शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

चलो दिल्ली... साक्षरतेची गाडी निघाली दिल्ली दरबारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 06:58 IST

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन दिवस राष्ट्रीय मेळावा

अविनाश साबापुरे

यवतमाळ : महाराष्ट्रसह देशभरात नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे. आता या कार्यक्रमात साक्षरतेचे धडे घेत असलेल्या प्रौढांचा दिल्लीत राष्ट्रीय मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जाण्यासाठी गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यातील चौघांची तिकीट प्रशासनाने पक्की केली आहे. राज्यातून एकंदर २० जणांचे पथक मेळाव्यात सहभागी होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिल्लीच्या राष्ट्रीय बाल भवनात ६ आणि ७ फेब्रुवारीला हा मेळावा होत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील प्रातिनिधिक असाक्षर आणि नवसाक्षर स्वयंसेवी शिक्षक यात सहभागी होत आहेत. ते ५ फेब्रुवारीलाच दिल्लीत दाखल होणार आहेत. नवसाक्षर आणि असाक्षरांचे अनुभव प्रकटीकरण, स्वयंसेवकांचे चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम या मेळाव्यात होणार आहेत. 

या जिल्ह्यातून सहभाग महाराष्ट्रातून पुणे, अमरावती, गडचिरोली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून या मेळाव्यात चार अधिकारी, दोन असाक्षर, दोन स्वयंसेवक, दहा कलाकार आणि दोन विशेष निमंत्रित अशा २० जणांचे पथक सहभागी होत आहे. 

पथक सादर करेल साक्षरतेवर हिंदी पोवाडाnमेळाव्यात कोल्हापूर डायटचे अधिव्याख्याता तुकाराम कुंभार यांच्या नेतृत्वात दहा जणांचे कलापथक साक्षरतेवर हिंदी पोवाडा सादर करणार आहे. nअभियानासाठी प्रेरणादायी ठरलेल्या रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण व तिच्या पालकांना केंद्र शासनाकडून विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. 

राज्यातून तीन लाखांवर प्रौढांची नोंदणीमोहिमेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील तीन लाख ३८ हजार ८० निरक्षर नागरिकांनी ‘उल्लास’ ॲपवर नावनोंदणीकेली आहे, त्यांना शिकविण्यासाठी तब्बल ४५ हजार ८६२ तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :delhiदिल्ली