शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

सिंचन विहिरींचा हिशेबच जुळेना

By admin | Updated: March 14, 2015 02:15 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन उपाययोजनेतील कामांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला जूनचा अल्टीमेटम दिला असला तरी प्रत्यक्षात शासकीय स्तरावर प्रचंड उदासीनता पहायला मिळते.

यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन उपाययोजनेतील कामांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला जूनचा अल्टीमेटम दिला असला तरी प्रत्यक्षात शासकीय स्तरावर प्रचंड उदासीनता पहायला मिळते. ज्या सिंचन विहिरींच्या भरोश्यावर सरकार आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देऊ पाहत आहे, त्या विहिरींचा कुठेच हिशेब जुळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातच हा हिशेब ठेवणाऱ्या रोजगार हमी योजना विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने अंमलबजावणीचा गोंधळ वाढला आहे. सुमारे अडीच वर्षांपासून या विभागाचे काम अतिरिक्त प्रभारावर सुरू आहे. रोजगार हमी योजनेतूनच बहुतांश कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरी, रोहयोच्या विहिरी, रोजगार हमी योजनेची कामे, महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान, खचलेल्या विहिरी अशा विविध प्रकारच्या योजना मिळून या कार्यालयाकडून ३०० ते ४०० कोटींची उलाढाल केली जाते. प्रत्यक्षात मात्र योजनांचा डोज भरपूर असला तरी त्या राबविण्यासाठी यंत्रणाच नाही. या विभागातील तांत्रिक मंजुरीसाठी तयार केलेले उपअभियंत्याचे पद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. एका शाखा अभियंत्याच्या भरोश्यावर येथील कारभार सुरू आहे. स्वतंत्र लेखाधिकारी या विभागात नाहीत. केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर येथील कारभार सुरू आहे. शाखा अभियंता आणि नायब तहसीलदार या दोघांनाच ३०० ते ४०० कोटींच्या योजनांचे नियंत्रण करावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ दौऱ्यावर असताना जलयुक्त शिवार अभियानातील कामे आणि धडक सिंचन विहिरी जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सिमेंट नाला बांध, शेततळी यांचेही काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायचे आहे. मुळात धडक सिंचन योजनेमध्ये आणि रोहयोच्या योजनेसाठी तब्बल १७ प्रकारच्या एजंसीज नियुक्त केल्या आहेत. आजपर्यंत मात्र त्यांनी कुठलेच काम केले नाही. यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी असमाधान व्यक्त केले. चार हजार १३२ विहिरींपैकी केवळ ४० विहिरींचे काम सुरू झाले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. अशा स्थितीतही योजना राबविण्यासाठी यंत्रणा सक्षम केली जात नाही. शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील मुद्यावर काम करणाऱ्या विभागातच अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)