शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

Maharashtra Election 2019 ; प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी होत होती. मात्र तत्कालिन पंतप्रधानांनी केवळ पाकिस्तानचे लाड पुरविण्याचे काम केले.

ठळक मुद्देअमित शहा : वणीत प्रचारसभा, पाकिस्तानला धडा शिकवत राहू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यवतमाळ हा कापूस आणि सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीन प्रक्रिया हाऊस तयार करण्यास मोदी सरकार बांधिल असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी दिली.स्थानिक शासकीय मैदानावर प्रचारसभेत ते बोलत होते. अमित शहा यांनी मोदी सरकारच्या काळात केलेला विकासाचा लेखाजाखा यावेळी मांडला. देशातील १३ कोटी गरिब महिलांना गॅस कनेक्शन देऊन माताभगिनींना धूरमुक्त करण्याचे काम मोदी सरकारने केले. १० कोटी घरांमध्ये शौचालये बांधली. मात्र शरद पवारांनी या योजनेवर टिका केल्याचे सांगून पवारांना महिलांच दु:ख कळतं का, असा सवाल शहा यांनी उपस्थित केला.काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले.काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी होत होती. मात्र तत्कालिन पंतप्रधानांनी केवळ पाकिस्तानचे लाड पुरविण्याचे काम केले. मात्र मोदी सरकारने पाकिस्तानची घुसखोरी व हल्ल्यांना चोख उत्तर दिले. वेळप्रसंगी पाकिस्तानमध्ये घुसून ठोकून काढले. याहीपुढे मोदी सरकार पाकिस्तानला धडा शिकवत राहिल, असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी दिला.मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे किशोर तिवारी, वणीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार, वरोराचे संजय देवतळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, राजेंद्र डांगे, शिवसेना नेते गणपत लेडांगे, रवी बेलुरकर, विजय चोरडीया, अभिनव भास्करवार, रिपाइंचे वर्सुकेत पाटील, राम झिले आदी उपस्थित होते.

टॅग्स :wani-acवणीAmit Shahअमित शहा