शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

‘रेमण्ड’ कामगारांना वेतनवाढ

By admin | Updated: October 24, 2016 01:02 IST

लोहारा येथील एमआयडीसी परिसरातील ‘रेमण्ड’ उद्योग समूहातील कामगारांना व्यवस्थापनाने भरीव वेतन वाढ देऊन त्यांच्या दिवाळी सणासाठी बोनस

७०५० रूपये : आंदोलनामुळे लाखोंचे नुकसान झाल्याची माहितीयवतमाळ : लोहारा येथील एमआयडीसी परिसरातील ‘रेमण्ड’ उद्योग समूहातील कामगारांना व्यवस्थापनाने भरीव वेतन वाढ देऊन त्यांच्या दिवाळी सणासाठी बोनस व अग्रीम देण्याचीही सोय केली आहे. तथापि काही कामगार आंदोलन करीत असल्याने व्यवस्थापनाला दरररोज किमान ४० लाखांचे नुकसान सोसावे लागत आहे.गेल्या २० वर्षांपूर्वी यवतमाळात लोहारा एमआयडीसी परिसरात देशातील प्रसिद्ध ‘रेमण्ड’ उद्योग समूहाने व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. सध्या या उद्योगात जवळपास चार हजार कर्मचारी कार्यरत आहे. कंपनी प्रशासन दर चार वर्षांनी मान्यताप्राप्त कामगार संघटनेसोबत वाटाघाटी करून वेतन वाढ निश्चित करते. गेल्या ३१ मार्च २०१६ रोजी जुना वेतन करार संपुष्टात आला होता. त्यामुळे गेले काही महिने संघटनेसोबत वेतन कराराच्या वाटाघाटी सुरू होत्या. अमरावतीचे कामगार आयुक्त आर. बी. आडे याच्या उपस्थितीत कंपनी प्रशासन आणि कामगार अधिकृत संघटनेत वेतन कराराबाबत चर्चा झाली. यात कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर कंपनीने कामगारांना सात हजार ५० रूपयांची भरीव वाढ देण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अशा इतर सहा उद्योगांसह विदर्भच नव्हे, तर राज्यातही इतर कुठेही ‘रेमण्ड’च्या कामगारांएवढे वेतन कामगारांना मिळत नाही. मात्र कंपनीतील काही मूठभर कामगारांचा या वेतनवाढीला विरोध असल्याने गेले दोन दिवस संकट निर्माण झाले आहे. काही कामगारांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे कंपनीचे दरदिवशी किमान ४० लाखांचे नुकसान होत आहे. (शहर प्रतिनिधी)कंपनीतर्फे पुरविल्या जातात सुविधाकंपनीतर्फे कामगारांना इतर सुविधाही पुरविल्या जातात. यात केवळ ३ रूपये ५० पैशात जेवण, ५० पैशात चहा, ५० पैशात नाश्ता देण्यात येतो. याशिवाय दोन गणवेश दिले जातात. दिवाळीसाठी १३.५ टक्के बोनसही देण्यात येणार आहे. १० हजार रूपये बिनव्याजी अग्रीमही देण्यात येते. विविध सुट्या आहेत. एक लाख रूपयांचा विमा काढण्यात आला आहे. मात्र मूठभर कामगारांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचे संचालक गौतम सिंघानिया येथे आले होते. त्यामुळे काही कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले होते. त्यामुळे त्यांनी येथे येऊ घातलेला कोट्यवधी रूपयांचा ‘स्ट्रेचिंग’ प्रकल्प इतरत्र हलविला होता. आताही काही कामगार आंदोलन करीत असल्याने प्रकल्प कालांतराने बंद करावा काय, असा विचार व्यवस्थापनाच्या मनात घोळत असल्याची माहिती प्राप्त झाली.