शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

कामांचा दर्जा सोडा, दिशाही भरकटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:48 AM

कळंब - नगरपंचायतच्या काळात कळंब शहरात कोट्यवधी रुपये विकासकामांच्या नावावर खर्ची घालण्यात आले; परंतु कामाचा दर्जा तर सोडा दिशाही ...

कळंब - नगरपंचायतच्या काळात कळंब शहरात कोट्यवधी रुपये विकासकामांच्या नावावर खर्ची घालण्यात आले; परंतु कामाचा दर्जा तर सोडा दिशाही भरकटली आहे. नियोजनाच्या अभावामुळे शहर भकास हाेण्याच्या मार्गावर असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

कळंब नगरपंचायतील सेना-भाजपला पहिल्याचवेळी सत्ता मिळाली. सुवर्णयोग म्हणजे स्थानिक आमदार भाजपचे आणि राज्यात सत्ताही सेना-भाजपचीच होती. त्यामुळे भरघोस निधीही मिळाला; परंतु खर्च झालेल्या निधीतून अपेक्षित आणि दर्जात्मक कामे झाली नाही. शहरातील वस्त्या अजूनही विकासापासून कोसो दूर आहेत. पावसाळ्यात तर नगरपंचायतीने केलेली ‘विकासकामे’ उघड्यावर पडतात. परिसर स्वच्छतेच्या बाबतीतही लोकांची नाराजी आहे. नियोजनाअभावी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्तारुढ पक्ष सपशेल अपयशी ठरल्याचे नागरिकांतूनच बोलले जात आहे. अनेक ले-आऊटमध्ये पक्के रस्ते तर सोडा सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्याही नाहीत. त्यामुळे नगरसेवकांकडून शहरवासीयांचा अपेक्षाभंग झाला आहे

बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर

मागील काही महिन्यांत अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. काही कामे अजूनही सुरू आहेत. त्यातील अनेक कामांचा दर्जा राखता आलेला नाही. आतापासूनच सिमेंट रस्ते उखडायला लागले आहे. नाल्यांची उपयोगिता ‘उघड्यावर’ पडली आहे.

अतिक्रमण मूळ समस्या

शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली जात आहेत. एवढेच नाही तर मुख्य रस्तेही अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणे गरजेचे आहे.

अनेक भागाला येते तळ्याचे स्वरूप

नियोजनशून्य आणि दर्जाहिन कामांमुळे सुविधेऐवजी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. येथील इंदिरा चौकातील मुख्य बाजारपेठेत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रोडमुळे थोडे जरी पाणी आले, की थेट दुकानात शिरते. त्यामुळे लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान होते. जोडमोहा रोड व इतर भागाला तळ्याचे स्वरुप येते. या मूलभूत समस्या सोडविण्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.

चिखलमय रस्त्यांमुळे असुविधा

चिखलमय रस्ते आणि नाल्यांअभावी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ले-आऊटला मान्यता देण्यापूर्वी सर्व संबंधित विभागाकडून संपूर्ण आवश्यक सुविधा का करून घेतल्या जात नाही, असा प्रश्न यानिमित्तान उपस्थित होतो. आर्थिक देवाणघेवाणीतून हे सर्व प्रकार केल्या जात असल्याची उघड चर्चा आहे

अधिकारी लोकप्रतिनिधींचा मिलीभगत

शहरात कोट्यावधी रुपयांची कामे झाली. निकृष्ट कामांविषयी अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या परंतु संबंधितांंकडून त्याची दखल घेतली गेली नाही. लोकप्रतिनिधींनी दर्जात्मक विकासकामे व्हावी, यासाठी वेळ आणि शक्ती खर्ची घातली, असे कधी दिसून आले नाही. त्यामुळे या कामांना अधिकारी व लोकप्रतिनिधींची मिलीभगत कारणीभूत असल्याचे दिसते.

शहराला नळयोजनेची प्रतीक्षा

उन्हाळ्यामध्ये शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. २५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या नळयोजनेतूनच आजही पाणीपुरवठा केला जातो. जीर्ण व जागोजागी फुटलेल्या नळांतून दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाण्याची समस्या सोडविण्याची ‘हिंमत’ आणि महत्त्वाकांक्षा अजूनपर्यंत एकाही लोकप्रतिनिधींमध्ये दिसून आली नाही.