शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

सिंचन विहिरींचा हिशेबच जुळेना

By admin | Updated: March 14, 2015 02:15 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन उपाययोजनेतील कामांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला जूनचा अल्टीमेटम दिला असला तरी प्रत्यक्षात शासकीय स्तरावर प्रचंड उदासीनता पहायला मिळते.

यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन उपाययोजनेतील कामांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला जूनचा अल्टीमेटम दिला असला तरी प्रत्यक्षात शासकीय स्तरावर प्रचंड उदासीनता पहायला मिळते. ज्या सिंचन विहिरींच्या भरोश्यावर सरकार आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देऊ पाहत आहे, त्या विहिरींचा कुठेच हिशेब जुळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातच हा हिशेब ठेवणाऱ्या रोजगार हमी योजना विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने अंमलबजावणीचा गोंधळ वाढला आहे. सुमारे अडीच वर्षांपासून या विभागाचे काम अतिरिक्त प्रभारावर सुरू आहे. रोजगार हमी योजनेतूनच बहुतांश कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरी, रोहयोच्या विहिरी, रोजगार हमी योजनेची कामे, महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान, खचलेल्या विहिरी अशा विविध प्रकारच्या योजना मिळून या कार्यालयाकडून ३०० ते ४०० कोटींची उलाढाल केली जाते. प्रत्यक्षात मात्र योजनांचा डोज भरपूर असला तरी त्या राबविण्यासाठी यंत्रणाच नाही. या विभागातील तांत्रिक मंजुरीसाठी तयार केलेले उपअभियंत्याचे पद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. एका शाखा अभियंत्याच्या भरोश्यावर येथील कारभार सुरू आहे. स्वतंत्र लेखाधिकारी या विभागात नाहीत. केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर येथील कारभार सुरू आहे. शाखा अभियंता आणि नायब तहसीलदार या दोघांनाच ३०० ते ४०० कोटींच्या योजनांचे नियंत्रण करावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ दौऱ्यावर असताना जलयुक्त शिवार अभियानातील कामे आणि धडक सिंचन विहिरी जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सिमेंट नाला बांध, शेततळी यांचेही काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायचे आहे. मुळात धडक सिंचन योजनेमध्ये आणि रोहयोच्या योजनेसाठी तब्बल १७ प्रकारच्या एजंसीज नियुक्त केल्या आहेत. आजपर्यंत मात्र त्यांनी कुठलेच काम केले नाही. यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी असमाधान व्यक्त केले. चार हजार १३२ विहिरींपैकी केवळ ४० विहिरींचे काम सुरू झाले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. अशा स्थितीतही योजना राबविण्यासाठी यंत्रणा सक्षम केली जात नाही. शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील मुद्यावर काम करणाऱ्या विभागातच अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)