शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दारव्हा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:09 IST

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे.

ठळक मुद्देवादळाचा फटका : दहा दिवसांपासून जनजीवन ठप्प, पीठगिरण्या, पाणीपुरवठा बंद असल्याने हाहाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे. सलग दहा दिवसांपासून वीज नसल्याने या गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून दैनंदिन कामकाज ठप्प पडले आहे.दोन दिवसांच्या फरकाने आलेल्या वादळी वाऱ्यामुळे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करताना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वीज वितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. शिवाय आवश्यक ते साहित्यही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. सायखेडा, तळेगाव, लोही या फिडरवर असलेल्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने प्रचंड उकाड्यात दिवस व रात्र काढावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना मुबलक पाणी असूनही मान्सूनपूर्व पिकांची लागवड करता आली नाही. एकाचवेळी अनेक गावात बिघाड झाल्याने स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. दुसरीकडे ग्रामस्थांचा संयम ढळत आहे. एकंदरच स्फोटक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. प्रचंड उकाडा होत असताना वीज पुरवठा नसल्याने लहान मुले व वृद्धांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. लवकर पुरवठा सुरू करण्याची मागणी आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची वीज महावितरण कार्यालयावर धडकवीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. तळेगाव फिडरमधील गावांचा वीज पुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख मनोज सिंगी, पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, सिंधू राठोड, राजू दुधे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रवीण पवार, वहीद खान, रामेश्वर गिरी, बळीराम जाधव, प्रेमसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणShiv Senaशिवसेना