शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भाजपातील कंत्राटदारांसाठी पालकमंत्र्यांकडून अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:08 IST

शहरातील विकास कामे करताना ती नियमानुसारच व्हावी, ही भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे. याची अडचण होत असल्याने पालकमंत्र्यांकडून वारंवार अडवणूक केली जाते. भाजपातील कंत्राटदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना काम देण्यासाठी हा विरोध सुरू आहे, असा आरोप नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देकांचन चौधरींचा आरोप : पत्रपरिषदेत मांडला दीड वर्षाचा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील विकास कामे करताना ती नियमानुसारच व्हावी, ही भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे. याची अडचण होत असल्याने पालकमंत्र्यांकडून वारंवार अडवणूक केली जाते. भाजपातील कंत्राटदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना काम देण्यासाठी हा विरोध सुरू आहे, असा आरोप नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत केला.नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी दीड वर्षात घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखा यावेळी मांडला. शहरात नव्याने आलेल्या सात ग्रामपंचायतींसाठी ३५० कोटींचा विकास आराखडा तयार केला. त्यातील ५० कोटींची शासनाकडे मागणी केली. प्रत्यक्ष १४ कोटी प्राप्त झाले. ही कामे मंजूर झाले असून पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. अखर्चित निधीचा महत्वाचा प्रश्न होता. २०१४ ते २०१६ या कालावधीतील विविध स्वरूपाचा ४४ कोटींचा निधी अखर्चित होता. त्यातील दहा कोटींची कामे प्रस्तावित केली होती. ती अत्यंत संथगतीने सुरू होती. शोध घेतला असता भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्या मुलाच्या नावाने यातील बहुतांश कामाचे कंत्राट आहे. याशिवाय सत्ताधारी पक्षातील पदाधिकाºयांनी दुसऱ्याच्या नावाने कामे घेतली आहे. या कामांना गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. ३० कोटींच्या कामास प्रशासकीय वित्तीय मंजुरी घेतली आहे.नेहरु बाल उद्यानात तीन कोटी ३० लाखांचे तारांगण मंजूर झाले आहे. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचे भूमिपूजन झाले. अमृतमधील पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटणाºयांनी टक्केवारीच्या चढाओढीत निकृष्ट दर्जाचे काम केले व जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. मोठा गाजावाजा करून ज्यांनी तारखा दिल्या, त्यासुद्धा निष्फळ ठरल्या. भिष्म प्रतिज्ञा घेऊन दुसऱ्यांना शुक्राचार्य संबोधणारे आता स्वत: शुक्राचार्य ठरले आहे. आम्ही जनतेला पाणी देऊन भिष्म आहोत. या कामात भ्रष्टाचाराची जाणीव होताच ५ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे व त्यानंतर २१ जूनला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कामाच्या चौकशीची मागणी केली. पालकमंत्र्यांनी बेंबळाच्या कामात मर्जीतील पोट कंत्राटदार नेमले यात बहुतांश भाजपाचेच ठेकेदार आहेत. योजनेचे काम फसल्याने पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमोर नाचक्की झाली. त्यामुळे आता ते जनतेपुढे नगराध्यक्षांविरोधात दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी नगरपरिषदेच्या वृक्षारोपण कार्यक्रमापासून नगराध्यक्षांनाच दूर ठेवण्याचे षडयंत्र रचले. प्रत्येक ठिकाणी अडवणूक करून कामात अडथळे निर्माण केले जात आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी नगरपरिषदेत त्यांचे काही भाट जे बोलक्या पोपटांसारखे वागत आहे. अशांना मी विकास कामातूनच उत्तर देईल, असेही कांचन चौधरी यांनी सांगितले.महिला पदाधिकाऱ्यांचा उपमर्दसार्वजनिक व शासकीय कार्यक्रमात, बैठकीत पालकमंत्री हे महिला पदाधिकाºयांचा उपमर्द करतात, यात जिल्ह्यातील भाजपा व्यतिरिक्त असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नियोजन समितीच्या बैठकीत तर पालकमंत्री स्वपक्षातील आमदारांनाही बोलू देत नाही. पालकमंत्र्यांकडून किमान महिला पदाधिकाऱ्यांचा व नगराध्यक्षांचा सन्मान व्हावा, एवढी अपेक्षा असल्याचे कांचन चौधरी यांनी सांगितले.विकास कामे व निधीच्या नियोजनासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकाºयांची नेहमीच संयुक्त बैठक घेतो. पालकमंत्री म्हणून अशी बैठक घेण्याचा प्रघात जिल्ह्यात मीच पहिल्यांदा सुरू केला आहे. मला कुठलंही राजकारण करायचं नाही. विकास कामे करायची आहेत. बेंबळाच्या कंत्राटदाराला आतापर्यंत फक्त दोनवेळा भेटलो आहे. कंत्राटदाराला मिळालेले काम त्यालाच करायचं आहे. आतापर्यंत कंत्राटदाराच्या कोण भेटी घेत आलंय हे सर्वश्रूत आहे. नगरपरिषदेच्या अखर्चित निधीला सलग दोन वर्षांपासून मुदत वाढवून दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रयत्नरत आहे.- मदन येरावार,पालकमंत्री, यवतमाळ

टॅग्स :BJPभाजपाMadan Yerawarमदन येरावार