शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

मराठी माणसाची शाळा देणार शिक्षणाला नवी दिशा; वडनगरमधून देशाचा ‘प्रेरणा उत्सव’

By अविनाश साबापुरे | Updated: April 14, 2024 05:48 IST

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडविण्यासाठी ‘प्रेरणा उत्सव’ राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या व्हर्नाक्युलर शाळेची निवड केली आहे. येथे देशभरातील विद्यार्थ्यांना आठवडाभर प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाचे नवे वारे पोहोचविले जाणार आहेत. या निमित्ताने एका मराठी माणसाची शाळा देशभरातील शिक्षणव्यवस्थेला दिशा दाखविणार आहे.

नाशिकमध्ये जन्मलेल्या आणि नंतर बडोदा संस्थानचे सर्वाधिकारी झालेल्या सयाजीराव गायकवाड यांनी १८८८ साली वडनगरमध्ये (गुजरात) व्हर्नाक्युलर शाळा स्थापन केली होती. प्राचीन भारतीय वारसा आणि आधुनिक शिक्षणपद्धती अशा दोहोंची सांगड घालून या शाळेत शिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘प्रेरणा उत्सवा’साठी या शाळेची निवड केली आहे. प्रेरणा उत्सवासाठी प्रत्येक राज्यातील जवाहर नवोदय विद्यालय हे नोडल सेंटर आहे. महाराष्ट्रातही नवोदय विद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   

उत्सव काय आहे? - विद्यार्थ्यांना वडनगरच्या शाळेत  सात दिवस देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. - यामध्ये सर्व राज्यांतील सीबीएसई, राज्य शिक्षण मंडळासह सर्वच शाळांमधील नववी ते बारावीच्या निवडक विद्यार्थ्यांचा समावेश केला जाणार आहे. जुनी परंपरा, देशाचा वारसा आणि आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान यांची सांगड या प्रशिक्षणात असेल. - प्रत्येक आठवड्याला देशाच्या कोणत्याही एका प्रांतातील २० विद्यार्थ्यांना वडनगरच्या शाळेत ठेवले जाणार आहे.

काय शिकविणार? प्रेरणा उत्सवातील सात दिवसांचा अभ्यासक्रम गांधीनगर आयआयटीने तयार केला आहे. नऊ मूल्यांवर आधारित हा अभ्यासक्रम आहे. स्वाभिमान आणि विनय, शौर्य आणि साहस, परिश्रम आणि समर्पण, करुणा आणि सेवा, विविधता आणि एकता, सत्यनिष्ठा आणि शुचिता, नवाचार आणि जिज्ञासा, श्रद्धा आणि विश्वास, स्वातंत्र्य आणि कर्तव्य या नऊ मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाईल. 

अशी होणार विद्यार्थ्यांची निवड येत्या १७ एप्रिलपर्यंत कोणत्याही एका दिवशी शाळास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची निवड होईल. या दोन विद्यार्थ्यांना २३ एप्रिलला जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेसाठी पाठविले जाईल. ही निवड प्रक्रिया परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयात होईल. तेथे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वडनगर (गुजरात) येथील प्रेरणा उत्सवासाठी पाठविले जाणार आहे. तेथील एका आठवड्याच्या शिक्षणानंतर त्यांच्या अनुभवाचा आधार घेतला जाईल. 

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळा