शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकांत चालविला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. वन हक्क कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, अशांची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र वन हक्क कायद्याच्या चाकोरीमध्ये न बसण्याची अनेक कारणे व अडचणी आहेत. गरिबी व अज्ञानामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करणे शक्य होत नाही.

ठळक मुद्देघाटंजी तालुका : वन विभागाच्या अतिक्रमण हटावविरुद्ध शिवार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : वन विभागाने अतिक्रमित शेतात पेरणी झालेल्या पिकांची जेसीबी मशिनद्वारे नासाडी करून सक्तीने व निर्दयपणे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु केली. त्यामुळे सरकारी जमीनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशत पसरली. या मोहिमेचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील कोंडजळी येथे शेतकरी उमेश मांडवकर यांच्या शेतात प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाने शनिवारी शिवार आंदोलन केले.प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. वन हक्क कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, अशांची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र वन हक्क कायद्याच्या चाकोरीमध्ये न बसण्याची अनेक कारणे व अडचणी आहेत. गरिबी व अज्ञानामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटाची भाकर हिसकावून संसार उघड्यावर पाडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. आदिवासी, ईतर मागास व भटक्या जमाती भीक्षा मागणे, शिकार करणे आता शक्य नसल्याने वन जमिनीवर शेती करीत आहे. पडित जमिनीवर अतिक्रमण करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यांचे जीवन उाड्यावर आणणाऱ्या या कारवाईचा निषेध केला.घाटंजीचे निवासी नायब तहसीलदार राठोड यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन पाठविले. निवेदनातून गरीब अतिक्रमणधारकांच्या शेत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही थांबवावी, अशी मागणी केली. या आंदोलनात हरिभाऊ पेंदोर, प्रशांत धांदे, अशोक जयस्वाल, दिनकर मानकर, सय्यद आसिफ यांच्यासह साखरा, मानोली, आमडी, बेलोरा, घाटी, खापरी येथील नागोराव कनाके, अंबादास वानखडे, लक्ष्मण घुम्मडवार, संभू वाढई, उत्तम धोटे, गजानन कोटरंगे, हनुमान चाफले, देवु राठोड, अयुब पठाण, रामदास कुंभारे, उमेश मांडवकर सहभागी होते.जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वन जमिनीवर अतिक्रमण करून काहींनी शेती केली आहे. मागासवर्गीय व भटक्या प्रवर्गातील अनेकांनी त्यावरच आपली उपजीविका सुरू केली आहे. अनेकांचे परंपरागत व्यवसाय बंद झाल्याने नाईलाजाने त्यांनी ही पडीत जमीन कसण्यास सुरुवात केली. या जमिनीचा शासनाला कोणताही लाभ नाही. आता त्याच जमिनीवरील उभी पिके नष्ट करून अतिक्रमण हटविले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जमीन कसणाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी