शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

रेशीम उत्पादनात महाराष्ट्र ठरले उदयोन्मुख राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:33 AM

राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून दखलक्षेत्र वाढण्यात अमरावती विभागासह यवतमाळचा सिंहाचा वाटा

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. रेशीम उत्पादनात उदयोन्मुख राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला आहे. या गौरवात अमरावती विभाग आणि यवतमाळ जिल्ह्यातील लागवडक्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे.जगभरात रेशीम उत्पादनात ९९.९९ टक्के वाटा चिनचा आहे. यामुळे रेशीम उत्पादनात संपूर्ण बाजारपेठ चिनने काबीज केली आहे. भारतालाही रेशीम उत्पादनात सर्वाधिक वाव आहे. अशा प्रकारची सुपीक जमीन महाराष्ट्रात आहे. यामुळे महाराष्ट्रात रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडण्याची शक्यता आहे. रेशीम उत्पादनाला जागतिक बाजारात चांगली किंमत आहे. किमान ६०० रूपये किलोच्या वरच आजपर्यंत कोशाचे दर राहिले आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना किमान सहा वेळा पीक घेता येते. अमरावती विभागाचा लागवड क्षेत्राचा आकडा चार हजार एकरवर गेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात १३०० एकरवर लागवड झाली आहे. ५९० एकर लागवडीसाठी शेतकरी तयार आहेत. एकूणच रेशीम लागवडीकडे शेतकरी वळत आहे.रेशीम धाग्याला मोठी मागणीजागतिक बजारात रेशीम धाग्याला मोठी मागणी आहे. यातून चांगला रोजगारही मिळू शकतो. यामुळे असे युनिट तयार करण्यासाठी शेतकरी आता पुढे येत आहेत. यातून शेतकऱ्यांना कोषापेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे.रेशीम उत्पादनात जिल्ह्याला मोठी संधी आहे. यामुळे जिल्हा २०० एकरवरून दोन हजार एकरकडे वाटचाल करीत आहे. पुढील काळात हे क्षेत्र वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती