शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहती नावालाच

By admin | Updated: January 6, 2015 23:09 IST

जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना स्थर्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात आता उद्योगांशिवाय पर्याय नाही. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग

यवतमाळ : जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना स्थर्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात आता उद्योगांशिवाय पर्याय नाही. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग व्यवस्था अतिशय निराशाजनक आहे. औद्योगिक वसाहती ओसाड पडल्या आहे. सोयी-सुविधांअभावी येथे उद्योग सुरू करण्यास कोणीही इच्छूक असल्याचे दिसून येत नाही.यवतमाळ, पुसद, वणी या तीन औद्योगिक वसाहती सोडल्यास जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये उद्योग नसल्यासारखेच आहेत. उल्लेखनीय असा एकही उद्योग कार्यरत नसल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. एमआयडीसीसाठी जागा राखीव आहे. भूखंडही पडले आहे. काही ठिकाणी ते वितरितही करण्यात आले आहे. परंतु वीज, पाणी, रस्ते आणि उद्योगासाठी लागणारे पोषक वातावरणच नसल्यामुळे कुणीही मोठा उद्योजक आपला उद्योग सुरू करण्यास तयार नाही. या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडदेखील सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांची इच्छा असूनही ते छोटा-मोठा व्यवसाय सुरू करत नाही. दारव्हा येथे लघु औद्योगिक क्षेत्राचे १०.२६ हेक्टर आर औद्योगिक क्षेत्र असून केवळ ६.०३ हेक्टर क्षेत्रातील भूखंड वितरित करण्यात आले आहे. येथे सध्या छोटे-मोठे दहा उद्योग सुरू असून गेल्या काही वर्षात पाच उद्योग बंद पडले आहे. दिग्रस लघु एमआयडीसीत १८.३२ हेक्टर आर विकसित क्षेत्र असले तरी केवळ ०.६८ हेक्टर आर क्षेत्र वाटप झाले आहे आणि येथे सुरू असलेला एकमेव उद्योगही अनेक वर्षांपूर्वी बंद पडला. घाटंजी लघु औद्योगिक क्षेत्र हे ९.५ हेक्टर आरचे आहे. त्यातील ४.३७ क्षेत्रातील भूखंड वितरित केले असून येथे केवळ पाच उद्योग कसेबसे तग धरून आहे. महागाव लघु औद्योगिक वसाहत ७.९७ हेक्टर आर क्षेत्राचे असून येथे केवळ ०.६२ मधील एकच भूखंड वितरित करण्यात आला आहे. आणि केवळ एकच उद्योग सुरू आहे. मारेगाव औद्योगिक वसाहत केवळ नावालाच आहे. १०.४५ हेक्टर आर जागा विकसित केली असली तरी पुढे कोणती प्रक्रिया येथे राबविण्यात आली नसल्याने उद्योगच नाही. पांढरकवड्याचीही अशीच परिस्थिती आहे. इतर ठिकाणी तर केवळ एमआयडीसीची फलक लागले आहे तर काही ठिकाणी ते फलक कोणी काढून नेले, हे सुद्धा संबंधित विभागाला माहीत नाही. नाही म्हणायला यवतमाळ येथे १४०, पुसद २२, वणी ४२ आणि उमरखेड येथे १५ उद्योग सुरू आहे. परंतु यातूनही फार मोठा रोजगार उपलब्ध झालेला नाही. आवश्यक त्या सोयी-सुविधांअभावी एमआयडीसी क्षेत्र बकाल झाले आहे. तर आर्णी, नेर, राळेगाव येथे औद्योगिक क्षेत्र नव्याने सुरू करण्याची गरज आहे. याकडे राज्यात सत्तांतरानंतर आलेल्या नवीन उद्योग मंत्र्यांनी लक्ष दिल्याशिवाय जिल्ह्यातील औद्योगिक विकास होणे शक्य नसल्याचेच दिसून येत आहे. (प्रतिनिधी)