शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

Lok Sabha Election 2019; भावना गवळी म्हणतात, रडण्यापेक्षा लढण्यावर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:17 IST

राजकारणात पावलागणिक आव्हानं असतात. महिला म्हणून तुम्हाला कोणी सहानुभूती दाखवत नसते. इथे स्वत:च स्वत:ला सिद्ध करावे लागते. रडण्यापेक्षा लढण्यावर मी विश्वास ठेवते, त्यामुळेच विजयाबाबत कॉन्फिडंट आहे.

ठळक मुद्देविजय माझाच : काँग्रेसने कामच केले नाही, तर आव्हान कसले?

यवतमाळ : राजकारणात पावलागणिक आव्हानं असतात. महिला म्हणून तुम्हाला कोणी सहानुभूती दाखवत नसते. इथे स्वत:च स्वत:ला सिद्ध करावे लागते. रडण्यापेक्षा लढण्यावर मी विश्वास ठेवते, त्यामुळेच विजयाबाबत कॉन्फिडंट आहे. यावेळीही शंभर टक्के माझेच चॅन्सेस आहेत, असा विश्वास शिवसेना-भाजप युतीच्या लोकसभेच्या उमेदवार भावना गवळी यांनी व्यक्त केला.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या भावना गवळी सध्या प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. याच धावपळीत त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.त्या म्हणाल्या, माझी फाईट वंचित बहुजन आघाडीशी असेल. कारण दलित, मुस्लीम मते असा हिशेब करून ते प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचे मला आव्हान वाटत नाही. कारण त्यांनी मंत्री, उपसभापतीपद, प्रदेश अध्यक्षपद सांभाळले मात्र ते स्वत:च्या मुलालाही निवडून आणू शकले नाही. राहुल ठाकरेंना दुसऱ्या क्रमांकाचीही मते मिळू शकली नव्हती. त्यांनी या भागासाठी कोणते काम केले? स्वत:ची गिरणीही सांभाळू शकले नाही. ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होत असते.पण तुम्हाला पक्षांतर्गत विरोध होतोय, त्याचे काय? या प्रश्नावर गवळी म्हणाल्या, मला कुणाचाच विरोध नाही. विरोधक मुद्दाम अशा शंका पसरविण्याचे काम करीत आहे. भाजप आणि शिवसेनेचे सर्व नेते माझ्या प्रचारासाठी काम करीत आहेत. परंतु, आडे आणि वंचित आघाडीचे पवार या उमेदवारांमुळे बंजारा मते तुमच्यापासून दूर जाणार नाही का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, निलय नाईक, संजय राठोड हे आमच्या सोबत आहेत. शिवाय, वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्ग आम्ही दिग्रसपासून थेट पोहरादेवीपर्यंत नेला आहे. या मुद्द्यावर बंजारा मते आमच्यापासून फुटणार नाहीत.तुम्हाला यावेळी अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल असे दिसते, या मुद्द्यावर भावना गवळी म्हणाल्या, अँटी इन्कम्बन्सी तिसऱ्या वेळी असते. मी आता पाचव्यांदा निवडणुकीला सामोरी जात आहे. मला लोकांनी पूर्णपणे स्वीकारले आहे. निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांना भेटत नाही, अशी अनेकांची तक्रार आहे, या मुद्द्यावर भावना गवळी म्हणाल्या, बघा हा मतदारसंघ खूप मोठा आहे. प्रत्येक गावात भेट द्यायची म्हटले तर पाच वर्षही पुरणार नाही. आणि दुसरे म्हणजे, पार्लमेंट कधी अटेंड करायची मग? नंतर तुम्हीच म्हणता ना भावनातार्इंची संसदेत केवळ ७४ टक्के उपस्थिती. तरीही मतदारसंघात मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते, वेळोवेळी मेळावे घेत असते. मी खासदार असूनही आमदारासारखी, सामान्य शिवसैनिकासारखी काम करते.आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात जिल्ह्यात कोणती कामे झाली, याबाबत गवळींनी सांगितले की, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला आम्ही गती दिली. यात भूमिअधिग्रहणासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. यापूर्वी राज्यात आमची सत्ता नव्हती. अन्यथा हे काम आधीच पूर्ण करू शकलो असतो. कृषीपंपाच्या जोडण्या दिल्या. भारनियमन कमी झाले. शकुंतला रेल्वेमार्गही ब्रॉडगेज करण्याचा १९०० कोटींचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे आहे.जिल्ह्यात ‘काँग्रेस माणिकरावमुक्त’ कराभावना गवळी म्हणाल्या, गेल्यावेळी लोकसभेत काँग्रेसमुक्त भारत हा नारा होता. मात्र यंदा आपल्या जिल्ह्यापुरता तरी ‘माणिकराव मुक्त काँग्रेस करा’ असा सूर आहे. त्यांनी या जिल्ह्यासाठी काही केले नाही. मी प्लेन खासदार असूनही खर्डा प्रकल्पासाठी ९५ कोटी आणले. सुपरस्पेशालिटीसाठी १३० कोटी आणले. सेंट्रल स्कूलसाठी जागा दिली. हे काँग्रेसला का सूचले नाही? या मतदारसंघात जातीनुसार मतविभाजन होईल का हा फॅक्टरच नाही. कोण काम करतो, हेच मतदार बघत असतात.आडे भाजपचे नाहीतचभाजप बंडखोराबाबत गवळी म्हणाल्या, पी. बी. आडे हे भाजपचे नाहीतच. भाजपने त्यांना समर्थनही दिलेले नाही. जिल्हाध्यक्ष डांगे यांनी तर आडेंशी आमचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019