शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

तेराव्या यादीवरच अडली कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:38 IST

कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकºयांची नावे आलेली नाहीत.

ठळक मुद्देएक लाख शेतकरी प्रतीक्षेत : ‘आयटी’ विभागाचा संथ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत. यामुळे कर्ज न मिळालेल्या शेतकºयांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली. ही प्रक्रिया राबविताना आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आॅनलाईन प्रक्रियेत नाव नोंदविताना अनेक अडचणी आल्या. सादर झालेल्या नावांमध्ये असंख्य त्रृटी असल्याची बाब मध्यंतरी पुढे आली. यावर दुरुस्ती करण्याचे काम मुंबईच्या आयटी विभागाकडे सोपविण्यात आले होते. या कालावधीत आयटी विभागाला आग लागली. तेव्हापासून ग्रीन लिस्ट प्रसिद्ध होण्याची गती मंदावली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयटी विभागाच्या प्रमुखांना त्या ठिकाणावरून हटविले. यानंतरही कामकाजाची गती वाढलेली नाही.यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया बँक स्तरावर अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ ग्रीन लिस्ट प्रसिद्ध झाल्या. यामध्ये एक लाख ९६ हजार ७७३ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले. १२७६ कोटी त्यांच्या खात्यात वळते करण्यात आले. मात्र अद्यापही एक लाख शेतकऱ्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली नाहीत. यामध्ये नावांमध्ये त्रृटी असणे, आयएफएससी कोड चुकणे, खाते क्रमांक आणि ओटीएसचे प्रकरण याबाबींचा समावेश आहे. कर्जमाफीतील कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांनी थांबविली आहे. आता नव्याने ग्रीन लिस्ट लागण्याची प्रतीक्षा केली जात आहे.प्रत्यक्षात पेरणीचा हंगाम संपला. यामुळे नवीन ग्रीन लिस्ट लागली नाही, असे बोलले जाते. आता पुढील वर्षीच नावे येतील का, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. आधीच खासगी सावकारांकडून पेरणीसाठी तजवीज करणारे शेतकरी यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. दुष्काळाने त्यामध्ये भर घातली आहे.योजना दीड लाखाची, माफी ६९ हजारांचीच कशी?जिल्ह्यात बँकांनी कर्जमाफी योजना राबविताना काही चुकाही केल्या. याचा फटका शेतकºयांना बसला. दीड लाखापर्यंत कर्जमाफी असतानाही निम्मेच पैसे माफ करण्यात आले. आता अशा शेतकºयांना नव्याने कर्जही मिळाले नाही. हे शेतकरी बँकांच्या वारंवार येरझारा मारत आहेत. त्यांना प्रतीक्षा करा, असे सांगितले जात आहे. लाडखेड सेंट्रल बँकेतील विजय गुल्हाने या शेतकऱ्याने एक लाख १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांचे ६९ हजार रुपयांचेच कर्ज माफ झाले. यामुळे त्यांना नव्याने कर्जही मिळाले नाही. हा शेतकरी बँकेच्या येरझारा मारत आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील इतरही राष्ट्रीयीकृत बँकांत घडला आहे. यावर अद्यापही पर्याय निघालेला नाही. यामुळे अर्धवट कर्जमाफी झाल्याचा आरोप जिल्ह्यातील वंचित शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज