शहरं
Join us  
Trending Stories
1
हाडे तुटली, आतड्या फाटल्या, अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचा भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर
2
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
3
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
4
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
5
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
6
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
7
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
8
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
9
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
10
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
11
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
12
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
13
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
14
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
15
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
16
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
17
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
20
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा

यवतमाळातील मृत शेतकऱ्याच्या मुलीचे थेट राष्ट्रपतींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 12:50 IST

यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने राजकीय व्यवस्थेला हादरे बसले. मृत शेतकऱ्याच्या मुलीने पंतप्रधानांचा निषेध करीत थेट राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविले.

ठळक मुद्देगावकरी पाठवणार एक लाख पत्रमाझ्या बाबाच्या आत्महत्येला पंतप्रधानच जबाबदार

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्याला नव्या नाहीत. पण परवा एका शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने राजकीय व्यवस्थेला हादरे बसले. तीन दिवस या शेतकऱ्याचा मृतदेह ताटकळत राहिल्यावरही सरकारकडून दखल घेतली गेली नाही. अखेर मृत शेतकऱ्याच्या मुलीने पंतप्रधानांचा निषेध करीत थेट राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविले. तिच्या पाठोपाठ आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येत राष्ट्रपतींना एक लाख पत्र पाठविण्याची मोहीमच उघडली आहे.देशाला लोकशाही देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी गावात ही मोहीम सुरू करण्यात आली.राजूरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या करताना ‘माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील’ अशी चिठ्ठी मागे ठेवली होती. त्यावरून त्यांची मुलगी जयश्री चायरे हिने घाटंजी पोलीस ठाण्यात नरेंद्र मोदींविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी तक्रारही नोंदविली आहे. तर शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने गुन्हा दाखल होईपर्यंत आणि कुटुंबीयांना एक कोटीची मदत होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र तीन दिवस ताटकळत राहिल्यावरही सरकारने दखल घेतली नाही. अखेर माजी खासदार नाना पटोले यांनी मध्यस्थी करून अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना राजी केले.परंतु, अद्यापही न्याय न भेटल्याने शंकर चायरे यांची बीएससी करत असलेली मुलगी जयश्री हिने थेट पंतप्रधानांच्या निषेधाचे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस तिने निवडला. शनिवारी राजूरवाडी गावातीलच छोट्याशा पत्रपेटीत तिने राष्ट्रपतींच्या नावे पोस्टकार्ड टाकले.माझ्या बाबाच्या आत्महत्येला पंतप्रधानच जबाबदार आहेत, असे लिहितानाच जयश्रीने या पत्रात वडीलांच्या दैनावस्थेची कहाणी मांडली आहे. चायरे कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असलेले अख्खे राजूरवाडी गाव यावेळी तिच्यासोबत उपस्थित होते.तसेच शेतकरी सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार उपस्थित होते. जयश्रीनंतर लगेच एका रांगेत येऊन प्रत्येक गावकऱ्यानेही राष्ट्रपतींना पत्र पाठविले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध पवित्रा घेणे आणि त्यासाठी चक्क राष्ट्रपतींना साकडे घालणे, या प्रकारामुळे सध्या जिल्ह्याचे राजकीय वर्तृळ ढवळून निघाले आहे.

महिनाभर चालणार पत्रमोहीमपंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी एक लाख पत्र राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या प्रश्नाला बगल देत यवतमाळचा दौरा ऐनवेळी रद्द केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याही निषेधाचे एक लाख पत्र राज्यपालांना पाठविण्यात येत आहे. ही मोहीम आम्ही १४ एप्रिल ते १४ मे अशी महिनाभर राबविणार आहोत. रोज शेकडो पत्र मिळाल्यावर तरी व्यवस्थेला शेतकऱ्यांची परिस्थिती कळेल, अशी आशा जयश्री शंकर चायरे आणि शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या