शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

कार्यकर्त्यांच्या भूमिकेने नेते अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 9:44 PM

अंतर्गत मतभेदातून कार्यकर्त्यांनी बंडाची भूमिका स्विकारल्याने भाजपा, सेना व कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेते सध्या अस्वस्थ आहेत. कधी नव्हे ते यावेळी एकाच पक्षातून अनेक कार्यकर्ते तिकीट मागण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : कॉंग्रेस, भाजपा, शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अंतर्गत मतभेदातून कार्यकर्त्यांनी बंडाची भूमिका स्विकारल्याने भाजपा, सेना व कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेते सध्या अस्वस्थ आहेत. कधी नव्हे ते यावेळी एकाच पक्षातून अनेक कार्यकर्ते तिकीट मागण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या या भूमिकेने नेते चिंतेत पडले आहेत.कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आता चेहरा बदल हवा आहे. त्यामुळे तब्बल १७ जणांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले आहे. त्यात कॉंग्रेसशी संलग्नित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राजूर कॉलरी येथील पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, जिल्हा परिषदेच्या विद्यमान महिला सभापती, बँक उपाध्यक्षाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण प्रस्थापित नेत्याच्या अगदी निकटस्थ मानले जातात. या ईच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या मागे मोठा राजकीय ‘गेम’ असल्याचीही चर्चा रंगत आहे.दुसरीकडे भाजपामध्ये दोन युवा कार्यकर्त्यांनीदेखील तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातील एक भाजपाच्या युवा चळवळीशी संबंधित संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे, तर दुसरा ईच्छुक उमेदवार ‘संघ’ परिवाराशी कनेक्शन ठेऊन आहे. हे दोघे विद्यमान आमदारांना तिकीटासाठी कसा शह देतील, यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.शिवसेनेत उघडपणे पडलेले दोन गट, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या एका नेत्याने पक्षातच वेगळी चूल मांडली आहे. याही पक्षात चेहरा बदल करण्याची भाषा बोलली जात आहे.सेनेतील काही नाराज कार्यकर्ते सध्या या नेत्यासोबत आहेत. मात्र वणीतील प्रस्थापित शिवसेना नेत्याला शिवसेनेतील हा नाराज गट शह देऊ शकेल काय, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मनसे आणि राष्टÑवादी कॉंग्रेसमध्ये मात्र सध्या तरी कलह पुढे आलेला नाही. या दोनही पक्षातील संभावित उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.राजकीय पक्षांच्या युतीकडे सर्वांच्या नजरावणी विधानसभा मतदार संघातील सर्वच प्रस्थापित नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असले तरी कोणत्या राजकीय पक्षाशी कुण्या पक्षाशी युती होते, हे अद्याप ठरले नाही. युती झाल्यास या पक्षांमध्ये बंडाळी वाढण्याची चिन्हे आहेत. आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी सामंजस्याने दूर करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी विविध पक्षातील नेत्यांना पार पाडावी लागणार आहे. अन्यथा उमेदवारांना त्यांच्याच पक्षातून फटाके लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा