शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मनदेव तलाव गाळाने भरला

By admin | Updated: June 4, 2017 01:11 IST

आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही. या तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याने उन्हाळ्यात केवळ डबके राहातात. परिणामी सिंचन आणि वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या तलावाची साठवण क्षमता केवळ २५ ते ३० टक्के राहिली आहे. हा तलाव घाटाखाली असल्याने वन्यजीवांना महामार्ग ओलांडून तलावावर जावे लागत नाही. त्यामुळे अपघात होत नाही. वेळोवेळी डागडुजी आणि खोलीकरणाचे काम झाल्यास हा तलाव आजही सिंचन, वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडतो. या तलावातून जवळपास २०० हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीच्यावेळेस निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात थोड्याफार क्षेत्रातच सिंचन शक्य झाले. लाखो रुपये खर्च करून तयार झालेला हा तलाव नामशेष होण्यापूर्वी त्याचे पुनरूज्जीवन करणे काळाची गरज आहे. तलावाचे खोलीकरण करून योग्य सुशोभीकरण केल्यास पर्यटन विकासालाही वाव आहे. या माध्यमातून वनविभागाला उत्पन्नाचा एक नवीन स्रोतही मिळू शकतो. तलावावर विविध तसेच विदेशी पक्षीसुद्धा आढळल्याच्या नोंदी काही पक्षीप्रेमींकडे आहेत. या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून तलावाच्या विकासाची गरज निर्माण झाली आहे.वनविभागाने नाकारली परवानगीसिंचनासाठी संजीवनी ठरत असलेल्या या तलावाची खोली वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढण्याचा निर्णय घेतला. मात्र वनविभागाने याला परवानगी नाकारली. विकासाच्यादृष्टीने लोकांनी पुढाकार घेतलेल्या कामातही वनविभागाकडून नियम दाखविले जात आहे. याविषयी नागरिकांमध्ये रोष आहे.