन अर्थकारणामुळे वादात सापडले आणि स्वागताध्यक्षांच्या दबावाखाली आयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले असा घणाघाती आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे.

ठळक मुद्देडॉ. श्रीपाद जोशी यांचा सवालस्वागताध्यक्षांचाही पलटवार

प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : संमेलन सुरळीत पार पडत असल्याचे चित्र वरवर पहायला मिळत असले तरी वादाची धगधग अद्याप कायम आहे. संमेलन अर्थकारणामुळे वादात सापडले आणि स्वागताध्यक्षांच्या दबावाखाली आयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले असा घणाघाती आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे. दुसरीकडे, आपण सहिष्णू आहोत, अशी भूमिका घेत स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री मदन येरावार यांनी पलटवार केला आहे. त्यामुळे वादामागचा नेमका सूत्रधार कोण, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.अरूणा ढेरे यांनी भाषणात हुशारीने खेळी खेळणाºया शक्तींचा जो उल्लेख केला, त्या शक्तींना सलाम करायचा, त्यांना उघड करायचे की सगळ्यांना सगळे ठाऊक असूनही सामूहिकरीत्या दुर्लक्ष करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे, असे मत डॉ. श्रीपाद जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.नयनतारा उपस्थित राहिल्यास संमेलन उधळून टाकण्याचा इशारा मनसेच्या स्थानिक नेत्याने दिला आणि वादाची पहिली ठिणगी पडली. आयोजक आणि महामंडळ अध्यक्ष यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना अचानक जोशी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. चूक आपली नसली तरी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण राजीनामा देत असल्याचे डॉ.जोशी यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात, या घटनेचा कर्ता-करविता कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे.संमेलन संपेपर्यंत माध्यमांशी संवाद साधणार नाही, अशी भूमिका घेतलेली असतानाच डॉ. श्रीपाद जोशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'घडलेल्या घटनेला स्वागताध्यक्ष जबाबदार आहेत', असा आरोप केला आहे. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले नाही, तर संमेलनाच्या अर्थकारणावर परिणाम होईल, असे एकीकडे सांगण्यात आले आणि दुसरीकडे सर्व घटनेचे खापर महामंडळाच्या अध्यक्षांवर फोडले, ही लाजीरवाणी घटना आहे’, असेही ते म्हणाले.विश्वसनीय सूत्रांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, नयनतारा यांचे निमंत्रण रद्द केल्यास काय परिणाम होऊ शकतात, याबाबत पूर्वकल्पना दिली होती. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसळकर यांच्या मध्यस्थीने आयोजक समितीने निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि नयनतारा सहगल यांना खेद व्यक्त करणारे पत्र पाठवायचे, असे ठरवण्यात आले. यावेळी झाल्या प्रकाराचे काय पडसाद उमटू शकतात, याची कल्पना आणि त्यातील भीषणता याबाबत जोशी यांनी आयोजक समितीला कल्पना दिली होती. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावरही आयोजकांना भूमिका बदलता येणे शक्य होते. मात्र, आगामी निवडणुकांचा माहोल लक्षात घेऊन सहगल याचे भाषण विपरित परिणाम साधणारे ठरू शकते, असे वाटल्याने आयोजकांवर स्वागताध्यक्षांनीच दबाव टाकला. नयनतारा व्यासपीठावर आल्यास संमेलनासाठी एक पैसाही मिळणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे समजते. संंमेलनातील अनेक सहभागी निमंत्रितांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतर आयोजकांनी महामंडळाशी संवाद साधणेच बंद केले. त्यामुळे राजकीय दबाव हेच यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.हा आगळावेगळा जीवनानुभव हीच लेखकांची उर्जा असते. कोणी डावा, कोणी उजवा ठरवल्याने माझे मला ठाऊक असलेले मूल रूप मलिन, प्रदूषित न होऊ देता मी ते व्यवस्थित जपलेले आहे. तुकाराम वाचून कळत नाही. तो असे जगून कळतो, हे कळायला सहकार्य हा अनुभव देणाऱ्यांनी केले आहे. अरूणा ढेरे यांनी हुशारीने खेळी खेळणाऱ्या अशा शक्तींचा जो भाषणात उल्लेख केला, त्या शक्तींना सलाम करायचा, त्यांना उघड करायचे की सगळ्यांना सगळे ठाऊक असूनही सामूहिकरीत्या दुर्लक्ष करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. वेड पांघरून साऱ्यांनाच पेडगावलाच अजूनही जाण्याचीच इच्छा कायम असेल तर ती ज्याची त्याला लखलाभ असो.- डॉ. श्रीपाद जोशीसहगल यांचे निमंत्रण रद्द होण्याबाबत डॉ. श्रीपाद जोशी यांनी सुरुवातीला मनसेला, नंतर आयोजकांना जबाबदार धरले. आयोजकांनी निमंत्रण परस्पर रद्द केले असे आधी जोशी म्हणाले, मग आपण केवळ इंग्रजी मसुदा लिहुन दिल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर मी आयोजकांवर राजकीय दबाव टाकल्याचा आरोप जोशी यांनी केला. कोणा-कोणावर आरोप करायचे आहेत, याची यादी एकदा त्यांच्याकडून मागवून घ्यायला हवी.यवतमाळमधील संमेलन हे येथील लोकांसाठी गौरवास्पद बाब आहे. कोलते यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. संमेलनाचे निश्चित झाल्यानंतर मी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. स्वागताध्यक्षपदही भूषवण्याचा माझा आग्रह नव्हता. संमेलनामध्ये कोणाला बोलवावे, कोणाला बोलवू नये यामध्ये मी पहिल्यापासून हस्तक्षेप केलेला नाही. संमेलनाच्या पूर्वी सर्व प्रक्रिया सुरू असताना जोशी यांनी माझ्याशी एकदाही संवाद साधलेला नाही. त्यामुळे एकूणच निमंत्रण रद्द करण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग नाही.- मदन येरावार, स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन