शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाणीटंचाईत जेएन पार्कने ठेवला नवा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:58 IST

यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला. मात्र याच शहरातील जेएन पार्कमध्ये मात्र दररोज वसाहतीतील बोअरवेलवरून दोन तास पाणी येते. पाणीटंचाईतही मुबलक पाण्याची किमया साधली ती या परिसरातील नागरिकांच्या एकोप्याने.

ठळक मुद्देनागरिकांचा एकोपा : टंचाई काळात बोअरवेलवरून संपूर्ण नगराला पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला. मात्र याच शहरातील जेएन पार्कमध्ये मात्र दररोज वसाहतीतील बोअरवेलवरून दोन तास पाणी येते. पाणीटंचाईतही मुबलक पाण्याची किमया साधली ती या परिसरातील नागरिकांच्या एकोप्याने. आजही शहरात पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असताना जेएन पार्कमध्ये मात्र मुबलक पाणी नागरिकांना मिळत आहे.यवतमाळ-दारव्हा मार्गावर जेएन पार्क आहे. या भागातील नागरिकांचा एकोपा वाखाणण्याजोगा आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या बाबतीत हा परिसर आत्मनिर्भर झाला आहे. पाणीपुरवठ्यासाठी या नगरात एक बोअरवेल खोदण्यात आली होती. नागरिकांनी बोअरवेलला लागून मोठमोठ्ठाले शोषखड्डे तयार केले. त्यामुळे पुनर्भरण झाले. परिणामी भीषण पाणीटंचाईतही येथील बोअरवेलला मुबलक पाणी आहे. दररोज दोन तास या बोअरवेलचे पाणी सोडल्या जाते.गेल्या कित्येक वर्षांपासून यात कधी खंड पडला नाही. विशेष म्हणजे या परिसरात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नागरिकांनीच तयार केल्याने कुणी प्राधिकरणाचे नळही घेतले नाही. यंदाच्या उन्हाळ्यात कुणालाही पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही.जेएन पार्कमध्ये पाणी वितरणासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष उत्तम अजमिरे, सचिव उत्तम राठोड, उपाध्यक्ष दिलीप मेश्राम, विनोद डवले, युवराज राठोड, श्रीकृष्ण हिंगासपुरे, सुधीर राऊत, विजय बकाले, मोहन शहाडे, अनिल यावूल, कैलास भगत काम पाहतात.आपल्या परिसराला तर पाणी दिले जाते. परंतु लगतच्या पोलीस मित्र सोसायटी आणि इतर वसाहतींनाही येथील पाण्याचा टंचाईच्या काळात आधार झाला.पाण्याची टाकी द्याया भागात थेट पाणीपुरवठा होतो. त्याऐवजी याठिकाणी पाण्याची टाकी उभारल्यास नागरिकांना अधिक दाबाने पाणी मिळेल, वीज वाचेल यासाठी येथे पाण्याची टाकी द्यावी, अशी मागणी उत्तम अजमिरे यांनी केले. तर स्वाती डुकरे, वंदना डवले यांनी या भागात रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याची गरज असल्याचे सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई