शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींच्या व्यक्तिमत्त्वाचा महाराष्ट्राच्या समाजजीवनावर प्रभाव, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 08:33 IST

Yavatmal: स्वातंत्र्य संग्राम सेनानी, उत्तम राजकारणी तसेच सजग, व्यासंगी पत्रकार राहिलेल्या जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे कार्य २६ वर्षांनंतरही दीपस्तंभासारखे उभे आहे. त्यांनी या तीनही भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाज जीवनावर वेगळा ठसा उमटविल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

यवतमाळ - स्वातंत्र्य संग्राम सेनानी, उत्तम राजकारणी तसेच सजग, व्यासंगी पत्रकार राहिलेल्या जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे कार्य २६ वर्षांनंतरही दीपस्तंभासारखे उभे आहे. त्यांनी या तीनही भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाज जीवनावर वेगळा ठसा उमटविल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. राष्ट्रनिर्मितीसाठी बाबूजींनी दिलेले योगदान अभूतपूर्व तसेच प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २६व्या स्मृतिसमारोहानिमित्ताने प्रेरणास्थळ येथे आयोजित प्रार्थना सभेत ते शनिवारी बोलत होते. वाराणसी येथील धर्म सम्राट स्वामी करपात्रीजी केदार घाटचे स्वामी अभिषेक ब्रह्मचारीजी, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, माजी शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, बिहारमधील युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांची मंचावर उपस्थिती होती.

विखे-पाटील पुढे म्हणाले, काही व्यक्तिमत्त्वे ही अलौकिक कार्याद्वारे जनमानसावर आपली छाप निरंतर निर्माण करतात. बाबूजी त्यापैकी होते. त्यांचे जीवनकार्य महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे. सोशल मीडियाच्या आजच्या काळात समाज उभारणीत योगदान देणाऱ्यांना नवी पिढी विसरत आहे. मात्र, महाराष्ट्राला अध्यात्माचा वारसा असून, वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वर, तुकोबांच्या अभंगांचा परिणाम इथल्या प्रत्येकाच्या जीवनावर जाणवतो. संप्रदायाने जे दिले, त्याच्याशी नाळ कायम राहिल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळते. त्यामुळेच २५ लाखांवर भाविक पंढरपूरला पायी जातात. ही संप्रदायाची ताकद आहे. भारत तरुणांचा देश आहे. इथल्या या परंपरा, गौरवशाली वारशाचा उपयोग राष्ट्रनिर्माणाकरिता झाला पाहिजे, त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. जुन्या लोकांनी खस्ता खाल्ल्या, पायाचे दगड झाले, म्हणून हे मंदिर उभे राहिले. स्वातंत्र्य चळवळीसह राष्ट्रनिर्मितीमध्ये ज्यांनी योगदान दिले, जी भूमिका मांडली, त्याचे पावित्र्य राखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. जगाच्या पाठीवर देशाची ओळख निर्माण होत असतानाच ज्ञानाने ही पिढी समृद्ध व्हावी, नवा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत व्हावा, यासाठी काम करण्याची आवश्यकता असून, अशा वेळी बाबूजींचे कार्य आपल्याला दिशा दाखविते,  असे ते म्हणाले. बाबूजींचा हा समृद्ध वारसा व परंपरा ‘लोकमत’च्या माध्यमातून विजय व राजेंद्र दर्डा यांनी जपला, जोपासला. तिसरी पिढीही तो सक्षमपणे पुढे घेऊन जात असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी स्वामी अभिषेक ब्रह्मचारीजी यांनी मार्गदर्शन केले. यवतमाळमधील प्रेरणास्थळी आल्यावर राजघाटाची आठवण येते. येथे वडिलांचे व्यक्तित्त्व आणि कर्तृत्वाची मनोभावे जपणूक होत असल्याचे दिसले. वडिलांप्रति मुलांचे काय कर्तव्य असते, ते इथे पाहायला मिळाले. बाबूजींचे कार्य व्यापक होते. शेवटच्या घटकाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वाहिले. यवतमाळातील हे प्रेरणास्थळ नव्या पिढीला कायम ऊर्जा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजेंद्र दर्डा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

वैचारिक वारशामुळेच  महाराष्ट्राबाहेरही ‘लोकमत’ची पताका- लोकसेवेचा वसा घेऊन बाबूजी आयुष्यभर झटले, त्यात सर्वांत महत्त्वाची व्यक्ती हा येथील कष्टकरी, शोषित, वंचित, उपेक्षित घटक होता. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनाची पहाट उजाडावी यासाठी त्यांनी कार्य केले. ‘लोकमत’ही आज त्याच वाटेने पुढे जात आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा आणि दिल्लीमध्येही मोठ्या अभिमानाने ‘लोकमत’ मराठी पताका फडकवीत असल्याचे डॉ. विजय दर्डा म्हणाले. - बाबूजींनी वीज, पाणी, सिंचन, उद्योगासह गृहनिर्मिती आदी क्षेत्रांतील प्रश्नांची तळमळीने सोडवणूक केली. दूरदृष्टीने त्यात बदल घडविण्याचा प्रयत्न केला. मागील २६ वर्षांपासून प्रेरणास्थळाने केवळ परिवारालाच नाही तर संपूर्ण राज्याला शोषित, वंचितांच्या उत्थानासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. प्रेरणास्थळी आज हा त्याचाच समारोह असल्याच्या भावनाही   डॉ. दर्डा यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील