शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात लॉकडाऊन जारी; राकेश टिकैत यांची सभा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:46 IST

Yawatmal News कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची शनिवारची सभाही रद्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकेत यांची शनिवारी २० फेब्रुवारी रोजी यवतमाळातील आझाद मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता टिकेत यांच्या सभेला परवानगी नाकारण्

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची शनिवारची सभाही रद्द करण्यात आली आहे. त्यासंबंधी माहिती देणारा व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरण्यास मनाई राहणार आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यातील मृतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनवर शासन स्तरावरून जोर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाभर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. गुरुवारी सायंकाळपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार आता बाजारपेठेची वेळ सकाळी ९ ते रात्री १० अशी राहणार आहे. हॉटेल, ढाबे, बार यांच्यासाठीही हीच वेळ ठेवण्यात आली आहे. त्यातही कोरोनाचा उद्रेक असलेल्या यवतमाळ, पुसद, पांढरकवडा या शहरांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

तहसीलदारांच्या नेतृत्वात पथके गठित करण्यात आली असून ही पथके लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवर नजर ठेवणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, यात्रा, धार्मिक कार्यक्रम यावर ब्रेक लावण्यात आला आहे. लग्नसमारंभाला केवळ ५० व्यक्तींची परवानगी राहणार आहे. त्यापेक्षा अधिक व्यक्ती दिल्यास मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी मंगल कार्यालयांवर छुप्या धाडी व तपासणीची व्युहरचना करण्यात आली आहे. हॉटेल, ढाबे, बार, रेस्टॉरन्ट येथेही मंजूर क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची मर्यादा निश्चीत करण्यात आली आहे.एकासोबत २० जणांना तपासणारकोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर राहणार आहे. आता एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपकार्तील २० जणांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. पूर्वीप्रमाणेच पॉझिटिव्ह रुग्णाचा रहिवासी परिसर चहूबाजूने सील केला जाणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrakesh tikaitराकेश टिकैत