शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचे ऐका, ऐकून लगेच कळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 07:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जानेवारी दिल्लीत निवडक विद्यार्थी पालकांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहेत. हा लाईव्ह कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पाहण्याचे, पाहण्याची सुविधा नसेल तर ऐकण्याचे आदेश आहेत.

ठळक मुद्देसुविधांची बोंबाबोंब ‘परीक्षा पे चर्चा’ घेणार शाळांची परीक्षा

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जानेवारी दिल्लीत निवडक विद्यार्थी पालकांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहेत. हा लाईव्ह कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पाहण्याचे, पाहण्याची सुविधा नसेल तर ऐकण्याचे आदेश आहेत. विशेष म्हणजे, कार्यक्रम संपताच एका तासाच्या आत प्रत्येक शाळेचा अहवाल थेट पंतप्रधान कार्यालयाला छायाचित्रांसह पाठवायचा आहे. अनेक शाळांमध्ये वीज, टीव्ही आदी सुविधांची वानवा असताना हा कार्यक्रम म्हणजे शाळांसाठी परीक्षाच ठरण्याची शक्यता आहे.इयत्ता सहावीच्या पुढील प्रत्येक वर्गाने हा कार्यक्रम पाहणे बंधनकारक असल्याचा आदेश विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी दिला आहे. २९ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ असा दोन तासांचा कार्यक्रम होणार आहे. यात दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नववी ते बारावीचे निवडक विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक आदींशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार आहेत. या कार्यक्रमाचे टीव्हीद्वारे, रेडीओद्वारे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर, फेसबुकवर, यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत दाखविण्याचा आदेश आहे.हा कार्यक्रम किती शाळांनी, त्यातील किती विद्यार्थ्यांनी पाहिला, ऐकला याचा अहवाल तासाभरात शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्या प्राधिकरणाच्या आॅनलाईन लिंकवर भरायचा आहे. तर विद्या प्राधिकरणाने संपूर्ण राज्याचा अहवाल एकत्र करून तासाभरातच पंतप्रधान कार्यालयाला पाठवायचा आहे. विशेष म्हणजे, अहवाल भरण्याची लिंक दुपारी २ वाजताच बंद केली जाणार आहे. या अहवालात विद्यार्थी कार्यक्रम पाहात असल्याचे पाच उत्तम छायाचित्रही जोडायचे आहेत. व्हीडीओ क्लिपही काढून जोडायची आहे.त्यामुळे कार्यक्रम सुरू असतानाच शाळांना अहवाल लिहिणे, छायाचित्रे जोडणे ही कामे करावी लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यासाठी अनेक शाळांमध्ये वीजपुरवठा नाही.अनेक शाळांचा वीजपुरवठा देयक थकित असल्याने खंडित करण्यात आला आहे. काही शाळांमध्ये वीज असली तरी टीव्ही संच नाही. बहुतांश ठिकाणी शिक्षकाच्या मोबाईलवर कार्यक्रम पाहण्याची वेळ येणार आहे. पण दुर्गम भागातील शाळांमध्ये मोबाईलची रेंज नसते. रेंज असली, तर एक-दोन शिक्षकांच्या मोबाईलवर ४०-५० विद्यार्थी कार्यक्रमाचा आनंद कसा घेतली, हा प्रश्न आहे.

अधिकारीच रडारवरदोन तासांचा कार्यक्रम संपताच एका तासाच्या आत अहवाल पंतप्रधान कार्यालयाला हवा आहे. महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्यात काही हजार शाळा आहेत. त्यामुळे तासाभरात प्रत्येक शाळेचा अहवाल भरणे अशक्य आहे. त्यातच एकाच वेळी सर्व शाळांची घाई होणार असल्याने विद्या प्राधिकरणाची लिंक फेल होण्याचीही दाट शक्यता आहे. पण अहवाल वेळेत न मिळाल्यास संबंधित शिक्षणाधिकाºयांवर जबाबदारी निश्चत केली जाणार आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी