शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

एसटीचा किलोमीटर भत्ता अजूनही पैशातच, २५ वर्षांपासून वाढ नाही

By विलास गावंडे | Updated: March 8, 2024 22:17 IST

चालक-वाहकांमध्ये नाराजीचा सूर

यवतमाळ: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक-वाहकांच्या किलोमीटर भत्त्यात मागील २५ वर्षांपासून वाढ केलेली नाही. अजूनही या कर्मचाऱ्यांना चलनात नसलेल्या नाण्याच्या रकमेत भत्ता दिला जातो. एसटी प्रशासनाकडून चेष्टा सुरू असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे. या भत्त्यामध्ये वाढ करावी, अशी त्यांची मागणी आहे.

चालक-वाहकांना झालेल्या किलोमीटरनुसार भत्ता दिला जातो. नऊ पैसे, ११ पैसे, १५ पैसे असे या भत्त्याचे स्वरूप आहे. ग्रामीण आणि शहरी भागानुसार भत्त्याचे मूल्य निर्धारित करण्यात आले आहे. ग्रामीण भागात बस फेरी झाली असल्यास नऊ पैसे भत्ता देण्यात येतो. अर्थातच २०० किलोमीटर फेरी झाल्यास नऊ पैसेप्रमाणे १८ रुपये किलोमीटर भत्ता मिळतो. या प्रकारातून कर्मचाऱ्यांची थट्टा सुरू आहे.

आज दैनंदिन गरजा वाढलेल्या आहेत. महागाईचा आलेखही खूप वर चढला आहे. इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे भत्ते, वेतन वाढले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. परंतु किलोमीटर भत्ता पैशातच दिला जातो. चालक-वाहक मिळून ५० ते ५५ हजार कर्मचारी आहेत. महामंडळाला उत्पन्न आणि प्रवाशांना सेवा देण्यात हा घटक महत्त्वपूर्ण आहे. परंतु त्यांना दिला जाणारा भत्ता चेष्टा करणारा ठरत आहे.

१९९६ च्या करारामध्ये किलोमीटर भत्त्यामध्ये वाढ झाली होती. तिही पैशातच होती. किलोमीटर भत्त्यामध्ये किमान दोन, चार, पाच रुपये यानुसार वाढ व्हावी, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांना आहे. आज खेळण्यातही पाच, दहा, २५ पैसे सापडत नाही. पण, एसटी चालक-वाहकांना दिल्या जाणाऱ्या किलोमीटर भत्त्यावर मात्र प्रत्येकवेळी दिसून येते. काही वर्षांपूर्वी रात्र वस्ती भत्ता वाढविण्यात आला. पण किलोमीटर भत्त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. महामंडळ प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांना आहे.

किलोमीटर भत्त्याच्या बाबतीत चालक-वाहकांची अवहेलना सुरू आहे. चलनात नसलेल्या नाण्याच्या रकमेत भत्ता देऊन या कर्मचाऱ्यांची चेष्टा केली जात आहे. या भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळ