शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

शिख बांधवांची ‘लंगर सेवा’ वाटसरूंसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

परराज्यात गेलेले मजूर व त्यांचे कुटुंबिय हे आपल्या गावी स्थलांतरीत होत आहेत. उत्तरप्रदेश, छत्तीसगड येथील तेलंगणात गेलेले असंख्य मजूर आपल्या गावाकडे स्थलांतरीत होत आहे. दररोज हैद्राबाद-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाने हजारो किलोमीटरचे अंतर पायदळ जाणाऱ्यांचे हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.

ठळक मुद्देनिराधार भुकेल्यांना मिळतेयं पोटभर अन्न, २४ तास सुरू आहे अखंड सेवा, स्थलांतरीतांनाही लाभ

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा: राष्ट्रीय महामार्गावरील करंजी गावापासून जवळच असलेल्या शिख बांधवांनी सुरू केलेली लंगर सेवा लॉकडाऊनच्या काळात असहाय्य नागरिकांसाठी वरदान ठरली असून आतापर्यंत या सेवेत हजारो असहाय्य भुकेल्या नागरिकांनी भूक भागविली आहे.कोरोना या महाभयंकर रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हापासून देशातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स, ढाबे बंद झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील ट्रकचालक व क्लिनर यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्याचप्रमाणे सर्व उद्योगधंदे, छोटे-मोठे काम, कारखाने ठप्प पडल्यामुळे मजूर वर्गाच्या हातालाही काम राहिले नाही. त्यामुळे परराज्यात गेलेले मजूर व त्यांचे कुटुंबिय हे आपल्या गावी स्थलांतरीत होत आहेत. उत्तरप्रदेश, छत्तीसगड येथील तेलंगणात गेलेले असंख्य मजूर आपल्या गावाकडे स्थलांतरीत होत आहे. दररोज हैद्राबाद-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाने हजारो किलोमीटरचे अंतर पायदळ जाणाऱ्यांचे हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे. भुकेल्या पोटाने पायदळ जाणाऱ्या या मजूर बांधवांना मार्गातील अनेकजण आपल्यापरीने मदत करित आहे. परंतु अनेकदा त्यांना कुठेही मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत तालुक्यातील करंजी या गावाजवळ शिख बांधवांचा कार सेवा डेरा त्यांच्या मदतीला धावून आला. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कार सेवा डेराच्या लंगर सेवेत या रस्त्याने जाणाºया-येणाºया भुकेल्या असहाय्य नागरिकांना पोटभर जेवण दिल्या जाते. या लंगर सेवेत भोजन केलेला प्रत्येकजण शिख बांधवांच्या या सेवेला सलाम केल्याशिवाय राहत नाही. केवळ त्यांच्या पोटाचीच सोय नाही, तर त्यांच्या आंघोळीचीसुद्धा याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सामाजिक अंतर ठेऊन कोणतेही नियम न मोडता शिख बांधवांची ही सेवा २४ तास अखंडपणे सुरू आहे.सेवेकऱ्यांकडून मानवतेचे दर्शनकोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता, कोणताही बडेजाव न करता माणुसकी जपणारी ही शिख बांधवांची दिवस-रात्रं सुरू असलेली सेवा निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. त्यांची ही सेवा पाहून अनेक दानशूर नागरिकांकडून शिख बांधवांच्या या सेवेसाठी धान्याची व इतर आवश्यक वस्तूंची मदत मिळत आहे. तालुका वकील संघटनेनेदेखिल या सामाजिक कार्यासाठी किराणा सामानाची व इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर मदत केली.या सेवेतून आपल्याला वेगळाच आनंद मिळतो - खैरा बाबाजीवन हे क्षणभंगूर आहे. आपण आज आहोत, उद्या नाही. परंतु जेवढे दिवस राहायचे आहे, तेवढे आनंदाने जगावे. दुसºयाच्या आनंदात आपला आनंद पाहावा. असहाय्य लोकांची सेवा, भुकेल्यांना अन्न ही गुरू नानकांची शिकवण होती. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. भुकेल्यांना अन्नदान करून आपल्याला आनंद मिळतो, अशी प्रतिक्रीया कारसेवा डेरा प्रमुख खैरा बाबा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक