शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या उपाययोजनांना तत्काळ मंजुरीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:31 IST

यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे प्रथम प्राधान्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या उपाययोजनांना तत्काळ मंजुरी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री व आमदारांची बैठक मंगळवारी नागपूर येथे घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.सिंचन हा विषय शेतकऱ्यांशी निगडीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी निधीसुध्दा मोठ्या प्रमाणात देण्यात आला आहे. त्यामुळे सिंचनाची कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, त्याबाबत संबंधित यंत्रणेने तसा प्रस्ताव पाठवावा, सिंचन प्रकल्पांसाठी विनाकारण शेतकºयांच्या जमिनी अडकवून ठेवू नका, असे सांगितले. शेतकरी आत्महत्येसंदर्भात मुख्यमंत्री देवेद्र्र फडणवीस म्हणाले, आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना गांभिर्याने कराव्यात, शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शेततळ्यांसारखे धडक विहिरींमध्येसुध्दा संयुक्त बचत खात्याचे नियोजन करा, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गावातील उपसा किती याची माहिती घेऊन विहीर पुनर्भरण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. सरसकट विहिरी रद्द होणार नाही, एकाच गावात १० विहिरी आणि गावालगत असलेला नाला यासंदर्भात निकष शिथील करण्यात येईल. २५ नोव्हेंबरनंतर सुरू करण्यात आलेल्या ४१९ शेततळ्यांपैकी आजपर्यंत ३१४ कामे पूर्ण झाली आहेत. आॅक्टोबर २०१७ अखेरपर्यंत केवळ १४ टक्के जिओ टॅगींग होती, ती आता ८२ टक्क्यांवर गेली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कौतुक केले. जिल्ह्यात शेततळे आणि कृषी वीजपंप जोडणीबाबत यवतमाळमध्ये चांगले काम झाले आहे. ज्यांना जोडणी पाहिजे त्यांना ती तत्काळ द्यावी, असे यावेळी सांगितले.राज्य शासनाने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली. या अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. दीड लाख रुपयांवरील ज्यांचे कर्ज होते ते नागरिक वरील पैसे भरत आहे. दीड लाख रुपये कर्जमाफीपर्यंतचा लाभ घेत आहेत. घरकूल योजनेसंदर्भात डिसेंबर अखेरपर्यंत नोंदणी पूर्ण करायची आहे. पुढच्या वर्षी केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता पहिला हप्ता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल. ग्रामीण भागात शासनाच्या सर्व घरकूल योजनेसाठी आता जमिनीची अडचण नाही. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यावर भर द्यावा. प्रधानमंत्री आवास योजना लोकप्रतिनिधींनीसुध्दा समजून घ्यावी. आपापल्या भागात कोणती योजना लागू होऊ शकते, त्यानुसार प्रस्ताव तयार करावा, ४० वर्षात जेवढी घरे बांधण्यात आली नसेल तेवढी घरे पाच वर्षात बांधण्यात येईल. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालयाची कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करावे. राजीव गांधी जीवनदायी योजनेसंदर्भात ज्या रुग्णालयांबाबत तक्रारी असेल अशा रुग्णालयांना तत्काळ वगळावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.सिंचनाची कामेदर्जेदार करण्याचे निर्देश

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस