शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

टंचाईच्या उपाययोजनांना तत्काळ मंजुरीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:31 IST

यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे प्रथम प्राधान्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या उपाययोजनांना तत्काळ मंजुरी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री व आमदारांची बैठक मंगळवारी नागपूर येथे घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.सिंचन हा विषय शेतकऱ्यांशी निगडीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी निधीसुध्दा मोठ्या प्रमाणात देण्यात आला आहे. त्यामुळे सिंचनाची कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, त्याबाबत संबंधित यंत्रणेने तसा प्रस्ताव पाठवावा, सिंचन प्रकल्पांसाठी विनाकारण शेतकºयांच्या जमिनी अडकवून ठेवू नका, असे सांगितले. शेतकरी आत्महत्येसंदर्भात मुख्यमंत्री देवेद्र्र फडणवीस म्हणाले, आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना गांभिर्याने कराव्यात, शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शेततळ्यांसारखे धडक विहिरींमध्येसुध्दा संयुक्त बचत खात्याचे नियोजन करा, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गावातील उपसा किती याची माहिती घेऊन विहीर पुनर्भरण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. सरसकट विहिरी रद्द होणार नाही, एकाच गावात १० विहिरी आणि गावालगत असलेला नाला यासंदर्भात निकष शिथील करण्यात येईल. २५ नोव्हेंबरनंतर सुरू करण्यात आलेल्या ४१९ शेततळ्यांपैकी आजपर्यंत ३१४ कामे पूर्ण झाली आहेत. आॅक्टोबर २०१७ अखेरपर्यंत केवळ १४ टक्के जिओ टॅगींग होती, ती आता ८२ टक्क्यांवर गेली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कौतुक केले. जिल्ह्यात शेततळे आणि कृषी वीजपंप जोडणीबाबत यवतमाळमध्ये चांगले काम झाले आहे. ज्यांना जोडणी पाहिजे त्यांना ती तत्काळ द्यावी, असे यावेळी सांगितले.राज्य शासनाने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली. या अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. दीड लाख रुपयांवरील ज्यांचे कर्ज होते ते नागरिक वरील पैसे भरत आहे. दीड लाख रुपये कर्जमाफीपर्यंतचा लाभ घेत आहेत. घरकूल योजनेसंदर्भात डिसेंबर अखेरपर्यंत नोंदणी पूर्ण करायची आहे. पुढच्या वर्षी केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता पहिला हप्ता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल. ग्रामीण भागात शासनाच्या सर्व घरकूल योजनेसाठी आता जमिनीची अडचण नाही. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यावर भर द्यावा. प्रधानमंत्री आवास योजना लोकप्रतिनिधींनीसुध्दा समजून घ्यावी. आपापल्या भागात कोणती योजना लागू होऊ शकते, त्यानुसार प्रस्ताव तयार करावा, ४० वर्षात जेवढी घरे बांधण्यात आली नसेल तेवढी घरे पाच वर्षात बांधण्यात येईल. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालयाची कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करावे. राजीव गांधी जीवनदायी योजनेसंदर्भात ज्या रुग्णालयांबाबत तक्रारी असेल अशा रुग्णालयांना तत्काळ वगळावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.सिंचनाची कामेदर्जेदार करण्याचे निर्देश

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस