शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दारव्हा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:09 IST

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे.

ठळक मुद्देवादळाचा फटका : दहा दिवसांपासून जनजीवन ठप्प, पीठगिरण्या, पाणीपुरवठा बंद असल्याने हाहाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे. सलग दहा दिवसांपासून वीज नसल्याने या गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून दैनंदिन कामकाज ठप्प पडले आहे.दोन दिवसांच्या फरकाने आलेल्या वादळी वाऱ्यामुळे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करताना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वीज वितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. शिवाय आवश्यक ते साहित्यही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. सायखेडा, तळेगाव, लोही या फिडरवर असलेल्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने प्रचंड उकाड्यात दिवस व रात्र काढावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना मुबलक पाणी असूनही मान्सूनपूर्व पिकांची लागवड करता आली नाही. एकाचवेळी अनेक गावात बिघाड झाल्याने स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. दुसरीकडे ग्रामस्थांचा संयम ढळत आहे. एकंदरच स्फोटक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. प्रचंड उकाडा होत असताना वीज पुरवठा नसल्याने लहान मुले व वृद्धांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. लवकर पुरवठा सुरू करण्याची मागणी आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची वीज महावितरण कार्यालयावर धडकवीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. तळेगाव फिडरमधील गावांचा वीज पुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख मनोज सिंगी, पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, सिंधू राठोड, राजू दुधे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रवीण पवार, वहीद खान, रामेश्वर गिरी, बळीराम जाधव, प्रेमसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणShiv Senaशिवसेना