शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खत खरेदीसोबत आता शेतकऱ्यांना विमा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:22 IST

रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रासायनिक खताची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनाही सुरक्षा विमा मिळणार आहे. त्याकरिता खत कंपनी ...

ठळक मुद्देलाखाची मदत । कंपनी भरणार विमा हप्ता

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रासायनिक खताची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनाही सुरक्षा विमा मिळणार आहे. त्याकरिता खत कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. अपघात झाल्यास अशा शेतकऱ्यांना एक लाख रूपयापर्यंतची मदत कंपनीच देणार आहे. विशेष म्हणजे, खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता खत कंपनीच अदा करणार आहे. यामुळे कृषी उत्पादनात वाढ करण्यासोबत शेतकऱ्यांचा संकटकालीन सारथी म्हणून खत कंपनी भूमिका बजावणार आहे.शासनाच्या मालकीची इफको ही खत कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावली आहे. खतांची खरेदी करणाºया शेतकऱ्यांना ही कंपनी एक लाख रूपयापर्यंतचा अपघात विमा देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलेही पैसे मोजावे लागणार नाही. एका पोत्याच्या खरेदीवर चार हजार रूपयापर्यंतचा सुरक्षा विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. २५ पोत्यांवर एक लाख रूपयांचा सुरक्षा विमा या योजनेत जाहीर करण्यात आला आहे.२५ पोत्यांच्या खरेदीपर्यंतच ही मोहीम विमा कंपनी राबविणार आहे. ही योजना खरेदीच्या तारखेपासून एक महिन्याने शेतकऱ्यांना लागू होणार आहे. वर्षभरासाठी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये विमा कंपनीला खत खरेदीची पावती दाखवावी लागणार आहे. खत खरेदीच्या पावतीवरूनच अपघात विम्याची नोंद कंपनी घेणार आहे.यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास १०० टक्के रक्कम इफको टोकियो ही विमा कंपनी शेतकऱ्यांना अदा करणार आहे. दोन पाय, दोन डोळे निकामी झाल्यास ५० टक्के रक्कम, एक पाय, एक हात, एक डोळा निकामी झाल्यास २५ टक्के रक्कम कंपनी देणार आहे. रेल्वे, रस्ता, पाण्यात मृत्यू, सर्पदंश, गॅस सिलिंडर स्फोट, इतर कुठलाही अपघात यासाठी ही पॉलिसी शेतकºयांना मदत करणार आहे.पोत्यामागे चार हजारांचा विमाखत कंपन्या एका पोत्यामागे चार हजारांचा सुरक्षा विमा देणार आहे. २५ पोत्यांपर्यंतच हा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात २५ पोत्यांपर्यंत खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. मोठे शेतकरीच २५ पोत्यांपर्यंत किंवा जादा खत खरेदी करतात. त्यामुळे ही विमा योजना लहान शेतकऱ्यांसाठी दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखीच ठरणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी