शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरचे आरक्षित पाणी आले वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:19 IST

टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद्यात सापडले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडे १९ कोटी थकीत : टंचाईग्रस्त भागाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद्यात सापडले आहे.इसापूर धरण क्षेत्रात येणाऱ्या टंचाईग्रस्त गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेमार्फत पाणी आरक्षित केले जाते. यापूर्वी जिल्हा परिषदेने या प्रकल्पाचे ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी घेतले. परंतु इसापूर धरण प्रकल्प विभागाला रक्कम दिली नाही. कोट्यवधी रुपयांची रक्कम थकीत झाल्याने या प्रकल्प विभागाने पाणी देणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे.जून २०१८ अखेर यवतमाळ जिल्हा परिषदेकडे १८ कोटी ५९ लाखाहून अधिक रक्कम थकीत आहे. शिवाय २०१८-१९ अर्थात यावर्षीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ३० टक्के पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ३० टक्के आरक्षित पाण्याची ५० टक्के रक्कम ५४ लाख रुपये होते. ही संपूर्ण रक्कम १९ कोटींपेक्षा अधिक होते. या पूर्ण रकमेचा भरणा जिल्हा परिषदेने केला तरच पाणी दिले जाईल, असे नांदेड येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.पुसद, उमरखेडपुढे गंभीर प्रश्नजिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० टक्के पाणी पुसद आणि उमरखेड तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांना पुरविले जाते. मात्र आता उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाने पाणी न देण्याचा निर्णय घेतल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेकडे दरवर्षी या प्रकल्पाच्या पाण्याची थकीत रक्कम वाढत आहे. वारंवार सुचना, पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. यामुळेच प्रकल्प विभागाने पाणी न सोडण्याची टोकाची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जाते. आता यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे उमरखेड आणि पुसद तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई