शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019; भाजप बंडखोरामुळे निवडणुकीत रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:04 IST

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी केल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथे आता काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम : युतीतील नेत्यांकडूनच ‘बुस्ट’वर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी केल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथे आता काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.भाजपाचे पी.बी. आडे माघार घेतात का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यांच्या माघारीसाठी प्रयत्नही झाले. मात्र त्यांनी थांबण्यास नकार दिला. त्यांनी थांबू नये म्हणून त्यांना समाजातून सर्वच पक्षात विखुरलेल्या प्रमुख चेहऱ्यांकडून पाठबळही लाभले. त्यामुळेच आडे यांचे रिमोट भाजपा-शिवसेना युतीतील नेत्यांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे.भाजपाचे बंडखोर पी.बी. आडे नेमके कुणासाठी फायद्याचे व कुणासाठी तोट्याचे यावर आता जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. बंजारा समाजाचे पाठबळ हा आडे यांचा एकमेव प्लस पॉर्इंट आहे. मात्र आडे केवळ समाजाच्या भरवशावर निवडून येणार कसे हासुद्धा प्रश्नच आहे. आडेंची उमेदवारी शिवसेनेच्या हक्कांच्या मतांना सुरुंग लावणारी ठरू शकते. कारण आडेंना मिळणारी मते ही शिवसेनेला मिळाली असती. ती मते काँग्रेसकडे वळली नसती. आडे नसते तर या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवीण पवार यांना पसंती दर्शविली असती. मात्र बंजारा समाजाची बहुतांश मते आडेंच्या मागे राहू शकतात. या उलट काँग्रेसच्या मतांचे विभाजन करणारा कोणताही मोठा उमेदवार रिंगणात नाही. काँग्रेसची दलित, मुस्लीम, कुणबी, ओबीसी ही हक्काची व्होट बँक कायम आहे. कुणबी समाजाची मते काँग्रेस व शिवसेना या दोन उमेदवारांमध्ये विभागली जातील, असा अंदाज असला तरी प्रत्यक्षात ती शक्यता कमी आहे. कारण कुणबी समाजाला यावेळी नवा पर्याय निर्माण झाला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या बाजूने दिसणारे कुणबी समाजातील प्रमुख चेहरे आता काँग्रेसच्या रॅलीत सहभागी असल्याचे पहायला मिळत आहे. आडे नसते तर बंजारा समाजाची मते काँग्रेसकडे गेली असती हा शिवसेनेचा समज खोटा ठरण्याची दाट शक्यता आहे. एकूणच भाजपाच्या बंडखोरामुळे या लोकसभा मतदारसंघात रंगत निर्माण झाली आहे. ‘बुस्ट’ देणारे युतीतील नेते अखेरपर्यंत आडेंच्या मागे राहतात का यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.२४ उमेदवार रिंगणात, दोन बॅलेट युनिट लागणारलोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आता २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. गुरुवारी सात उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणातील उमेदवारांची संख्या २६ होती. २४ उमेदवारांमुळे दोन बॅलेट युनिट लागणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा