शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

पंतप्रधानांचे ऐका, ऐकून लगेच कळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 07:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जानेवारी दिल्लीत निवडक विद्यार्थी पालकांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहेत. हा लाईव्ह कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पाहण्याचे, पाहण्याची सुविधा नसेल तर ऐकण्याचे आदेश आहेत.

ठळक मुद्देसुविधांची बोंबाबोंब ‘परीक्षा पे चर्चा’ घेणार शाळांची परीक्षा

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जानेवारी दिल्लीत निवडक विद्यार्थी पालकांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहेत. हा लाईव्ह कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पाहण्याचे, पाहण्याची सुविधा नसेल तर ऐकण्याचे आदेश आहेत. विशेष म्हणजे, कार्यक्रम संपताच एका तासाच्या आत प्रत्येक शाळेचा अहवाल थेट पंतप्रधान कार्यालयाला छायाचित्रांसह पाठवायचा आहे. अनेक शाळांमध्ये वीज, टीव्ही आदी सुविधांची वानवा असताना हा कार्यक्रम म्हणजे शाळांसाठी परीक्षाच ठरण्याची शक्यता आहे.इयत्ता सहावीच्या पुढील प्रत्येक वर्गाने हा कार्यक्रम पाहणे बंधनकारक असल्याचा आदेश विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी दिला आहे. २९ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ असा दोन तासांचा कार्यक्रम होणार आहे. यात दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नववी ते बारावीचे निवडक विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक आदींशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार आहेत. या कार्यक्रमाचे टीव्हीद्वारे, रेडीओद्वारे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर, फेसबुकवर, यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत दाखविण्याचा आदेश आहे.हा कार्यक्रम किती शाळांनी, त्यातील किती विद्यार्थ्यांनी पाहिला, ऐकला याचा अहवाल तासाभरात शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्या प्राधिकरणाच्या आॅनलाईन लिंकवर भरायचा आहे. तर विद्या प्राधिकरणाने संपूर्ण राज्याचा अहवाल एकत्र करून तासाभरातच पंतप्रधान कार्यालयाला पाठवायचा आहे. विशेष म्हणजे, अहवाल भरण्याची लिंक दुपारी २ वाजताच बंद केली जाणार आहे. या अहवालात विद्यार्थी कार्यक्रम पाहात असल्याचे पाच उत्तम छायाचित्रही जोडायचे आहेत. व्हीडीओ क्लिपही काढून जोडायची आहे.त्यामुळे कार्यक्रम सुरू असतानाच शाळांना अहवाल लिहिणे, छायाचित्रे जोडणे ही कामे करावी लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यासाठी अनेक शाळांमध्ये वीजपुरवठा नाही.अनेक शाळांचा वीजपुरवठा देयक थकित असल्याने खंडित करण्यात आला आहे. काही शाळांमध्ये वीज असली तरी टीव्ही संच नाही. बहुतांश ठिकाणी शिक्षकाच्या मोबाईलवर कार्यक्रम पाहण्याची वेळ येणार आहे. पण दुर्गम भागातील शाळांमध्ये मोबाईलची रेंज नसते. रेंज असली, तर एक-दोन शिक्षकांच्या मोबाईलवर ४०-५० विद्यार्थी कार्यक्रमाचा आनंद कसा घेतली, हा प्रश्न आहे.

अधिकारीच रडारवरदोन तासांचा कार्यक्रम संपताच एका तासाच्या आत अहवाल पंतप्रधान कार्यालयाला हवा आहे. महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्यात काही हजार शाळा आहेत. त्यामुळे तासाभरात प्रत्येक शाळेचा अहवाल भरणे अशक्य आहे. त्यातच एकाच वेळी सर्व शाळांची घाई होणार असल्याने विद्या प्राधिकरणाची लिंक फेल होण्याचीही दाट शक्यता आहे. पण अहवाल वेळेत न मिळाल्यास संबंधित शिक्षणाधिकाºयांवर जबाबदारी निश्चत केली जाणार आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी