शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मजूर म्हणतात, गाव हे फुलांचे होते, का बकाल झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

Yawatmal News १९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले.

ठळक मुद्देबगीचा सजविणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मनात दाटली खंतजगविलेली झाडे झाली मरणासन्न

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मूल जन्माला येते तेव्हा ते गोड दिसते, त्याचे कौडकौतुक होते. पण मोठे होताना संगत चुकली तर हेच गोड लेकरू समाजाच्या तिरस्काराचे कारण बनते... यवतमाळातील बगीच्यांची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. सौंदर्य विद्रूप झाले. पण हे बगीचे ज्या मजुरांनी स्वत:च्या हाताने सजविले, वाढविले, त्यांच्या दु:खाला तर पारवारच नाही. ते म्हणतात, वाळलेली झाडं पाहून पोटची पोरं उपाशी असल्यासारखे वाटते...एक हीच शंका माझीअजूनही फिटेनागाव हे फुलांचे होतेका बकाल झालेसुरेश भटांच्या या गझलेसारखाच आज सर्वसामान्य यवतमाळकरांच्या मनालाही प्रश्न पडला आहे.१९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले. नियोजन आणि कष्ट यांच्या संगमाने स्मशानभूमी एवढी देखणी झाली की, लोक येथे डबापाटीर्साठी येऊ लागले. शिक्षक शाळेच्या विद्यार्थ्यांची छोटी सहल येथे आणू लागले. यवतमाळच्या देखण्या स्मशानाची कीर्ती संपूर्ण जिल्हाभर पसरली. याच काळात गोधनी मार्गावरील नेहरू मंच, नगरभवनपुढील गार्डन, शिवाजी बाल उद्यान, नेहरू बाल उद्यान हे बगीचेही सुरावार आणि त्यांच्या मजुरांनी फुलविले, प्रसिद्ध केले.

या बगीच्यांनी यवतमाळच्या वैभवाला हिरवी श्रीमंती दिली. पण कालांतराने हे मजूरही दुर्लक्षित झाले अन् बगीचेही अडगळीत पडले. प्रशासनाने, पदाधिकाऱ्यांनी अनास्था दाखविल्यामुळे आज हे बगीचे बेजान बनले आहेत. साहजिकच आता तिकडे कुणीही फिरकत नाही. सब फुलो के हैं दिवाने.. काटो से दिल कौन लगाये.. अशी या बगीच्यांची अवस्था आहे. झाडं सुकली, झुकली, मेली. त्यांना जगविणारे मजूरही आज कामं शोधत आहेत. पण त्यांच्यावर कुणाचीच नजर नाही गेली. सुरावार यांच्या आश्रयाला राहून राबणारे हे मजूर लॉकडाऊनच्या काळात तर रोजगाराला अगदीच मोताद झाले आहेत. नगरपालिकेने पुन्हा बगीच्यांना फुलवावे आणि मजुरांनाही रोजगार द्यावा, अशी अपेक्षा आहे.

रखरखीत जमिनीला हिरवेगार करण्याची क्षमता मजुरांमध्ये आहे. मात्र वाळवंट बनत चाललेल्या बगीच्यांना वाचविण्याची इच्छाशक्ती राजकीय नेतृत्वामध्ये आहे का हा प्रश्न आहे. उत्तर सकारात्मक असेल तरच हिरवाई टिकेल.सहा लाख झाडांची पुण्याईरोजगार म्हणून बाग फुलविणाऱ्या विठ्ठल सुरावार यांनी झाडांना पोरासारखे जपले. आजवर सहा लाखांवर झाडे लावली. या झाडांचीच पुण्याई म्हणून आज माझी मुले एलएलबी, इंजिनिअरिंगसारखे शिक्षण घेऊ शकले, अशी कृतज्ञता सुरावार यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Socialसामाजिक