शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चौकशी आदेशाची एसटीकडून ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:36 IST

तिकीट चोरीच्या आरोपाची चौकशी वाहकाच्या निलंबन काळातच करण्याच्या आदेशाची एसटी महामंडळात ‘वाट’ लागली आहे. कित्येक वर्षे चौकशीत घालविली जात आहे.

ठळक मुद्देवाहकांचे अपहारप्रकरण : ९० दिवसातच निकाल लावा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : तिकीट चोरीच्या आरोपाची चौकशी वाहकाच्या निलंबन काळातच करण्याच्या आदेशाची एसटी महामंडळात ‘वाट’ लागली आहे. कित्येक वर्षे चौकशीत घालविली जात आहे. या प्रकारात निलंबित वाहकाला दिल्या जाणाऱ्या अर्ध्या पगाराचा भुर्दंड महामंडळाला बसत आहे. अधिकाºयांच्या वेळकाढू धोरणामुळे महामंडळाच्या पैसा बचत धोरणाला हरताळ फासला जात आहे.तिकीट चोरी सापडलेल्या वाहकाला चौकशी अहवालावरून निलंबित केले जाते. या काळात वाहकाला अर्धा पगार दिला जातो. चौकशीचा कालावधी जेवढा वाढेल तेवढा वाहकाचा निलंबन कालावधी वाढतो. अपहार प्रकरणाची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करावी, असा महामंडळाचा आदेश आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती, हे अनेक प्रकरणात स्पष्ट झाले.निलंबन कालावधी ९० दिवसांचा असावा यासाठी एसटी महामंडळातील निवृत्त वाहतूक निरीक्षक पी.डी. बिडकर (अमरावती) न्यायालयात याचिका दाखल केली. यात त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. या आधारे महामंडळाने २२ फेबु्रवारी २०१८ रोजी परिपत्रक काढून वाहकाच्या निलंबन काळातच चौकशी पूर्ण करण्याचा आदेश काढला. त्यावर अजूनतरी काही ठिकाणी अंमलबजावणी झाली नाही.महामंडळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. चालक-वाहक नसल्याच्या कारणावरून बसफेऱ्या रद्द केल्या जातात. तिकीट चोरीच्या आरोपात काही वाहक दीड-दोन वर्षांपासून निलंबित आहेत. त्यांची प्रकरणे चौकशीतच अडली आहेत. प्रकरणे निकाली निघत नाही यासाठी विविध कारणे पुढे केली जातात. मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून केला जात नाही. आता ९० दिवसातच चौकशी करून निलंबन मागे घेण्याचा आदेश आहे. याचे पालन न केल्यास चौकशी अधिकाºयांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वेळकाढूपणाला चाप बसणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाºयांकडून बहुतांश प्रकरणात चालढकल केली जाते. याचा त्रास काही प्रकरणात प्रवाशांनाही सहन करावा लागतो. यावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ