शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मन करा रे स्ट्राँग.. यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 07:00 IST

कोरोना आजाराबद्दल लोकांमध्ये भलतेच गैरसमज पसरले आहेत. पण मी स्वानुभवातून सांगतो, हा आजार बरा होतोच. स्वत:चे मन ‘स्ट्राँग’ करायचे, इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवायची. मग कोरोनाच काय कोणताही आजार पळाल्याशिवाय राहात नाही...

ठळक मुद्देकोरोनामुक्त व्यावसायिकाचा मंत्र उपचारासोबतच स्वत:ची इच्छाशक्ती महत्त्वाची

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना आजाराबद्दल लोकांमध्ये भलतेच गैरसमज पसरले आहेत. पण मी स्वानुभवातून सांगतो, हा आजार बरा होतोच. स्वत:चे मन ‘स्ट्राँग’ करायचे, इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवायची. मग कोरोनाच काय कोणताही आजार पळाल्याशिवाय राहात नाही...यवतमाळ जिल्ह्यातील पहिला कोरोनारुग्ण म्हणून ज्यांची नोंद झाली ते रमेश नारायण यमसनवार आपल्या ‘कोरोनामुक्ती’चा मंत्र सांगत होते. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच यमसनवार कुटुंब दुबईवरून परतले आणि कोरोना पॉझिटिव्ह निघाले. पहिल्यांदा रमेश यांना यवतमाळ मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. तर दोन दिवसांनी त्यांची पत्नी जया रमेश यमसनवार याही पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांनाही दाखल करण्यात आले. मात्र अवघ्या काही दिवसात या दोघांनीही कोरोनावर मात केली आज ते आपल्या घरी ठणठणीत आहेत.आपला हा ‘कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ असा ‘सकारात्मक’ प्रवास मांडताना रमेश यमसनवार म्हणाले, आम्ही पहिले-पहिले पेशंट होतो, तेव्हा कोरोनाची लोकांना फारशी माहितीही नव्हती. त्यामुळे गैरसमज खूप होते. कोरोना झाला म्हणजे जणू आम्ही काही गुन्हा केला की काय, असे वातावरण झाले होते. पण इतर आजारांसारखाच हाही एक आजार आहे. तोही बरा होतो. मी आणि पत्नी एकाच वेळी दवाखान्यात उपचार घेत होतो. मी मनाने स्ट्राँग होतो, पण ती जरा हळवी झाली होती. मी तिला सांगायचो.. खचला तो संपला! स्वत:वर विश्वास ठेवायचा. इम्युनिटी टिकवायची. इच्छाशक्ती कायम ठेवायची. टेन्शन घ्यायचे नाही. सारे काही ठिक होईल... या बोलण्यातून धिर मिळायचा... तिलाही अन् मलाही!यमसनवार म्हणाले, डॉक्टर मंडळींनी खूप मेहनत घेतली. आम्ही ‘पॉझिटिव्ह’ असूनही डॉ. मिलिंद कांबळे आमच्या जवळ येऊन विचारपूस करायचे. दैनंदिन ताप चेक करणे, औषधी देणे सुरू होते. रोज अ‍ॅन्टीबायोटिक गोळ्या सुरू होत्या. आमचा दुसरा-तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर आम्हाला घरी सोडण्यात आले. १४ दिवस होमक्वारंटाईन करण्यात आले. पण आम्ही स्वत:हून ३५ दिवस घराबाहेर निघालोच नाही. या क्वारंटाईन काळात नातेवाईक जेवणाचा डबा आणून द्यायचे, त्यांनाही आम्ही संपर्क टाळण्यासाठी घरात घेतले नाही. मन रमविण्यासाठी घरातल्या घरात व्यायाम करणे, टिव्हीवर आवडते कार्यक्रम पाहणे, जगदंबा देवीची भक्ती करणे हा आमचा दिनक्रम होता. आता ३५ दिवसानंतर मी माझा कृषी केंद्राचा व्यवसायही पूर्वीप्रमाणे सुरू केला आहे.आजारावर निश्चित उपचार नसताना डॉक्टरांची मेहनत, माझी स्वत:ची इच्छाशक्ती, माझ्या परिसरातील लोकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि जगदंबा देवीची कृपा यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...माझ्यामुळे इतरांना त्रास नको!रमेश यमसनवार म्हणाले, दुबईहून आल्यावर मी कोरोना पॉझिटिव्ह निघालो अन् रुग्णालयात भरती झालो. पण माझ्या संपर्कात आलेल्या इतरांना काही होणार तर नाही ना, याबाबत सतत चिंता सतावत होती. म्हणून रुग्णालयातून त्या सर्वांना सतत फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत होतो. सुदैवाने माझ्यामुळे इतर कोणालाही लागण झाली नाही, याचे समाधान आहे. आम्ही पती-पत्नी रुग्णालयात असताना आमचा मुलगा सारंग पुण्यात उपचार घेत होता. पण आता आम्ही तिघेही कोरोनामुक्त झालो.मास्क लावणे म्हणजे ९५ टक्के सुरक्षासरकार कितीही प्रयत्न करीत असले तरी आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क लावलाच पाहिजे. मास्क लावला तर दुसऱ्या कोणत्याच उपायाची गरज नाही. तिच आपली ९५ टक्के सुरक्षा आहे. लोकांनी गर्दीत जाऊ नये, गेलेच तर काळजी घेऊन वावरा. कोरोनामुक्त झाल्यावर मी शहरातील आणि खेड्यातीलही नागरिक पाहिले. पण कोरोनाबाबत खेड्यातील अडाणी माणसेच अधिक जागृत असल्याचे मत यमसनवार यांनी नोंदविले.कोरोना आजार उलटून येत नाहीआम्ही कोरोनामुक्त झालो तरी अनेक लोक आमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा आजार एकदा बरा झाल्यावर पुन्हा उलटून येत नाही. कोरोनामुक्त झालो म्हणजे आम्ही पूर्वीप्रमाणेच ‘सामान्य’ झालो आहोत. क्वारंटाईन पिरेडनंतर आमच्यापासून कोणालाही कोणताही धोका नाही. आम्हाला घाबरणे म्हणजे अंधश्रद्धा बाळगणे होय, असे रमेश यमसनवार म्हणाले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या