शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: January 6, 2015 23:10 IST

वणी तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. ते तालुक्याचा ठिकाणी

नांदेपेरा : वणी तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. ते तालुक्याचा ठिकाणी राहून कार्यालयाचा कारभार हाकत आहे. परिणामी जनतेची कामे खोळंबली आहेत. ग्रामस्थांना कामासाठी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या शोधासाठी आर्थिक खर्च व पायपीट करावी लागत आहे.शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यालयी राहून त्यांनी जनतेची कामे करावीत, असा हेतू आहे. मात्र या हेतूलाच आता तिलांजली दिली जात आहे. अनेक कर्मचारी मुख्यालयी भेटणे दुरापास्त झाले आहेत. शिक्षक आणि तलाठी यांनी तर मुख्यालयाला खो दिला आहे. ग्रामीण भागातील शाळांवर कार्यरत बहुतांश शिक्षक तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. शाळेत १० वाजता पोहोचणे व सायंकाळी ५ वाजता परत जाण्यासाठी त्यांची घाई सुरू असते. सायंकाळी ५ वाजताच शिक्षकांना घराची ओढ लागते. कधी एकदाचे ५ वाजतात, याची त्यांना प्रतीक्षा असते. यात महिला कर्मचारी तर सतत घडाळ्याकडेच बघत बसतात. त्यामुळे घराची ओढ लागलेल्या या शिक्षकांकडून उत्कृष्ठ ज्ञानार्जनाच्या कार्याची अपेक्षा पालक करूच शकत नाहीत. संबंधित गावात घर मिळत नसल्याची ओरड त्यांच्याकडून होते. बहुधा ती खरीही असावी. मात्र अनेक गावांमध्ये सहज घर मिळू शकते. तरीही तेथे कुणी राहात नाहीत. मात्र मुख्यालयी राहात असल्याचे खोटे दाखले ग्रामपंचायत व शिक्षण समितीचा पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून दिले जाते. या दाखल्यावरूनच त्याचे वेतन निघते.तलाठीसुद्धा मुख्यालयी राहात नाही. एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असतो. त्यामुळे एका गावातील ग्रामस्थाने विचारले, तर ते दुसऱ्या गावात असल्याचे सांगतात. दुसऱ्या गावातील ग्रामस्थाने विचारले, तर तिसऱ्या आणि तिसऱ्याने विचारले तर चौथ्या गावात असल्याचे ठोकून देतात. प्रत्यक्षात बहुतांश तलाठी यापैकी कोणत्याच गावात नसतात. ते तालुक्याच्या ठिकाणी ठाण मांडून दिसतात. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक तालका स्थळी पोहोचून कामे करवून घ्यावी लागतात. यात त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात.वणी तालुक्यात शासनाने कर्मचाऱ््यांना नक्षल भत्ता लागू केला आहे. या सोभतच कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताही मिळतो. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हे भत्ते पदरात पाडून घेतले जातात. हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र तरीदेखील कर्मचाऱ्यांचा घरभाडे अथवा व नक्षल भत्ता कपात करण्याची तसदी ते घेत नाहीत. कारण कर्मचारी संघटना बळकट असतात. त्यांचा रोष ओढवून घेणे त्यांना कठीण जाते.शासकीय सेवेत रूजू होताना मुख्यालयी राहून काम करण्याची अट असते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनागोंदी कारभार सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, हासुद्धा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीत जनता व शासनाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवकांनी तर कहर केला आहे. दुपारी १२ वाजता गावात पोहोचणे, ३ वाजता परत जाणे, असे प्रकार सर्रास सुरू आहे. बहुतांश ग्रामसेवकही मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे त्यांना गाव, विकास, गावाची कामे जनतेच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे असल्याचे दिसत नाही. (वार्ताहर)