शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

औद्योगिक वसाहती नावालाच

By admin | Updated: January 6, 2015 23:09 IST

जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना स्थर्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात आता उद्योगांशिवाय पर्याय नाही. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग

यवतमाळ : जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना स्थर्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात आता उद्योगांशिवाय पर्याय नाही. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग व्यवस्था अतिशय निराशाजनक आहे. औद्योगिक वसाहती ओसाड पडल्या आहे. सोयी-सुविधांअभावी येथे उद्योग सुरू करण्यास कोणीही इच्छूक असल्याचे दिसून येत नाही.यवतमाळ, पुसद, वणी या तीन औद्योगिक वसाहती सोडल्यास जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये उद्योग नसल्यासारखेच आहेत. उल्लेखनीय असा एकही उद्योग कार्यरत नसल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. एमआयडीसीसाठी जागा राखीव आहे. भूखंडही पडले आहे. काही ठिकाणी ते वितरितही करण्यात आले आहे. परंतु वीज, पाणी, रस्ते आणि उद्योगासाठी लागणारे पोषक वातावरणच नसल्यामुळे कुणीही मोठा उद्योजक आपला उद्योग सुरू करण्यास तयार नाही. या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडदेखील सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांची इच्छा असूनही ते छोटा-मोठा व्यवसाय सुरू करत नाही. दारव्हा येथे लघु औद्योगिक क्षेत्राचे १०.२६ हेक्टर आर औद्योगिक क्षेत्र असून केवळ ६.०३ हेक्टर क्षेत्रातील भूखंड वितरित करण्यात आले आहे. येथे सध्या छोटे-मोठे दहा उद्योग सुरू असून गेल्या काही वर्षात पाच उद्योग बंद पडले आहे. दिग्रस लघु एमआयडीसीत १८.३२ हेक्टर आर विकसित क्षेत्र असले तरी केवळ ०.६८ हेक्टर आर क्षेत्र वाटप झाले आहे आणि येथे सुरू असलेला एकमेव उद्योगही अनेक वर्षांपूर्वी बंद पडला. घाटंजी लघु औद्योगिक क्षेत्र हे ९.५ हेक्टर आरचे आहे. त्यातील ४.३७ क्षेत्रातील भूखंड वितरित केले असून येथे केवळ पाच उद्योग कसेबसे तग धरून आहे. महागाव लघु औद्योगिक वसाहत ७.९७ हेक्टर आर क्षेत्राचे असून येथे केवळ ०.६२ मधील एकच भूखंड वितरित करण्यात आला आहे. आणि केवळ एकच उद्योग सुरू आहे. मारेगाव औद्योगिक वसाहत केवळ नावालाच आहे. १०.४५ हेक्टर आर जागा विकसित केली असली तरी पुढे कोणती प्रक्रिया येथे राबविण्यात आली नसल्याने उद्योगच नाही. पांढरकवड्याचीही अशीच परिस्थिती आहे. इतर ठिकाणी तर केवळ एमआयडीसीची फलक लागले आहे तर काही ठिकाणी ते फलक कोणी काढून नेले, हे सुद्धा संबंधित विभागाला माहीत नाही. नाही म्हणायला यवतमाळ येथे १४०, पुसद २२, वणी ४२ आणि उमरखेड येथे १५ उद्योग सुरू आहे. परंतु यातूनही फार मोठा रोजगार उपलब्ध झालेला नाही. आवश्यक त्या सोयी-सुविधांअभावी एमआयडीसी क्षेत्र बकाल झाले आहे. तर आर्णी, नेर, राळेगाव येथे औद्योगिक क्षेत्र नव्याने सुरू करण्याची गरज आहे. याकडे राज्यात सत्तांतरानंतर आलेल्या नवीन उद्योग मंत्र्यांनी लक्ष दिल्याशिवाय जिल्ह्यातील औद्योगिक विकास होणे शक्य नसल्याचेच दिसून येत आहे. (प्रतिनिधी)