शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी विद्यापीठांनी आठवडी सुट्ट्या केल्या कमी; कोरोना काळातील 'बॅकलॉग' भरून काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 14:42 IST

महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कुलगुरू समन्वय समितीच्या सभेत महिन्यातील दोन सुट्ट्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : संशोधनात्मक प्रगतीसाठी निर्णय

यवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या कोरोनाचा इफेक्ट कृषी विद्यापीठांवरही झाला आहे. या काळात कृषी विद्यापीठांमध्ये शैक्षणिक व संशोधनात्मक प्रगती ठप्प होती. हे नुकसान भरून काढण्यासाठी कामकाज शनिवारीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाचे कामकाज महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारीही सुरू राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कुलगुरू समन्वय समितीच्या सभेत महिन्यातील दोन सुट्ट्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाच दिवसांचा आठवडा असला तरी कृषी विद्यापीठांना दोन आठवड्यात सहा दिवस काम करावे लागणार आहे. पहिल्या व तिसऱ्या शनिवारी अधिकारी कामावर हजर राहणार आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाच दिवसांच्या आठवड्यामुळे शेतीविषयक पेरणी, मशागती आदी कामे वेळेत पूर्ण करणे अशक्य आहेत. शिवाय, शैक्षणिक वेळापत्रकही पाच दिवसात बसत नाही. त्यामुळेच महिन्यात दोन आठवडे सहा दिवसांचे राहणार आहेत.

राज्यभरात असलेल्या चारही कृषी विद्यापीठांमध्ये एकूण पाच हजार कर्मचारी आहेत. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कृषी शिक्षण, कृषी विस्तार संशोधन आदी प्रकारची कामे या विद्यापीठात होतात. प्रत्यक्षात ही कामे करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा आहे. याचाही परिणाम कामकाजावर होत असल्याचे सांगत विद्यापीठांनी सुट्ट्या कमी केल्या आहेत. एप्रिलच्या १ तारखेपासूनच याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विद्यापीठाने यंत्रणेला दिल्या आहेत.

कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

महिन्याच्या दोन आठवड्यातील शनिवारच्या दोन सुट्ट्या विद्यापीठाने कमी केल्याने कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला जात आहे. कोरोनाकाळातही कृषी विस्तार, शेती, रिसर्च आदी कामे सुरळीत सुरू होती. काही कामे ऑनलाईन, तर काही प्रत्यक्ष शेतात सुरू होती. विद्यापीठाची ही कामगिरी देशस्तरीय मिळालेल्या रँकिंगवरून स्पष्ट होते. असे असताना कोरोनाकाळात कामे झाली नाही, असे विद्यापीठाचे म्हणणे संयुक्तिक नसल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे. सुट्ट्यांसंदर्भात योग्य निर्णय न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचीही त्यांची तयारी आहे. यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठAgriculture Sectorशेती क्षेत्र