शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:35 IST

तहसील चौक ते गोदनी रोड या मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

ठळक मुद्देहजारो लिटर पाण्याचा अपव्यय : भरउन्हाळ्यात रस्त्यावर पूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तहसील चौक ते गोदनी रोड या मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. एकीकडे यवतमाळकर नागरिकांची बालटीभर पाण्यासाठी भटकंती होत असताना गोदनी मार्गावर मात्र भरउन्हाळ्यात रस्त्यावर पूर वाहत असल्याचे चित्र होते. उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव नागरिकांना आला.गोदनी मार्गावर महानेटच्या भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मशीनने रस्त्याला व कडेला छिद्र पाडले जात आहे. शुक्रवारी सकाळी हे काम सुरू असतानाच या मशीनने अचानक ३०० मिमीच्या प्रमुख जलवाहिनीला छिद्र पडले. त्यामुळे क्षणार्धात रस्त्यावर पाणी वाहू लागले. पाहता पाहता अवघ्या काही वेळात रस्त्यावर जणू गंगा अवतरली. पाण्याचे पाट पोलीस ठाण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहत आले. ऐन उन्हाळ्यात रस्त्यावरून पावसाळ्यासारखे पूर वाहत असल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.विशेष असे जीवन प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर ही जलवाहिनी फुटली असताना त्यातून होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्राधिकरणाच्या अभियंते-कर्मचाऱ्यांकडून तातडीचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. पाण्याच्या या अपव्यय प्रकरणी प्राधिकरणाने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात महानेटच्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र या कंत्राटदाराकडून अपव्यय झालेल्या हजारो लिटर पाण्याची किंमत प्राधिकरण वसूल करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरते.यवतमाळ शहरात अनेक भागात जलवाहिन्या लिकेज आहेत. कित्येक ठिकाणी तर नाल्यांमध्ये हे लिकेज असल्याने घाण पाणी त्यातून घराघरात पोहोचते. हे लिकेज थांबविण्यासाठी नागरिकांकडून प्राधिकरणाला कित्येकदा निवेदने देण्यात आली, विनंत्या करण्यात आल्या. मात्र लिकेजेस थांबले नाहीत. आजही त्यातून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. तर या फुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणी नागरिकांच्या घरात पोहोचते आहे. त्यामुळे आबालवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठ्याच्या थकीत वसुलीसाठी जोर देणारी प्राधिकरणाची यंत्रणा सेवा देताना मात्र ‘आमच्याकडे मनुष्यबळ नाही’ हे नेहमीचे उत्तर देताना दिसते. शुक्रवारी प्राधिकरणाला आपल्या कार्यालयासमोरील फुटलेल्या जलवाहिनीतून होणारा पाण्याचा अपव्यय तातडीने थांबविता आला नाही, यावरून प्राधिकरणाची यंत्रणा गलीबोळातील लिकेजेस खरोखरच किती तत्परतेने दुरुस्त करीत असतील याचा अंदाज येतो.नागरिक नळावर, पाणी मात्र रस्त्यावरयवतमाळकर जनता पाण्यासाठी भटकंती करीत आहे. अनेक मागास वस्त्यांना, शहराच्या टोकावरील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ-दहा दिवसातून एकदा नळ सोडले जात आहे. त्याचीही वेळ नक्की नाही. त्यामुळे नागरिकांना रात्री बेरात्री उठून नळावर नजर ठेवावी लागत आहे. अनेक भागात तर बकेटभर पाणी मिळविणेही कठीण झाले आहे. एकीकडे ही स्थिती असताना गोदनी रोडवर मात्र नेमकी त्याच्या उलट स्थिती पहायला मिळाली. तेथील जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. टंचाईचा सामना करणारे नागरिक पाण्याचा हा अपव्यय पाहून हळहळताना दिसले.पाणीपुरवठा खंडित होणारपाईप लाईन दुरुस्त होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे. महानेटच्या भूमिगत केबलिंगच्या कामामुळे गोधनी रोडवर २१ इंच मुख्य पाईपलाईन क्षतिग्रस्त झाली आहे. दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने निळोणा जलशुध्दीकरण केंद्राचे पंपिंग बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित राहणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी कळविले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई