शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील घटनेने मानवता कलंकित; यवतमाळमध्ये उसळला जनआक्रोश

By विशाल सोनटक्के | Updated: August 9, 2023 17:42 IST

केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका

यवतमाळ : महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याची मणिपूरमधील घटना मानवता कलंकित करणारी आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु राज्य घटनेने दिलेल्या या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करीत सर्वसामान्यांचे जगणेच हिरावून घेतले जात असल्याच्या भावना व्यक्त करीत मोर्चेकऱ्यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. लोकशाहीमध्ये नागरिकांचे संरक्षण करणे ही सरकारची प्रमुख जबाबदारी असताना आणि काही महिन्यांपासून हिंसाचार धुमसत असताना केंद्र शासन गप्प का आहे, असा परखड सवालही मोर्चेकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून केला.

जिल्ह्यातील विविध पुरोगामी संस्था, संघटना तसेच विविध पक्षांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आझाद मैदान येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह महिला, विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय होती. एलआयसी चौकात पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

सलग तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. केंद्र शासनाच्या नाकर्त्याभूमिकेमुळे मणिपूरसह अनेक ठिकाणची कायदा सुव्यवस्था आणि घटनात्मक यंत्रणा कोलमडल्याचा आरोप करीत मणिपूरच्या राज्य सरकारने हिंसाचार थांबविण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज असताना हे सरकारही मुग गिळून गप्प आहे. उलट केंद्राच्या दुटप्पी भूमिकेमुळेच मणिपूरमधील हिंसाचार भडकल्याचा आरोप करीत केंद्राने चौकशीसाठी पथके पाठविली नाहीत. इंटरनेट सेवा बंद करून अत्याचारग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि वांशिक संघर्ष भडकण्यासाठी तेल ओतल्याची खरमरीत टीका यावेळी केंद्र शासनावर करण्यात आली.

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा

मणिपूरमध्ये आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली. तेव्हा तेथील स्थानिक पोलिस काय करीत होते. घटनेच्या १४ दिवसानंतर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. या गंभीर घटनेत गुन्हा नोंदविण्यास उशीर का केला, गुन्हा नोंदविल्यानंतर उशिराने तो न्याय दंडाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. इथेही पोलिसांनी हलगर्जीपणा का दाखविला, अत्याचार रोखण्यासाठी केंद्र आणि मणिपूर सरकारने काय केले, आदी प्रश्न उपस्थित करीत मोर्चेकऱ्यांनी मणिपूर राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

या संघटनांनी मोर्चात घेतला सहभाग

बुधवारी निघालेल्या विराट जनआक्रोश मोर्चात स्त्री अत्याचार विरोधी संघर्ष समिती, अनुसूचित जाती जमाती अखिल भारतीय परिसंघ, समता पर्व प्रतिष्ठान, जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती, बानाई यवतमाळ, उलगुलान संघटना, ट्रायबल फोरम, नया संघटना, आदिवासी विकास परिषद, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, बिरसा ब्रिगेड, महाराष्ट्र ऑफीसर फोरम, शेतकरी मजूर एल्गार परिषद, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), संभाजी ब्रिगेड, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), राहूल गांधी ब्रिगेड, सावित्रीमाई फुले महिला मंडळ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, आम आदमी पार्टी, पॅंथर सेना, भीम टायगर सेना, शामादाद कोलाम ब्रिगेड, शेतकरी वारकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी, जमाते इस्लामी हिंद, सेवानिवृत्त पोलिस संघटना, युवा शक्ती संघटना, विदर्भ मातंग युवक संघटना, कास्ट्राईब संघटना, ज्योतीबा दिनबंधू कल्याण मंडळ, आंबेडकरी जनआक्रोश मोर्चा यवतमाळ, आंबेडकरी कलावंत आदींचा या मोर्चात प्रमुख सहभाग होता.

टॅग्स :agitationआंदोलनManipur Violenceमणिपूर हिंसाचारYavatmalयवतमाळ