शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:35 IST

तहसील चौक ते गोदनी रोड या मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

ठळक मुद्देहजारो लिटर पाण्याचा अपव्यय : भरउन्हाळ्यात रस्त्यावर पूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तहसील चौक ते गोदनी रोड या मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. एकीकडे यवतमाळकर नागरिकांची बालटीभर पाण्यासाठी भटकंती होत असताना गोदनी मार्गावर मात्र भरउन्हाळ्यात रस्त्यावर पूर वाहत असल्याचे चित्र होते. उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव नागरिकांना आला.गोदनी मार्गावर महानेटच्या भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मशीनने रस्त्याला व कडेला छिद्र पाडले जात आहे. शुक्रवारी सकाळी हे काम सुरू असतानाच या मशीनने अचानक ३०० मिमीच्या प्रमुख जलवाहिनीला छिद्र पडले. त्यामुळे क्षणार्धात रस्त्यावर पाणी वाहू लागले. पाहता पाहता अवघ्या काही वेळात रस्त्यावर जणू गंगा अवतरली. पाण्याचे पाट पोलीस ठाण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहत आले. ऐन उन्हाळ्यात रस्त्यावरून पावसाळ्यासारखे पूर वाहत असल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.विशेष असे जीवन प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर ही जलवाहिनी फुटली असताना त्यातून होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्राधिकरणाच्या अभियंते-कर्मचाऱ्यांकडून तातडीचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. पाण्याच्या या अपव्यय प्रकरणी प्राधिकरणाने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात महानेटच्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र या कंत्राटदाराकडून अपव्यय झालेल्या हजारो लिटर पाण्याची किंमत प्राधिकरण वसूल करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरते.यवतमाळ शहरात अनेक भागात जलवाहिन्या लिकेज आहेत. कित्येक ठिकाणी तर नाल्यांमध्ये हे लिकेज असल्याने घाण पाणी त्यातून घराघरात पोहोचते. हे लिकेज थांबविण्यासाठी नागरिकांकडून प्राधिकरणाला कित्येकदा निवेदने देण्यात आली, विनंत्या करण्यात आल्या. मात्र लिकेजेस थांबले नाहीत. आजही त्यातून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. तर या फुटलेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणी नागरिकांच्या घरात पोहोचते आहे. त्यामुळे आबालवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठ्याच्या थकीत वसुलीसाठी जोर देणारी प्राधिकरणाची यंत्रणा सेवा देताना मात्र ‘आमच्याकडे मनुष्यबळ नाही’ हे नेहमीचे उत्तर देताना दिसते. शुक्रवारी प्राधिकरणाला आपल्या कार्यालयासमोरील फुटलेल्या जलवाहिनीतून होणारा पाण्याचा अपव्यय तातडीने थांबविता आला नाही, यावरून प्राधिकरणाची यंत्रणा गलीबोळातील लिकेजेस खरोखरच किती तत्परतेने दुरुस्त करीत असतील याचा अंदाज येतो.नागरिक नळावर, पाणी मात्र रस्त्यावरयवतमाळकर जनता पाण्यासाठी भटकंती करीत आहे. अनेक मागास वस्त्यांना, शहराच्या टोकावरील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ-दहा दिवसातून एकदा नळ सोडले जात आहे. त्याचीही वेळ नक्की नाही. त्यामुळे नागरिकांना रात्री बेरात्री उठून नळावर नजर ठेवावी लागत आहे. अनेक भागात तर बकेटभर पाणी मिळविणेही कठीण झाले आहे. एकीकडे ही स्थिती असताना गोदनी रोडवर मात्र नेमकी त्याच्या उलट स्थिती पहायला मिळाली. तेथील जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. टंचाईचा सामना करणारे नागरिक पाण्याचा हा अपव्यय पाहून हळहळताना दिसले.पाणीपुरवठा खंडित होणारपाईप लाईन दुरुस्त होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे. महानेटच्या भूमिगत केबलिंगच्या कामामुळे गोधनी रोडवर २१ इंच मुख्य पाईपलाईन क्षतिग्रस्त झाली आहे. दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने निळोणा जलशुध्दीकरण केंद्राचे पंपिंग बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित राहणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी कळविले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई