शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

एसटी चालकांना अपघात टाळण्यास प्रोत्साहन योजना : २० हजारापर्यंतची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:34 IST

Yavatmal : विना अपघात सेवेबद्दल एसटी चालकांना विशेष बक्षीस

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली एसटी महामंडळाची अपघातविरहित सेवा बक्षीस योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व चालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेच्या माध्यमातून चालकांना २० हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च, असा या योजनेचा कालावधी राहणार आहे. यासाठी चालकांना २६० दिवस विना अपघात सेवा द्यावी लागणार आहे.

एसटी बसला अपघाताच्या संख्येत २०२० ते २०२४ या पाच वर्षात मोठी वाढ झाली. शिवाय अपघात नुकसान भरपाईची रक्कमही वाढली. तसेच एसटीची प्रतिमा नकारात्मक होऊ लागली. म्हणूनच अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 

वर्धापनदिनी गौरवअपघातविरहित सेवा देऊन बक्षिसाकरिता पात्र ठरलेल्या चालकांचा महामंडळाचा वर्धापन दिन (१ जून) किंवा १५ ऑगस्ट रोजी बक्षीस देऊन गौरव केला जाणार आहे. 

बक्षिसाचे असे आहेत टप्पे

  • अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांसाठी बक्षिसाचे विविध टप्पे पाडण्यात आले आहेत.
  • चालकाने एक वर्षात २६० दिवस (स्टेअरिंग ड्यूटी) अपघातविरहित सेवा दिल्यास १,५०० रुपये बक्षीस मिळणार आहे.
  • सन २०२५-२६ची गणना १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ राहणार आहे. पाच वर्षे अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांना ५ हजार रुपये, १० वर्षांकरिता १० हजार, १५ वर्षांकरिता १५ हजार आणि २० वर्षे अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांना २० हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना