शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

निर्गुडेचे खोरे झाले ‘कचराघर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:13 IST

मारेगाव तालुक्यासह वणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीचे खोरे अक्षरश: ‘कचरा घर’ बनले आहे. एकीकडे सरकार नद्यांच्या स्वच्छतेचा नारा देत असताना दुसरीकडे वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचे हाल पाहता, सरकारचा नारा किती तकलादू आहे, हे दिसून येते.

ठळक मुद्देनागरिकांची अनास्था : नदीपात्रात कचऱ्याचे ढिगारे, निर्माल्याचेही नदीतच विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मारेगाव तालुक्यासह वणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीचे खोरे अक्षरश: ‘कचरा घर’ बनले आहे. एकीकडे सरकार नद्यांच्या स्वच्छतेचा नारा देत असताना दुसरीकडे वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचे हाल पाहता, सरकारचा नारा किती तकलादू आहे, हे दिसून येते. नदीच्या या प्रदूषणाला नागरिकांची बेपर्वा वृत्ती आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्याकडून होत आहे.यावर्षी या भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. मध्यंतरी आलेल्या मुसळधार पावसाने निर्गुडा नदीला अनेकदा पूर आला. गेल्या अनेक महिन्यात नदी पात्रात टाकण्यात आलेला केरकचरा पुरात वाहून आला. त्याचे आता नदीच्या पात्रात मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर प्लॉस्टीक पन्न्यांचा समावेश आहे. पर्यावरणाला घातक असलेले शेकडो टन प्लॉस्टीक नदीच्या पात्रात पडून आहे. यामुळे नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. नदीचे किनारे दुतर्फा घाणीने बरबटलेले आहे. नागरिक घरातील कचरा, निर्माल्याचे साहित्य नित्यनेमाने या नदीत आणून टाकत असल्याचे चित्र दररोजच पहायला मिळते. यामुळे नदी प्रदूषित होत असल्याची जाणिव त्यांना कोण करून देणार, हा प्रश्न पर्यावरणवाद्यांना छळत आहे. उघड्यावर शौैचास बसणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालिकेचे गुडमॉर्निंग पथक कार्यरत आहे. मात्र आठवड्यातून एखाद्याच दिवशी या भागात पथकातील सदस्य गस्त घालताना दिसतात. अन्य दिवशी नदीच्या काठावर प्रात:र्विधी करणाऱ्यांची मोेठी गर्दी दिसून येते. विशेष म्हणजे पालिकेचे पथक नदीच्या एकाच बाजुने कारवाई करताना दिसतात. दुसरी बाजू गणेशपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते, आणि गणेशपूर ग्रामपंचायतीने अद्याप स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याने किंवा उघड्यावर शौैचास करणाºयांवर कोणतीही बंदी घातली नसल्याने निगुर्डा नदीचे किनारे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. काही ठिकाणी नदी पात्रात मांस विक्रीसाठी जनावरांची कत्तल केली जात आहे. निरूपयोगी मांस नदीपात्रातच टाकले जात आहेत.निर्देशांकडे दुर्लक्षनदी प्रदूषित करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी अन्य जिल्ह्यात होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच चौैघांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत. मात्र या निर्देशाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत चालले आहे.स्वच्छतेसाठी पुढाकार हवाकाही वर्षांपूर्वी वणीत निगुर्डा नदीचे खोलिकरण व स्वच्छतेसाठी स्थानिक राजकीय, सामाजिक संघटनांच्या पुढाकारात ‘मिशन निर्गुडा’ ही मोहीम राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर नदीच्या स्वच्छतेसाठी पुन्हा एकदा मोहिम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनीही नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी जागृक रहावे, नदी पात्रात कोणताही कचरा टाकला जाऊ नये, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :riverनदी