शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

दिवाळीत सहा हजार किलो खव्याची आयात

By admin | Updated: October 27, 2016 00:58 IST

दिवाळीच्या काळात जिल्ह्याला मिठाईसाठी लागणारा सुमारे सहा हजार किलो खवा मध्यप्रदेश, गुजरात, गोंदियामधून आयात केला जातो.

मिठाईच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : ‘एफडीए’ला भेसळच दिसेना ! म्हणे, सर्वत्र आलबेलयवतमाळ : दिवाळीच्या काळात जिल्ह्याला मिठाईसाठी लागणारा सुमारे सहा हजार किलो खवा मध्यप्रदेश, गुजरात, गोंदियामधून आयात केला जातो. परंतु या खव्याची पर्यायाने त्यापासून बनणाऱ्या मिठाईची गुणवत्ता काय याबाबत प्रश्नचिन्ह लावले जात आहे. कारण या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणाऱ्या अन्न व औषधी प्रशासन विभागाला आजपर्यंत भेसळ आढळून आलेली नाही. त्यामुळे या विभागाच्या ‘कामगिरी’कडे संशयाने पाहिले जात आहे. पूर्वी ग्रामीण भागात व शहरालगतच्या गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे होती. त्यानंतरही दूध कमी पडत होते. आज लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. शहरांचाच नव्हे तर गावांचाही विस्तार झाला आहे. त्या तुलनेत चारा-पाणीटंचाईमुळे जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुधाच्या मागणीत वाढ आणि पुरवठ्यात प्रचंड घट झाल्याने तफावत निर्माण झाली आहे. त्यानंतरही दूध येते कोठून हा प्रश्न कायम आहे. येणारे दूध हे भेसळ करून आणले जात असावे, अशी दाट शक्यता आहे. चहाला व लहान मुलांना पिण्यासाठी दूध कमी पडत असताना मिठाईसाठी खवा बनवायला एवढे दूध येते कोठून हा अन्न व औषधी प्रशासनासाठी संशोधनाचा विषय ठरला आहे. केवळ दिवाळी या सणाचा विचार केल्यास यवतमाळ जिल्ह्यात तब्बल सहा हजार किलो खवा लागतो. जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन मर्यादित असल्याने गुजरात, मध्यप्रदेशातील इंदोर, गोंदिया, अहमदनगर, पुसद, उमरखेड या भागातून जिल्ह्यात खवा आणला जातो. हा खवा पाच ते सहा दिवस टिकतो. परंतु तो अधिक काळ टिकावा, आंबूसपणा येऊ नये म्हणून त्यात साखर टाकली जाते. दूध पावडरपासून खवा बनविला जातो. त्यावर मलाई येत नसल्याने तो अधिक काळ टिकतो. खवा दीर्घकाळ टिकविण्यासाठी आरोग्याला घातक असलेल्या आरारोड पावडरचासुद्धा त्यात वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. दसरा ते दिवाळी या काळात दुधाची प्रचंड मागणी राहत असल्याने मिठाई कारखान्यांना बाहेरच्या खव्यावर अवलंबून रहावे लागते. बहुतांश मिठाईवाले ‘आमचे स्वत:चे दूध संकलन केंद्र आहे’ असे सांगतात. परंतु प्रत्यक्षात अशा दूध संकलकांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याऐवढी आहे. गाई-म्हशीच्या एकूणच दुधाचे गणित पाहता बाहेरुन येणारा हा खवासुद्धा किती शुद्ध असेल याची शंका येते. पर्यायाने अनेक दुकानांमधून मिळणाऱ्या मिठाईच्या गुणवत्तेभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. अनेक दुकानांमध्ये ही मिठाई बनविण्यासाठी खास राजस्थान, इंदोर, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल येथून कारागीर बोलविले जातात. बहुतांश मिठाई विक्रेते ‘आम्ही बाहेरुन खवा आणत नाही, आमच्याकडे संकलित होणाऱ्या दुधात शक्य असेल तेवढीच मिठाई बनवितो’ असे सांगून शुद्धतेचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात ‘वास्तव’ मात्र वेगळेच आहे. खवा व पर्यायाने मिठाईमध्ये होणाऱ्या भेसळीला अन्न व औषधी प्रशासनाचाही हातभार लागत असल्याचे त्यांच्या ‘कामगिरी’वरून दिसून येते. यंदाच्या दिवाळीत या विभागाने दुग्धजन्य पदार्थांचे १२ नमुने घेतले. मात्र त्यात भेसळ आहे की नाही, याचा अहवाल अद्याप अमरावतीच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झाला नाही. आजतागायत कुठेच मिठाईमध्ये भेसळ आढळली नसल्याचे येथील सहायक आयुक्तांनी (अन्न) ‘लोकमत’ला सांगितले. खवा टिकविण्यासाठी स्टार्च, आरारोड मिसळविला जातो. खवा चार डिग्री तापमानावर ठेवल्यास अधिक काळ टिकतो. मात्र हा खवा किती दिवस टिकू शकतो, याचे कोणतेही निकष नाहीत. ग्राहकांनी घरी नेल्यावर खव्याचा तातडीने उपयोग करावा, मिठाई २४ तासात वापरावी अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता असते, असा इशारा अन्न व औषधी प्रशासन विभागाने दिला आहे. (शहर वार्ताहर)