शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मजूर म्हणतात, गाव हे फुलांचे होते, का बकाल झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

Yawatmal News १९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले.

ठळक मुद्देबगीचा सजविणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मनात दाटली खंतजगविलेली झाडे झाली मरणासन्न

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मूल जन्माला येते तेव्हा ते गोड दिसते, त्याचे कौडकौतुक होते. पण मोठे होताना संगत चुकली तर हेच गोड लेकरू समाजाच्या तिरस्काराचे कारण बनते... यवतमाळातील बगीच्यांची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. सौंदर्य विद्रूप झाले. पण हे बगीचे ज्या मजुरांनी स्वत:च्या हाताने सजविले, वाढविले, त्यांच्या दु:खाला तर पारवारच नाही. ते म्हणतात, वाळलेली झाडं पाहून पोटची पोरं उपाशी असल्यासारखे वाटते...एक हीच शंका माझीअजूनही फिटेनागाव हे फुलांचे होतेका बकाल झालेसुरेश भटांच्या या गझलेसारखाच आज सर्वसामान्य यवतमाळकरांच्या मनालाही प्रश्न पडला आहे.१९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले. नियोजन आणि कष्ट यांच्या संगमाने स्मशानभूमी एवढी देखणी झाली की, लोक येथे डबापाटीर्साठी येऊ लागले. शिक्षक शाळेच्या विद्यार्थ्यांची छोटी सहल येथे आणू लागले. यवतमाळच्या देखण्या स्मशानाची कीर्ती संपूर्ण जिल्हाभर पसरली. याच काळात गोधनी मार्गावरील नेहरू मंच, नगरभवनपुढील गार्डन, शिवाजी बाल उद्यान, नेहरू बाल उद्यान हे बगीचेही सुरावार आणि त्यांच्या मजुरांनी फुलविले, प्रसिद्ध केले.

या बगीच्यांनी यवतमाळच्या वैभवाला हिरवी श्रीमंती दिली. पण कालांतराने हे मजूरही दुर्लक्षित झाले अन् बगीचेही अडगळीत पडले. प्रशासनाने, पदाधिकाऱ्यांनी अनास्था दाखविल्यामुळे आज हे बगीचे बेजान बनले आहेत. साहजिकच आता तिकडे कुणीही फिरकत नाही. सब फुलो के हैं दिवाने.. काटो से दिल कौन लगाये.. अशी या बगीच्यांची अवस्था आहे. झाडं सुकली, झुकली, मेली. त्यांना जगविणारे मजूरही आज कामं शोधत आहेत. पण त्यांच्यावर कुणाचीच नजर नाही गेली. सुरावार यांच्या आश्रयाला राहून राबणारे हे मजूर लॉकडाऊनच्या काळात तर रोजगाराला अगदीच मोताद झाले आहेत. नगरपालिकेने पुन्हा बगीच्यांना फुलवावे आणि मजुरांनाही रोजगार द्यावा, अशी अपेक्षा आहे.

रखरखीत जमिनीला हिरवेगार करण्याची क्षमता मजुरांमध्ये आहे. मात्र वाळवंट बनत चाललेल्या बगीच्यांना वाचविण्याची इच्छाशक्ती राजकीय नेतृत्वामध्ये आहे का हा प्रश्न आहे. उत्तर सकारात्मक असेल तरच हिरवाई टिकेल.सहा लाख झाडांची पुण्याईरोजगार म्हणून बाग फुलविणाऱ्या विठ्ठल सुरावार यांनी झाडांना पोरासारखे जपले. आजवर सहा लाखांवर झाडे लावली. या झाडांचीच पुण्याई म्हणून आज माझी मुले एलएलबी, इंजिनिअरिंगसारखे शिक्षण घेऊ शकले, अशी कृतज्ञता सुरावार यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Socialसामाजिक