शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील ‘साथरोग’ माहिती यंत्रणा वर्षभरापासून कोलमडलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 12:44 IST

आरोग्य विभागाची ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) कोलमडल्याने वेळीच फवारणीतून विषबाधा प्रकरणाची माहिती मिळाली नाही. परिणामी २२ शेतकरी, मजुरांना प्राण गमवावे लागल्याचे पुढे येत आहे.

ठळक मुद्देप्रकरण कीटकनाशक फवारणी मृत्यूंचे विषबाधितांची माहितीच मिळाली नाही

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आरोग्य विभागाची ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) कोलमडल्याने वेळीच फवारणीतून विषबाधा प्रकरणाची माहिती मिळाली नाही. परिणामी २२ शेतकरी, मजुरांना प्राण गमवावे लागल्याचे पुढे येत आहे.जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांच्या अधिनस्त जिल्ह्यात ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) प्रणाली अस्तिवात आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात साथरोगांची लागण झाल्यास या यंत्रणेला तातडीने वरिष्ठांना माहिती द्यावी लागते. त्याबाबतचा अहवाल सादर करावा लागतो. मात्र वर्षभरापासून ही संपूर्ण यंत्रणाच कोलमडलेली होती, अशी माहिती समोर येत आहे. परिणामी जून महिन्यापासून कीटनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होऊनही आॅक्टोबर महिन्यापर्यंत या यंत्रणेला या गंभीर प्रकाराची कोणतीच माहिती नव्हती.प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी या यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात. संबंधित परिसरातील आरोग्य कर्मचारी त्यांना परिसरातील साथरोगांंच्या लागणीबाबत माहिती देतात. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालकांकडे पाठविली जाते. मात्र जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होत असताना आणि शेतकरी, मजुरांचे बळी जात असताना ही यंत्रणा निद्रीस्त होती. आता खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने डेली रिपोर्टींग सुरू केली.या यंत्रणेत जेथे कुणाचा मृत्यू झाला, ती यंत्रणा एचआयएमएसला माहिती कळविते. मात्र साथरोग अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने त्यांनी कदाचित संगणक सुरूच केले नसावे, अशी चर्चा आहे. आजाराचे निदान, रूग्णाच्या मृत्यूचे कारण याची माहिती घेऊन एचआयएमएस यंत्रणेने वरिष्ठांना मृत्यू संशोधन अहवाल सादर करणेही आवश्यक असते. मात्र फवारणीतून विषबाधा प्रकरणात यापैकी कोणतीच माहिती या यंत्रणेकडे नसल्याचे स्पष्ट होत आहे. फवारणीतील विषबाधा प्रकरणात सर्वच विभागाची गावपातळीवरील यंत्रणा फेल ठरल्याचे दिसून येते. मात्र वरिष्ठांना सोडून कनिष्ठांना नोटीस बजावल्या जात असल्याने सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे.साथरोगांची लागण झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ‘इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट’ मागितला जातो. वैद्यकीय अधिकाऱ्याला तपास करावा लागतो. मात्र फवारणीतील विषबाधा प्रकरणानंतर अद्यापही अशाप्रकारचा कोणताच अहवाल मागविण्यात आला नाही. तथापि डेली रिपोर्टींग मात्र घेतले जात असल्याचा दावा यंत्रणेकडून केला जातो. कृषी विभागासोबतच आरोग्य, महसूल यंत्रणा या प्रकरणात तेवढीच जबाबदार आहे. मात्र सर्वच यंत्रणा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून वरिष्ठ अधिकाºयांना सहीसलामत बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील झाल्याचे दिसत आहे.

जुन्या तारखेत बजावली आरोग्यसेवकांना नोटीसविषबाधा प्रकरणात माहिती न दिलयाा ठपका ठेवून २१ आरोग्य सेवकांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीसवर १३ आॅक्टोबर ही तारीख आहे. मात्र अद्याप बहुतांश आरोग्य सेवकांना नोटीस मिळालीच नाही. विशेष म्हणजे नोटीसमध्ये त्यात शेतकरी, शेतमजुराच्या मृत्यूची तारीखही चुकीची दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे ही नोटीस बॅकडेटमध्ये काढली गेल्याची शंका उपस्थित केली जात आहे.‘एचआयएमएस’कडे केवळ विष घेतलेल्या रूग्णांची माहिती असते. कारण ते प्रथम आरोग्य उपकेंद्र, केंद्र, ग्रामीण रूग्णालयात दाखल होतात. फवारणीतून विषबाधा झालेले रूग्ण ‘कॉन्टॅक्टेड पॉईझनिंग’ या प्रकारात मोडतात. त्यामुळे एचआयएमएसकडे याबाबत माहिती नाही.- डॉ. के.के. कोषटवार,जिल्हा साथरोग अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्य