शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

यवतमाळातील मृत शेतकऱ्याच्या मुलीचे थेट राष्ट्रपतींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 12:50 IST

यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने राजकीय व्यवस्थेला हादरे बसले. मृत शेतकऱ्याच्या मुलीने पंतप्रधानांचा निषेध करीत थेट राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविले.

ठळक मुद्देगावकरी पाठवणार एक लाख पत्रमाझ्या बाबाच्या आत्महत्येला पंतप्रधानच जबाबदार

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्याला नव्या नाहीत. पण परवा एका शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने राजकीय व्यवस्थेला हादरे बसले. तीन दिवस या शेतकऱ्याचा मृतदेह ताटकळत राहिल्यावरही सरकारकडून दखल घेतली गेली नाही. अखेर मृत शेतकऱ्याच्या मुलीने पंतप्रधानांचा निषेध करीत थेट राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविले. तिच्या पाठोपाठ आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येत राष्ट्रपतींना एक लाख पत्र पाठविण्याची मोहीमच उघडली आहे.देशाला लोकशाही देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी गावात ही मोहीम सुरू करण्यात आली.राजूरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या करताना ‘माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील’ अशी चिठ्ठी मागे ठेवली होती. त्यावरून त्यांची मुलगी जयश्री चायरे हिने घाटंजी पोलीस ठाण्यात नरेंद्र मोदींविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी तक्रारही नोंदविली आहे. तर शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने गुन्हा दाखल होईपर्यंत आणि कुटुंबीयांना एक कोटीची मदत होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र तीन दिवस ताटकळत राहिल्यावरही सरकारने दखल घेतली नाही. अखेर माजी खासदार नाना पटोले यांनी मध्यस्थी करून अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना राजी केले.परंतु, अद्यापही न्याय न भेटल्याने शंकर चायरे यांची बीएससी करत असलेली मुलगी जयश्री हिने थेट पंतप्रधानांच्या निषेधाचे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस तिने निवडला. शनिवारी राजूरवाडी गावातीलच छोट्याशा पत्रपेटीत तिने राष्ट्रपतींच्या नावे पोस्टकार्ड टाकले.माझ्या बाबाच्या आत्महत्येला पंतप्रधानच जबाबदार आहेत, असे लिहितानाच जयश्रीने या पत्रात वडीलांच्या दैनावस्थेची कहाणी मांडली आहे. चायरे कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असलेले अख्खे राजूरवाडी गाव यावेळी तिच्यासोबत उपस्थित होते.तसेच शेतकरी सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार उपस्थित होते. जयश्रीनंतर लगेच एका रांगेत येऊन प्रत्येक गावकऱ्यानेही राष्ट्रपतींना पत्र पाठविले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध पवित्रा घेणे आणि त्यासाठी चक्क राष्ट्रपतींना साकडे घालणे, या प्रकारामुळे सध्या जिल्ह्याचे राजकीय वर्तृळ ढवळून निघाले आहे.

महिनाभर चालणार पत्रमोहीमपंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी एक लाख पत्र राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या प्रश्नाला बगल देत यवतमाळचा दौरा ऐनवेळी रद्द केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याही निषेधाचे एक लाख पत्र राज्यपालांना पाठविण्यात येत आहे. ही मोहीम आम्ही १४ एप्रिल ते १४ मे अशी महिनाभर राबविणार आहोत. रोज शेकडो पत्र मिळाल्यावर तरी व्यवस्थेला शेतकऱ्यांची परिस्थिती कळेल, अशी आशा जयश्री शंकर चायरे आणि शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या