शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

Maharashtra Election 2019 ; मतदानाच्या दीड तासापूर्वी ईव्हीएमची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:00 AM

उमेदवारांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यास मतदान केंद्र प्रमुख व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक पोल केला जातो. या सर्व उमेदवारांना समान मते टाकून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधून झालेले मतदान डिलीट केले जाते. ही प्रक्रिया सर्वांसमक्ष करून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने मॉक पोल प्रमाणपत्र तयार केले जाते.

ठळक मुद्दे‘मॉक पोल’ प्रमाणपत्र अनिवार्य : सकाळी ५.३० वाजता सुरू होणार प्रक्रिया

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ईव्हीएमबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित होत असताना मतदानाची प्रक्रिया पारदर्शकरीत्या सुरू केली जाते. यासाठी ‘मॉक पोल’ प्रमाणपत्र व अभिरुप मतदान घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दीड तासापूर्वी अभिरुप मतदान करून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाणार आहे.मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ईव्हीएममध्ये उमेदवाराला दिलेले मत योग्य पद्धतीने नोंदले जाते की नाही, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी व ईव्हीएममधील मत याची पडताळणी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला ‘मॉक पोल’ संबोधल्या जाते. याची सुरुवात अभिरुप मतदान घेऊन होते. रिंगणात असलेले एकूण उमेदवार व नोटा या सर्वांना समान मतदान करून नंतर त्याची पडताळणी केली जाते. ही प्रक्रिया किमान दोन उमेदवाराचे प्रतिनिधी असताना सुरू केली जाते. सकाळी ५.३० वाजता मॉक पोलची वेळ निश्चित केली आहे.उमेदवारांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यास मतदान केंद्र प्रमुख व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक पोल केला जातो. या सर्व उमेदवारांना समान मते टाकून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधून झालेले मतदान डिलीट केले जाते. ही प्रक्रिया सर्वांसमक्ष करून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने मॉक पोल प्रमाणपत्र तयार केले जाते.या प्रमाणपत्रानंतरच सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतदानाच्या दीड तासापूर्वी पुढील मतदान योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठीच मॉक पोल घेतला जातो. एकंदर प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश आयोगाकडून असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केले.किमान ५० मते टाकणे बंधनकारकमॉक पोल व अभिरुप मतदानासंदर्भात उमेदवाराने नेमलेल्या मतदान केंद्र प्रतिनिधीच्या कार्यशाळेत माहिती दिली जाते. तसेच या सर्व प्रतिनिधींना सकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यांच्या समक्षच किमान ५० मते समान पद्धतीने टाकून पडताळणी केली जात असल्याची माहिती यवतमाळ विधानसभा निवडणूक अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी दिली.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळEVM Machineएव्हीएम मशीन