शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

चिमुकल्या मानवीचा काकूनेच केला ‘अमानवी’ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 17:51 IST

२० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत असलेली मानवी अचानक बेपत्ता झाली होती. मानवीच्या काकूनेच तिला मारुन टाकले आणि आठवडाभर घरातच गव्हाच्या कोठीत दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपी काकूला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमुलापेक्षा मुलीचा लाड होतो म्हणून द्वेषकट उघड होताच मानसिक रुग्ण असल्याचा पोलिसांपुढे बनाव

यवतमाळ : खुदूखुदू हसणारी तीन वर्षांची मानवी ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. आठवडाभर सर्वत्र शोध घेवून आई-वडील थकले. पोलिसांनीही हात टेकले. आर्णी तालुक्यातील कुऱ्हा डुमनी गावातील या घटनेत अखेर रविवारी रात्री धक्कादायक खुलासा पुढे आला. मानवीच्या काकूनेच तिला मारुन टाकले आणि आठवडाभर घरातच गव्हाच्या कोठीत दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपी काकूला ताब्यात घेतले आहे. या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

मानवी अविनाश चोले असे मृत बालिकेचे नाव आहे. तर दीपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले (२८) असे मारेकरी काकूचे नाव आहे. दि. २० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत असलेली मानवी अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिचे वडील अविनाश आणि आई ममता उर्फ पूजा यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर आर्णी पोलिसांत तक्रार दाखल केली.

मानवीच्या शोधासाठी पोलिसांसह गावकऱ्यांनीही जंगजंग पछाडले. मात्र मानवीचा कुठेही सुगावा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी शेजाऱ्यांवरच लक्ष केंद्रित केले. शेवटी रविवारी खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी कुऱ्हा डुमनी गाव गाठून दिवसभर माग काढला. रात्री ९च्या सुमारास संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. मानवीच्या घराशेजारी राहणाऱ्या चुलत काकूनेच सात दिवसांपूर्वी तिचा खून करून घरातील गव्हाच्या कोठीत तिचा मृतदेह दाबून ठेवल्याचे उघडकीस आले. पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झाले मात्र चिमुकल्या मानवीचा जीव वाचविण्यात कुणालाच यश आले नाही.

पोलिसांनी तातडीने मानवीची काकू दीपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हिला ताब्यात घेतले आहे, तर मानवीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आला. दीपालीसह कुटुंबातील आणखी दाेघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांंनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण केले होते. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, दारव्हा एसडीपीओ आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ एलसीबी पथक प्रमुख प्रदीप परदेशी, आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव, मनोज चव्हाण, सतीश चौधर, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर, विजय चव्हाण आदींनी पार पाडली.

* संबंधित बातमी : तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणामुळे खळबळ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू