शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारताची अर्थव्यवस्थाही श्रीलंकेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 21:13 IST

Yawatmal News मजूबत लोकशाहीसाठी विरोधी पक्ष जिवंत असणे गरजेचे आहे, मात्र विविध यंत्रणांचा वापर करून ठरवून कारवाई केली जात असल्याने सध्या विरोधी पक्षच दहशतीत आल्याचे ज्येष्ठ पत्रकार आशुतोष म्हणाले.

ठळक मुद्देदेशातील विरोधी पक्ष दहशतीत

यवतमाळ : देश काँग्रेसमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. याचाच अर्थ देशातील विरोधी पक्ष सरकारला संपवून टाकायचा आहे. मजूबत लोकशाहीसाठी विरोधी पक्ष जिवंत असणे गरजेचे आहे, मात्र विविध यंत्रणांचा वापर करून ठरवून कारवाई केली जात असल्याने सध्या विरोधी पक्षच दहशतीत आल्याचे ज्येष्ठ पत्रकार आशुतोष म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक असून भारतही श्रीलंकेच्या मार्गावर असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने यवतमाळमध्ये समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने व्याख्यानासाठी आले असता आशुतोष यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशुतोष यांनी चिंता व्यक्त केली. आणीबाणीच्या काळातही नव्हती अशी केविलवाणी परिस्थिती सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची झाली आहे. एकप्रकारे देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. श्रीलंकेची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने कोसळली, त्याच मार्गावरून भारताचीही वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले. देशातील राजकीय वातावरणाबाबतही आशुतोष यांनी चिंता व्यक्त केली.

समाज माध्यमाचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी केला जात आहे. याच बाबी चांगल्या कशा आहेत, हे या माध्यमाद्वारे ठसविले जात आहे. त्याच वेळी प्रसार माध्यमांवरही सरकारने नियंत्रण ठेवले असून त्यामुळेच देशातील बेरोजगारी, महागाईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या जीवन-मरणाच्या विषयावर साधी चर्चाही होत नाही. देशाच्या उत्पन्नाचा दर चिंताजनक पातळीवर खालावला आहे. मात्र सरकारला त्याचेही देणेघेणे नसल्याचे दिसते. देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्षाची गरज असते. मात्र भाजपाविरोधात असलेल्यांवर ईडीसारख्या संस्थांद्वारे कारवाई करून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा एकमुखी कार्यक्रम सुरु आहे. भाजपातील सर्वच नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आप पक्षाने दिल्लीनंतर पंजाब राज्यातही विजय मिळविला आहे. त्यासाठी आपने आठ वर्ष कठोर मेहनत केली. केंद्र सरकारकडून सध्या २०२४ ची ट्रायल सुरू आहे. देशात त्यामुळेच धार्मिक विद्वेष पेरला जात आहे. त्याद्वारे पुन्हा सत्ता मिळवू, असा भाजपचा कयास आहे. मात्र पुढील दोन वर्ष अत्यंत महत्त्वाची असून, या दोन वर्षातील घडामोडीच २०२४ चे भवितव्य ठरवितील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिक