शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

Maharashtra Election 2019 ; भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना बढतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

२०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली गेली.

ठळक मुद्देदोघांना हवे कॅबिनेट : महत्त्वाच्या खात्यांवर नजरा

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभेची नवी टर्म जिंकल्याने जिल्ह्यातील भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना आपल्या डोक्यावरील लालदिवा कायम ठेवण्याचे तसेच कॅबिनेट पदावर बढती मिळविण्याचे वेध लागले आहे.जिल्ह्यातून सध्या भाजपचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे मंत्रीमंडळात आहेत. २०१९ ची निवडणूक या तिघांनीही जिंकली आहे. त्यामुळे हे तिघेही पुन्हा मंत्री बनण्याची चिन्हे आहेत. परंतु त्यांना आता बढती हवी आहे. २०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली गेली. अगदी तशाच पद्धतीने २०१४ लाच आमदारकीची हॅट्रट्रिक साधलेल्या संजय राठोड यांना धक्का दिला गेला. ते कॅबिनेटच्या प्रतीक्षेत असताना हे पद उस्मानाबाद जिल्ह्यातील परंतु यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेचे सदस्य तानाजी सावंत यांना दिले गेले. त्यामुळे भाजप व सेनेच्या दोन्ही राज्यमंत्र्यांमध्ये अन्यायाची भावना पहायला मिळत होती.२०१९ च्या निवडणुकीत मंत्रिपदावर असलेले उईके, राठोड, येरावार हे तीनही चेहरे पुन्हा निवडून आले. संजय राठोड यांची मतांची आघाडी पश्चिम विदर्भात सर्वाधिक (६३६०७) आहे. या तीनही चेहऱ्यांना आता पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले. राठोड, येरावार यांना कॅबिनेट हवे आहे. कॅबिनेट मिळाल्यास खाते कोणते? याचीही चिंता आहे. एकीकडे कॅबिनेट आणि दुसरीकडे दुर्लक्षित खाते असा प्रयोग होण्याचीही भीती आहे. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकासचे मंत्रीपद कायम राहिल, डिमोशन होणार नाही असा अंदाज आहे. जिल्ह्यात तीन दावेदार असल्याने एखाद्याला डच्चु तर मिळणार नाही ना, याची हुरहुर आहेच. कुणाकुणाला कॅबिनेट देणार असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवसेनेच्या तानाजींचा तूर्त यवतमाळशी संबंध संपल्याने संजय राठोड यांच्या बढतीतील अडसर दूर झाल्याचेही मानले जाते.जिल्हा मुख्यालयी निसटता विजयजिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी सहा जागा भाजपने लढविल्या. त्यापैकी भाजपची पुसदची जागा गेली असली तरी तेथील उमेदवार अ‍ॅड. नीलय नाईक यांनी राष्ट्रवादीला जबर टक्कर दिली. नीलय नाईक यांना तब्बल ७९४४२ मते मिळाली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक ३५ हजार ४९६ मतांची आघाडी वणीचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आहे. त्या खालोखाल राळेगावचे प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना ९८७५ तर आर्णीचे डॉ. संदीप धुर्वे यांना ३१५९ मतांची आघाडी मिळाली. सर्वात कमी २२५३ मतांची आघाडी ही जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या व पालकमंत्री म्हणून पक्षाचे नाक असलेल्या यवतमाळच्या मदन येरावार यांना मिळाली आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड