शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

‘रेमण्ड’ कामगारांना वेतनवाढ

By admin | Updated: October 24, 2016 01:02 IST

लोहारा येथील एमआयडीसी परिसरातील ‘रेमण्ड’ उद्योग समूहातील कामगारांना व्यवस्थापनाने भरीव वेतन वाढ देऊन त्यांच्या दिवाळी सणासाठी बोनस

७०५० रूपये : आंदोलनामुळे लाखोंचे नुकसान झाल्याची माहितीयवतमाळ : लोहारा येथील एमआयडीसी परिसरातील ‘रेमण्ड’ उद्योग समूहातील कामगारांना व्यवस्थापनाने भरीव वेतन वाढ देऊन त्यांच्या दिवाळी सणासाठी बोनस व अग्रीम देण्याचीही सोय केली आहे. तथापि काही कामगार आंदोलन करीत असल्याने व्यवस्थापनाला दरररोज किमान ४० लाखांचे नुकसान सोसावे लागत आहे.गेल्या २० वर्षांपूर्वी यवतमाळात लोहारा एमआयडीसी परिसरात देशातील प्रसिद्ध ‘रेमण्ड’ उद्योग समूहाने व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. सध्या या उद्योगात जवळपास चार हजार कर्मचारी कार्यरत आहे. कंपनी प्रशासन दर चार वर्षांनी मान्यताप्राप्त कामगार संघटनेसोबत वाटाघाटी करून वेतन वाढ निश्चित करते. गेल्या ३१ मार्च २०१६ रोजी जुना वेतन करार संपुष्टात आला होता. त्यामुळे गेले काही महिने संघटनेसोबत वेतन कराराच्या वाटाघाटी सुरू होत्या. अमरावतीचे कामगार आयुक्त आर. बी. आडे याच्या उपस्थितीत कंपनी प्रशासन आणि कामगार अधिकृत संघटनेत वेतन कराराबाबत चर्चा झाली. यात कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर कंपनीने कामगारांना सात हजार ५० रूपयांची भरीव वाढ देण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अशा इतर सहा उद्योगांसह विदर्भच नव्हे, तर राज्यातही इतर कुठेही ‘रेमण्ड’च्या कामगारांएवढे वेतन कामगारांना मिळत नाही. मात्र कंपनीतील काही मूठभर कामगारांचा या वेतनवाढीला विरोध असल्याने गेले दोन दिवस संकट निर्माण झाले आहे. काही कामगारांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे कंपनीचे दरदिवशी किमान ४० लाखांचे नुकसान होत आहे. (शहर प्रतिनिधी)कंपनीतर्फे पुरविल्या जातात सुविधाकंपनीतर्फे कामगारांना इतर सुविधाही पुरविल्या जातात. यात केवळ ३ रूपये ५० पैशात जेवण, ५० पैशात चहा, ५० पैशात नाश्ता देण्यात येतो. याशिवाय दोन गणवेश दिले जातात. दिवाळीसाठी १३.५ टक्के बोनसही देण्यात येणार आहे. १० हजार रूपये बिनव्याजी अग्रीमही देण्यात येते. विविध सुट्या आहेत. एक लाख रूपयांचा विमा काढण्यात आला आहे. मात्र मूठभर कामगारांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचे संचालक गौतम सिंघानिया येथे आले होते. त्यामुळे काही कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले होते. त्यामुळे त्यांनी येथे येऊ घातलेला कोट्यवधी रूपयांचा ‘स्ट्रेचिंग’ प्रकल्प इतरत्र हलविला होता. आताही काही कामगार आंदोलन करीत असल्याने प्रकल्प कालांतराने बंद करावा काय, असा विचार व्यवस्थापनाच्या मनात घोळत असल्याची माहिती प्राप्त झाली.