शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मराठी माणसाची शाळा देणार शिक्षणाला नवी दिशा; वडनगरमधून देशाचा ‘प्रेरणा उत्सव’

By अविनाश साबापुरे | Updated: April 14, 2024 05:48 IST

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडविण्यासाठी ‘प्रेरणा उत्सव’ राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या व्हर्नाक्युलर शाळेची निवड केली आहे. येथे देशभरातील विद्यार्थ्यांना आठवडाभर प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाचे नवे वारे पोहोचविले जाणार आहेत. या निमित्ताने एका मराठी माणसाची शाळा देशभरातील शिक्षणव्यवस्थेला दिशा दाखविणार आहे.

नाशिकमध्ये जन्मलेल्या आणि नंतर बडोदा संस्थानचे सर्वाधिकारी झालेल्या सयाजीराव गायकवाड यांनी १८८८ साली वडनगरमध्ये (गुजरात) व्हर्नाक्युलर शाळा स्थापन केली होती. प्राचीन भारतीय वारसा आणि आधुनिक शिक्षणपद्धती अशा दोहोंची सांगड घालून या शाळेत शिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘प्रेरणा उत्सवा’साठी या शाळेची निवड केली आहे. प्रेरणा उत्सवासाठी प्रत्येक राज्यातील जवाहर नवोदय विद्यालय हे नोडल सेंटर आहे. महाराष्ट्रातही नवोदय विद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   

उत्सव काय आहे? - विद्यार्थ्यांना वडनगरच्या शाळेत  सात दिवस देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. - यामध्ये सर्व राज्यांतील सीबीएसई, राज्य शिक्षण मंडळासह सर्वच शाळांमधील नववी ते बारावीच्या निवडक विद्यार्थ्यांचा समावेश केला जाणार आहे. जुनी परंपरा, देशाचा वारसा आणि आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान यांची सांगड या प्रशिक्षणात असेल. - प्रत्येक आठवड्याला देशाच्या कोणत्याही एका प्रांतातील २० विद्यार्थ्यांना वडनगरच्या शाळेत ठेवले जाणार आहे.

काय शिकविणार? प्रेरणा उत्सवातील सात दिवसांचा अभ्यासक्रम गांधीनगर आयआयटीने तयार केला आहे. नऊ मूल्यांवर आधारित हा अभ्यासक्रम आहे. स्वाभिमान आणि विनय, शौर्य आणि साहस, परिश्रम आणि समर्पण, करुणा आणि सेवा, विविधता आणि एकता, सत्यनिष्ठा आणि शुचिता, नवाचार आणि जिज्ञासा, श्रद्धा आणि विश्वास, स्वातंत्र्य आणि कर्तव्य या नऊ मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाईल. 

अशी होणार विद्यार्थ्यांची निवड येत्या १७ एप्रिलपर्यंत कोणत्याही एका दिवशी शाळास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची निवड होईल. या दोन विद्यार्थ्यांना २३ एप्रिलला जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेसाठी पाठविले जाईल. ही निवड प्रक्रिया परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयात होईल. तेथे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वडनगर (गुजरात) येथील प्रेरणा उत्सवासाठी पाठविले जाणार आहे. तेथील एका आठवड्याच्या शिक्षणानंतर त्यांच्या अनुभवाचा आधार घेतला जाईल. 

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळा