शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मनदेव तलाव गाळाने भरला

By admin | Updated: June 4, 2017 01:11 IST

आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही. या तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याने उन्हाळ्यात केवळ डबके राहातात. परिणामी सिंचन आणि वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या तलावाची साठवण क्षमता केवळ २५ ते ३० टक्के राहिली आहे. हा तलाव घाटाखाली असल्याने वन्यजीवांना महामार्ग ओलांडून तलावावर जावे लागत नाही. त्यामुळे अपघात होत नाही. वेळोवेळी डागडुजी आणि खोलीकरणाचे काम झाल्यास हा तलाव आजही सिंचन, वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडतो. या तलावातून जवळपास २०० हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीच्यावेळेस निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात थोड्याफार क्षेत्रातच सिंचन शक्य झाले. लाखो रुपये खर्च करून तयार झालेला हा तलाव नामशेष होण्यापूर्वी त्याचे पुनरूज्जीवन करणे काळाची गरज आहे. तलावाचे खोलीकरण करून योग्य सुशोभीकरण केल्यास पर्यटन विकासालाही वाव आहे. या माध्यमातून वनविभागाला उत्पन्नाचा एक नवीन स्रोतही मिळू शकतो. तलावावर विविध तसेच विदेशी पक्षीसुद्धा आढळल्याच्या नोंदी काही पक्षीप्रेमींकडे आहेत. या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून तलावाच्या विकासाची गरज निर्माण झाली आहे.वनविभागाने नाकारली परवानगीसिंचनासाठी संजीवनी ठरत असलेल्या या तलावाची खोली वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढण्याचा निर्णय घेतला. मात्र वनविभागाने याला परवानगी नाकारली. विकासाच्यादृष्टीने लोकांनी पुढाकार घेतलेल्या कामातही वनविभागाकडून नियम दाखविले जात आहे. याविषयी नागरिकांमध्ये रोष आहे.