शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

जैन संघटना आपत्तीच्या वेळी धावून जाते

By admin | Updated: January 14, 2016 03:28 IST

गुजरातमध्ये २००१ साली झालेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर ३६८ शाळांचे निर्माण करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.

शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प : मदतीसोबत पुनर्वसनही यवतमाळ : गुजरातमध्ये २००१ साली झालेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर ३६८ शाळांचे निर्माण करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. काश्मिरमध्ये आॅक्टोबर २००५ मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी ‘एनडीएमए’ने सर्वप्रथम पुनर्वसन कामासाठी भारतीय जैन संघटनेची मदत घेतली. एका महिन्यात घरे बांधून दिली, असे प्रफुल्ल पारख यांनी सांगितले. अकोला येथे २००२ साली महापूर आला होता. पूरग्रस्तांनी शाळांमध्ये आश्रय घेतला होता. ही मंडळी तेथून बाहेर निघायला तयार नव्हती. त्यावेळी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेऊन १५ हजार नागरिकांसाठी दोन तात्पुरते नगर वसविले आणि शाळा रिकाम्या करून दिल्या, असे ते म्हणाले. त्सुनामीच्या वेळी अंदमान निकोबारमध्ये आपण स्वत: १५ महिने त्या भागात होतो. ३७ बेटांवर शाळा, रुग्णालये उभारण्यात आले. २००८ साली बिहारमध्ये आलेल्या पुरात आमच्या चमूने १८० दिवस वैद्यकीय सेवा दिली. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी धावून जावून मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही मदतच नाही तर त्यांचे पुनर्वसन करतो, असे पारख यांनी सांगितले. शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासोबतच आपल्या परिसराच्या विकासासाठीही प्रोत्साहीत करतो. १९९७ मध्ये मेळघाटमधून ३०० गावातून ३२८ मुलांची निवड करून पुणे येथे शिक्षण दिले. आज ही मुले आपल्या परिसरात विकासाचे काम करीत आहे. आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण देवून त्यांना मदतीचा हात भारतीय जैन संघटना देणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच आम्ही या प्रकल्पासाठी मुलींचीही निवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या कुटुंबात आत्महत्या झाली असेल तर त्या कुटुंबातील मुलांच्या डोक्यातही आत्महत्येचे विचार घोळत असतात. हे सर्वेक्षणातूनही सिद्ध झाले आहे. पुणे येथे शैक्षणिक प्रकल्प राबविताना तसे अनुभवही आले. परंतु त्या मुलांच्या डोक्यातील आत्महत्येचे विचार करून त्यांचा दृष्टीकोण सकारात्मक करण्याचा प्रयत्नही या प्रकल्पातून होत असल्याचे पारख यांनी शेवटी सांगितले. (नगर प्रतिनिधी)