शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावात वणीकरांना महागाईचाही डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

धान्याचा मागणी केल्यानंतरही पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भावात आम्हाला धान्याचा पुरवठा होत आहे, त्यात थोडी मार्जीन ठेवून धान्य विक्री करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी केल्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने धान्याची वाहने वणीत येत असल्याचेही एका दुकानदाराने सांगितले. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंची चढ्या भावात विक्री करू नका, असे शासनातर्फे बजावण्यात आले असले, तरी किराणा व्यावसायिक मात्रं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गंभीर बाब ही की, या व्यावसायिकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरू आहे.

ठळक मुद्देचढ्या भावाने धान्य विक्री। धान्याची आवक होत नसल्याची व्यापाऱ्यांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वेगाने होत असताना लॉकडाऊनचा फायदा उचलत येथील धान्य व्यापारी चढ्या भावाने धान्याची विक्री करीत आहे. त्यातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे.यासंदर्भात काही व्यापाऱ्यांना विचारणा केली असता, धान्याचा मागणी केल्यानंतरही पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भावात आम्हाला धान्याचा पुरवठा होत आहे, त्यात थोडी मार्जीन ठेवून धान्य विक्री करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी केल्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने धान्याची वाहने वणीत येत असल्याचेही एका दुकानदाराने सांगितले. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंची चढ्या भावात विक्री करू नका, असे शासनातर्फे बजावण्यात आले असले, तरी किराणा व्यावसायिक मात्रं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गंभीर बाब ही की, या व्यावसायिकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरू आहे. लॉकडाऊनमधून केवळ किराणा दुकान, मेडिकल यांसह जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाºया प्रतिष्ठानांना सूट देण्यात आली आहे. कोरोनामुळे पुढे परिस्थिती काय राहील, याचे कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही. परिस्थिती चिघळली तर धान्याची दुकानेही बंद होतील, अशा भितीपोटीही काही लोक आपल्या घरात धान्याचा साठा करून ठेवत आहेत. याचाच फायदा किराणा व्यावसायिक उचलत असल्याचे चित्र वणी शहरात पहायला मिळत आहे.लॉकडाऊन पूर्वी सोयाबीन तेलाची १५ लिटरची कॅन १२५० रुपयांना मिळत होती. त्याचे भाव आता १४०० रुपयांवर पोहचले आहेत. तूर डाळ ८० रुपये किलोवरून ९५ रुपये प्रतिकिलो झाली आहे. दोन हजार ३०० रुपये क्विंटलाचा गहू दोन हजार ६०० ते दोन हजार ७०० रुपयांपर्यंत पोहचला आहे. पाच किलो आट्याची पिशवी १४० रुपयांवरून १६० रुपयांवर पोहचली आहे. अन्य डाळींचे भावदेखील ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत.भाजीपल्याचे भाव वधारलेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजीपाल्याचेही भाव चांगलेच वाढले आहेत. २० रुपये किलो मिळणारा आलू आता ४० रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. अन्य भाज्यांच्या किंमतीही पाच ते १० रुपयांनी वाढविण्यात आल्याने गृहीणींचे बजेट बिघडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या