शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदीला पहिल्याच दिवशी खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

यवतमाळ, पूसद आणि पांढरकवडा हे तीनही शहरे अतिधोकादायक अवस्थेत आहे. यामुळे या शहरांवर विशेष नजर ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला मिळाल्या आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत शहरात जमावबंदी करण्याचे आदेश लागू केले आहे. या आदेशानुसार पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर गुन्हा आहे.

ठळक मुद्देचौकाचौकांमध्ये गर्दी : पाेलीस यंत्रणा दिसेना, महसूलची यंत्रणा फिरकलीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा धोका जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्ह्यामध्ये जमावबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी लागू केले आहेत. गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र शुक्रवारी या आदेशाचे पालन होताना शहरामध्ये फारसे पहायला मिळाले नाही. शहरातील चौकाचौकांमध्ये पूर्वीप्रमाणेच गर्दीचे चित्र कायम होते. काही जणांनी मास्क लावले तर अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे विदारक चित्र पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. यवतमाळ, पूसद आणि पांढरकवडा हे तीनही शहरे अतिधोकादायक अवस्थेत आहे. यामुळे या शहरांवर विशेष नजर ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला मिळाल्या आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत शहरात जमावबंदी करण्याचे आदेश लागू केले आहे. या आदेशानुसार पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर गुन्हा आहे. मात्र यानंतरही शहरातील दत्त चौक, मुख्यबाजारपेठ, भाजीबाजार, शनिमंदिर चौक, कळंब चौक, भाजी मंडी, आर्णी नाका, बसस्थानक यांसह विविध भागांमध्ये पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी पहायला मिळाली. या ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांनी ग्रुपने खरेदी करतानाचे चित्र कायम होते. अनेक जण तोंडाला मास्क न लावता वस्तू खरेदी करतानाचे चित्र सर्वत्र होते. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने मास्क लावले नाही अशा व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला आहे. यामुळे पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई होणे अपेक्षित होते. प्र्त्यक्षात कारवाई करणारी यंत्रणाच उपस्थित नव्हती. कारवाई करण्यासाठी तहसीलदार, एसडीओ, पोलीस विभाग, नगर परिषद यांना अधिकार देण्यात आले आहे. मात्र शासकीय सुटी असल्याने कर्मचारी कामावरच नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले. कारवाई करणारी यंत्रणा गायब असल्याने नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक राहिला नाही. यातूनच मास्क न लावता नागरिक शहरात फिरताना दिसत होते.

अखेर जिल्हाधिकाऱ्यांना उतरावे लागले रस्त्यावर  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. त्या अंतर्गत विविध निर्बंध घालण्यात आले आहे. बाजारपेठेची वेळ सायंकाळी ८, तर हाॅटेल-रेस्टाॅरंटची वेळ ९.३० पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. या निर्बंधाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शुक्रवारी सायंकाळी स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत फेरफटका मारला. विनामास्क दिसलेल्या ४० जणांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी बसस्थानक चाैक व इतरही भागाला भेटी दिल्या. पायी फिरून नागरिकांना निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, डाॅ. विजय अग्रवाल आदी होते. खुद्द जिल्हाधिकारी दिसल्याने मास्क टाळणाऱ्यांची भंबेरी उडाली.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी