शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना बढतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

२०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली गेली.

ठळक मुद्देदोघांना हवे कॅबिनेट : महत्त्वाच्या खात्यांवर नजरा

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभेची नवी टर्म जिंकल्याने जिल्ह्यातील भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना आपल्या डोक्यावरील लालदिवा कायम ठेवण्याचे तसेच कॅबिनेट पदावर बढती मिळविण्याचे वेध लागले आहे.जिल्ह्यातून सध्या भाजपचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे मंत्रीमंडळात आहेत. २०१९ ची निवडणूक या तिघांनीही जिंकली आहे. त्यामुळे हे तिघेही पुन्हा मंत्री बनण्याची चिन्हे आहेत. परंतु त्यांना आता बढती हवी आहे. २०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली गेली. अगदी तशाच पद्धतीने २०१४ लाच आमदारकीची हॅट्रट्रिक साधलेल्या संजय राठोड यांना धक्का दिला गेला. ते कॅबिनेटच्या प्रतीक्षेत असताना हे पद उस्मानाबाद जिल्ह्यातील परंतु यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेचे सदस्य तानाजी सावंत यांना दिले गेले. त्यामुळे भाजप व सेनेच्या दोन्ही राज्यमंत्र्यांमध्ये अन्यायाची भावना पहायला मिळत होती.२०१९ च्या निवडणुकीत मंत्रिपदावर असलेले उईके, राठोड, येरावार हे तीनही चेहरे पुन्हा निवडून आले. संजय राठोड यांची मतांची आघाडी पश्चिम विदर्भात सर्वाधिक (६३६०७) आहे. या तीनही चेहऱ्यांना आता पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले. राठोड, येरावार यांना कॅबिनेट हवे आहे. कॅबिनेट मिळाल्यास खाते कोणते? याचीही चिंता आहे. एकीकडे कॅबिनेट आणि दुसरीकडे दुर्लक्षित खाते असा प्रयोग होण्याचीही भीती आहे. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकासचे मंत्रीपद कायम राहिल, डिमोशन होणार नाही असा अंदाज आहे. जिल्ह्यात तीन दावेदार असल्याने एखाद्याला डच्चु तर मिळणार नाही ना, याची हुरहुर आहेच. कुणाकुणाला कॅबिनेट देणार असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवसेनेच्या तानाजींचा तूर्त यवतमाळशी संबंध संपल्याने संजय राठोड यांच्या बढतीतील अडसर दूर झाल्याचेही मानले जाते.जिल्हा मुख्यालयी निसटता विजयजिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी सहा जागा भाजपने लढविल्या. त्यापैकी भाजपची पुसदची जागा गेली असली तरी तेथील उमेदवार अ‍ॅड. नीलय नाईक यांनी राष्ट्रवादीला जबर टक्कर दिली. नीलय नाईक यांना तब्बल ७९४४२ मते मिळाली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक ३५ हजार ४९६ मतांची आघाडी वणीचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आहे. त्या खालोखाल राळेगावचे प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना ९८७५ तर आर्णीचे डॉ. संदीप धुर्वे यांना ३१५९ मतांची आघाडी मिळाली. सर्वात कमी २२५३ मतांची आघाडी ही जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या व पालकमंत्री म्हणून पक्षाचे नाक असलेल्या यवतमाळच्या मदन येरावार यांना मिळाली आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड