शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरवासीयांची जीवनदायिनी पूस धरणात ४६ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

दरम्यान, २०१० ते २0१३ असे सलग चार वर्षे धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१४-२०१५ व २०१७ मध्ये धरण ओव्हरफ्लो झालेच नाही. २०१६-२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी पूस धरणात केवळ ४६.७० टक्केच जलसाठा आहे.

ठळक मुद्देपाऊस परतीच्या मार्गावर । उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे

अखिलेश अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पावसाळा सुरू होऊन साडे तीन महिने लोटले. आता पाऊस परतीच्या मार्गावर आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात केवळ ४६ टक्के पाणीसाठा आहे. परिणामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट बळावणार आहे.पूस प्रकल्पाच्या जलसाठ्यात सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात वाढ झाली नाही. मागील वर्षी ऑगस्टमध्येच धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदा धरणात केवळ ४६.७० टक्के पाणी आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. येथून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर वनवार्ला येथे ‘वसंत सागर’ म्हणजे पूस धरण आहे. हे धरण पुसदकरांसाठी जीवनदायीनी आहे. मागील १८ वर्षांची आकडेवारी बघितली तर सातदा धरण ओव्हर फ्लो झालेच नाही.दरम्यान, २०१० ते २0१३ असे सलग चार वर्षे धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१४-२०१५ व २०१७ मध्ये धरण ओव्हरफ्लो झालेच नाही. २०१६-२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी पूस धरणात केवळ ४६.७० टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगाम बहरला, तरी उन्हाळ्यात पुसदकरांना दुष्काळाचे चटके तर बसणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला.गेल्यावर्षी पूस धरणासह गाव तलाव, शेततळे, वनतळे, विहिरी, विंधन विहिरी व अन्य स्त्रोत तुडूंब भरले होते. यावर्षी पिकांना संजीवनी देणारा पाऊस पडला. खरीप हंगाम चांगला आहे. मात्र अद्याप पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहे. खरीप पिके चांगली आहे. मात्र रब्बीच्या पिकांचे काय, असा प्रश्न आहे. पूस धरणाच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाला की प्रकल्पाचा जलस्तर झपाट्याने वाढतो. मात्र यंदा नदी पात्राच्या खोऱ्यात चांगला पाऊस झाला नाही.वारा धरण झाले ‘ओव्हरफ्लो’पूस धरणाचा जलसाठा सप्टेंबर महिन्यात थोडा फार वाढला. २१ सप्टेंबरला ४६.७० टक्के जलसाठा आहे. पूस धरणाच्या वरील वारा धरण २० ऑगस्टलाच ओव्हर फ्लो झाल्याने आता पूस धरणाचा जलसाठा निश्चित झपाट्याने वाढेल, अशी माहिती पालिकेचे पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांनी दिली.

टॅग्स :Damधरण