शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

इसापूरचे आरक्षित पाणी आले वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:19 IST

टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद्यात सापडले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडे १९ कोटी थकीत : टंचाईग्रस्त भागाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद्यात सापडले आहे.इसापूर धरण क्षेत्रात येणाऱ्या टंचाईग्रस्त गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेमार्फत पाणी आरक्षित केले जाते. यापूर्वी जिल्हा परिषदेने या प्रकल्पाचे ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी घेतले. परंतु इसापूर धरण प्रकल्प विभागाला रक्कम दिली नाही. कोट्यवधी रुपयांची रक्कम थकीत झाल्याने या प्रकल्प विभागाने पाणी देणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे.जून २०१८ अखेर यवतमाळ जिल्हा परिषदेकडे १८ कोटी ५९ लाखाहून अधिक रक्कम थकीत आहे. शिवाय २०१८-१९ अर्थात यावर्षीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ३० टक्के पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ३० टक्के आरक्षित पाण्याची ५० टक्के रक्कम ५४ लाख रुपये होते. ही संपूर्ण रक्कम १९ कोटींपेक्षा अधिक होते. या पूर्ण रकमेचा भरणा जिल्हा परिषदेने केला तरच पाणी दिले जाईल, असे नांदेड येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.पुसद, उमरखेडपुढे गंभीर प्रश्नजिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० टक्के पाणी पुसद आणि उमरखेड तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांना पुरविले जाते. मात्र आता उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाने पाणी न देण्याचा निर्णय घेतल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेकडे दरवर्षी या प्रकल्पाच्या पाण्याची थकीत रक्कम वाढत आहे. वारंवार सुचना, पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. यामुळेच प्रकल्प विभागाने पाणी न सोडण्याची टोकाची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जाते. आता यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे उमरखेड आणि पुसद तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई