शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Maharashtra Election 2019 ; भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना बढतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

२०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली गेली.

ठळक मुद्देदोघांना हवे कॅबिनेट : महत्त्वाच्या खात्यांवर नजरा

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभेची नवी टर्म जिंकल्याने जिल्ह्यातील भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना आपल्या डोक्यावरील लालदिवा कायम ठेवण्याचे तसेच कॅबिनेट पदावर बढती मिळविण्याचे वेध लागले आहे.जिल्ह्यातून सध्या भाजपचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे मंत्रीमंडळात आहेत. २०१९ ची निवडणूक या तिघांनीही जिंकली आहे. त्यामुळे हे तिघेही पुन्हा मंत्री बनण्याची चिन्हे आहेत. परंतु त्यांना आता बढती हवी आहे. २०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली गेली. अगदी तशाच पद्धतीने २०१४ लाच आमदारकीची हॅट्रट्रिक साधलेल्या संजय राठोड यांना धक्का दिला गेला. ते कॅबिनेटच्या प्रतीक्षेत असताना हे पद उस्मानाबाद जिल्ह्यातील परंतु यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेचे सदस्य तानाजी सावंत यांना दिले गेले. त्यामुळे भाजप व सेनेच्या दोन्ही राज्यमंत्र्यांमध्ये अन्यायाची भावना पहायला मिळत होती.२०१९ च्या निवडणुकीत मंत्रिपदावर असलेले उईके, राठोड, येरावार हे तीनही चेहरे पुन्हा निवडून आले. संजय राठोड यांची मतांची आघाडी पश्चिम विदर्भात सर्वाधिक (६३६०७) आहे. या तीनही चेहऱ्यांना आता पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले. राठोड, येरावार यांना कॅबिनेट हवे आहे. कॅबिनेट मिळाल्यास खाते कोणते? याचीही चिंता आहे. एकीकडे कॅबिनेट आणि दुसरीकडे दुर्लक्षित खाते असा प्रयोग होण्याचीही भीती आहे. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकासचे मंत्रीपद कायम राहिल, डिमोशन होणार नाही असा अंदाज आहे. जिल्ह्यात तीन दावेदार असल्याने एखाद्याला डच्चु तर मिळणार नाही ना, याची हुरहुर आहेच. कुणाकुणाला कॅबिनेट देणार असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवसेनेच्या तानाजींचा तूर्त यवतमाळशी संबंध संपल्याने संजय राठोड यांच्या बढतीतील अडसर दूर झाल्याचेही मानले जाते.जिल्हा मुख्यालयी निसटता विजयजिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी सहा जागा भाजपने लढविल्या. त्यापैकी भाजपची पुसदची जागा गेली असली तरी तेथील उमेदवार अ‍ॅड. नीलय नाईक यांनी राष्ट्रवादीला जबर टक्कर दिली. नीलय नाईक यांना तब्बल ७९४४२ मते मिळाली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक ३५ हजार ४९६ मतांची आघाडी वणीचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आहे. त्या खालोखाल राळेगावचे प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना ९८७५ तर आर्णीचे डॉ. संदीप धुर्वे यांना ३१५९ मतांची आघाडी मिळाली. सर्वात कमी २२५३ मतांची आघाडी ही जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या व पालकमंत्री म्हणून पक्षाचे नाक असलेल्या यवतमाळच्या मदन येरावार यांना मिळाली आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड