Maharashtra Election 2019 ; मतविभाजनाने राजकीय समीकरणे बिघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:00 AM2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:05+5:30

जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी भाजपने दोन जागांवर, काँग्रेसने एका जागेवर तर राष्ट्रवादीने दोन जागांवर चेहरे बदलविले आहे. भाजपने तर आपल्या दोन आमदारांचेच तिकीट कापून तेथे नवे चेहरे रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीत मतविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Maharashtra Election 2019 ; Partisanship will break the political equation | Maharashtra Election 2019 ; मतविभाजनाने राजकीय समीकरणे बिघडणार

Maharashtra Election 2019 ; मतविभाजनाने राजकीय समीकरणे बिघडणार

Next
ठळक मुद्देपाच विधानसभा मतदारसंघ : सर्वाधिक वणी, आर्णीमध्ये, बंडखोरीचाही पक्षांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सात पैकी पाच विधानसभा मतदारसंघात अपक्षांमुळे मतविभाजन अटळ असून त्यामुळे विद्यमान आमदारांचे राजकीय समीकरण बिघडणार आहे. त्यातही सर्वाधिक फटका हा बहुरंगी लढत होऊ घातलेल्या वणी मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तेथे नेमका कोण निवडून येईल याचा अंदाज वर्तविणे राजकीय तज्ज्ञांनाही सध्यातरी कठीण झाले आहे.
जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी भाजपने दोन जागांवर, काँग्रेसने एका जागेवर तर राष्ट्रवादीने दोन जागांवर चेहरे बदलविले आहे. भाजपने तर आपल्या दोन आमदारांचेच तिकीट कापून तेथे नवे चेहरे रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीत मतविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे.
विधानसभेच्या अन्य पाच मतदारसंघात मात्र मतविभाजन निश्चित आहे. वणीमध्ये सात उमेदवार रिंगणात आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. परंतु या समाजाचे पाच उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचा फायदा नेमका भाजपला होतो की काँग्रेसला हे पाहणे महत्वाचे ठरते. अशीच स्थिती आर्णी विधानसभा मतदारसंघात आहे. भाजपने तिकीट नाकारल्याने या मतदारसंघात आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात आदिवासी आणि त्यातही गोंड समाजाचे प्राबल्य आहे. या समाजाचे पाच उमेदवार रिंगणात आहे. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजनाची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होण्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघातसुद्धा मोठ्या प्रमाणात हक्कांच्या मतांमध्ये विभाजन दिसते आहे. शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे रिंगणात आहे. ते युतीच्या हक्कांच्या मतांमध्ये विभागणी करतील. त्यांना समाजाने साथ दिल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला काही प्रमाणात का होईना नुकसान संभवते. प्रहारचे बिपीन चौधरी यांना मिळणारी मते नेमकी कुणाला मायनस करतील याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांना पक्ष व मतदारांची किती साथ मिळते याकडे नजरा लागल्या आहेत. कारण त्यांना मिळणारी मते ही काँग्रेसची हक्काची मते असल्याचे मानले जाते. परंतु तुटलेला संपर्क, ऐनवेळेवरील उमेदवारीमुळे मतदारांपर्यंत ओळख निर्माण करण्याचे आव्हान वंचितच्या उमेदवारापुढे आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघात भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या उमेदवारीने शिवसेनेची डोकेदुखी वाढविली आहे. सेना व राष्ट्रवादी न चालणाऱ्या मतदारांसाठी तिसरा पर्याय उभा झाला आहे. राष्ट्रवादीचे मो.तारिक मो. शमी दिग्रस मतदारसंघासाठी नवे आहेत. तरीही त्यांना कितपत पसंती मिळते याकडे नजरा आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या हक्काची मते भाजप बंडखोराकडे जाण्याची व त्यामुळे शिवसेनेचे एक लाखांवर मतांच्या आघाडीचे स्वप्न भंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे तिकीट कापून नगराध्यक्ष नामदेव ससाने या नव्या चेहºयाला रिंगणात उतरविले आहे. मात्र भाजपच्या या उमेदवारापुढे शिवसेना बंडखोर डॉ. विश्वनाथ विणकरे यांचे आव्हान आहे. तेथे काँग्रेसचे विजय खडसे यांची लढत भाजपशी होते की सेना बंडखोराशी याकडे नजरा लागल्या आहे. वंचित बहुजन आघाडी, बसपाचा उमेदवार येथे काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो.

भाजप उमेदवाराचे ‘रिमोट’ मालकाच्या हाती
आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपने ‘मालका’च्या इशाºयावर उमेदवार दिल्याने पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहे. उमेदवार हा भाजपचा नव्हे तर मालकाचा असा प्रचार केला जात आहे. गेली दहा वर्ष मतदारसंघ वाºयावर सोडणे, भाजप सोडून सेनेत प्रवेश, आता पुन्हा भाजपात एन्ट्री याबाबीही भाजपच्या उमेदवारासाठी अडचणीच्या ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मतदारसंघात आमदार तोडसाम यांची बंडखोरी काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडू शकते, असा राजकीय अंदाज आहे.

राळेगाव, पुसद विधानसभा मतदारसंघाचा अपवाद
राळेगाव आणि पुसद हे दोन मतदारसंघ मतविभाजनासाठी जणू अपवाद ठरले आहे. राळेगावमध्ये भाजपचे प्राचार्य डॉ. अशोक उईके व काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके या आजी-माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत होत आहे. पुसदमध्ये नीलय नाईक व इंद्रनील नाईक या दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये समोरासमोर लढत होत आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Partisanship will break the political equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.