शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शौचालय, गटार, उकिरडे साफ करणे गैर आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:09 IST

शहरातील सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते स्वच्छ करणे, गटरांची घाण उचलणे, कचरा नेऊन फेकणे ही कामे शहरातील सफाई कामगार अविरत करीत आहेत.

ठळक मुद्देसफाई कामगारांचा समाजाला सवाल : शासकीय योजनांचा लाभ घरापर्यंत पोहोचतच नाही

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते स्वच्छ करणे, गटरांची घाण उचलणे, कचरा नेऊन फेकणे ही कामे शहरातील सफाई कामगार अविरत करीत आहेत. मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही तुच्छतेचाच आहे. आम्ही जी स्वच्छता करतो त्यामुळेच समाज निरोगी आणि सुदृढ राहण्यास मोलाचा हातभार लागतो. मात्र यानंतरही समाजात श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. स्वच्छतेची कामे करणे गैर आहे का? असा सवाल यवतमाळ नगरपरिषदेच्या प्रभारी आरोग्य निरीक्षक लता प्रताप गोंधळे यांनी समाजाला विचारला आहे.शनिवारच्या श्रमप्रतिष्ठा दिनाच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक लता गोंधळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.समाजाचा सफाई कामगारांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, अशी रास्त अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिवसभर स्वच्छता करायची आणि घरी आल्यावर पुन्हा कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याच काम महिला सफाई कामगार अविरत पार पडतात. हे कार्य अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. सेवानगर हा सफाई कामगारांचा परिसर म्हणूनच ओळखला जातो. हा परिसर कामगार मेहनत करून स्वच्छ ठेवतात. मात्र शासकीय योजनांचा लाभ अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. या परिसरात २००१ मध्ये बांधलेले समाज भवन अजूनही अर्धवट अवस्थेतच आहे. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाला हक्काची जागाच उपलब्ध होत नाही.लताताई या मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांचे वडील सफाई कामगार होते. त्या सासरी आल्यानंतर सफाई कामगार म्हणून नगरपरिषदेत लागल्या. तब्बल १२ वर्षे त्यांनी सफाई कामगार म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी शौचालयाची सफाई करणे, नाल्या साफ करणे, रस्त्यांची स्वच्छता करणे असे काम केली. त्यानंतर त्यांची पर्यवेक्षक म्हणून निवड झाली. आता त्या प्रभारी आरोग्य निरीक्षक म्हणून काम करीत आहे. आजही त्या सफाईचे काम करतात. त्यांच्या हाताखाली ९० महिला स्वच्छतेचे काम करीत आहे. समाजात आजही स्वच्छतेची जागरुकता नाही. सार्वजनिक शौचालयात कितीही स्वच्छता केली तरी घाण हाते. त्याचे खापर सफाई कामगारांवर फोडले जाते.श्रमिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोण आजही तुच्छतेचाच : खंतलता गोंधळे यांच्या २७ वर्षाच्या सेवेत त्यांनी समाजातील तुच्छतेचा भाव जवळून पाहिला. त्या म्हणाल्या, पूर्वी आमच्या हातचे पाणी कोणी पित नव्हते, सार्वजनिक कार्यक्रमातही निमंत्रण राहत नव्हते. काळानुसार हा प्रकार ८० टक्के कमी झाला. मात्र तरीही आजही स्वच्छतेच्या कामावर जाणाऱ्या महिलांकडे समाज तुच्छतेने पाहतो, अशी खंत व्यक्त करताना ही स्थिती बदलायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सर्वांकडे समानतेच्या नजरेने पाहिले तरच समाजाचा विकास शक्य होणार आहे. शिक्षित पिढी आजही साफसफाईचे काम करते, याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ