शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

३० लाख कापूस गाठींची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:40 IST

यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदर घसरण्याचा धोका शेतकरी अभ्यासकांचे पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशा आशयाचे पत्र शेतकरी अभ्यासक विजय जावंधीया यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे.यावर्षी राज्यात ४१ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही लागवड पाच लाख हेक्टरने अधिक आहे. यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. याच सुमारास दाक्षिणात्य व्यापाऱ्यांच्या लॉबीने ३० लाख कापूस गाठींची आयात केली. यामुळे हंगामात कापसाचे दर कोसळण्याचा धोका आहे. यावर वेळेपूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.यामध्ये कापसाला देशात आयात करण्यासाठी शून्य दर आयात कर आहे. हा दर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय कापूस निर्यात करताना अनुदान देण्यात यावे, कापसाचा बफर स्टॉक करण्यासाठी शून्य टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन द्यावे, कापसाला एक हजार रुपयांचा बोनस द्यावा, मोठ्या प्रमाणात हमी केंद्र उघडण्यात यावे असे केले तरच शेतकऱ्यांना हमी दराच्या बरोबरीने खुल्या बाजारात कापसाचे दर मिळतील. यासाठी हंगामापूर्वीच उपाययोजना कराव्या, असे पत्र विजय जावंधीया यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे. गतवर्षी राज्यभरात ६० शासकीय संकलन केंद्र उघडण्यात आले होते. हमीदरापेक्षा जादा दर बाजारात असल्याने या केंद्रावर कापूस आला नाही. मात्र यावर्षी त्याच्या विपरित चित्र निर्माण होण्याचा धोका आहे. यासाठी आधीच उपाययोजना करण्याची मागणी जावंधीया यांनी केली आहे.

हमी दर मिळण्याची शाश्वती नाहीयावर्षीच्या हंगामात केंद्र शासनाने कापसाला क्ंिवटलमागे १०० रुपयांची वाढ सूचविली. हा दर पाच हजार ५५० रुपये क्ंिवटल असणार आहे. कापसाची आयात, रुईचे घसरलेले दर, सरकीच्या घसरलेल्या किंमती, यामुळे कापसाला हमी दरही मिळणे अवघड आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हमी केंद्र मोठ्या प्रमाणात उघडावे लागणार आहे. इतकेच नव्हेतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीची व्यवस्थाही ठेवावी लागणार आहे.कापसाला चांगला दर मिळावा आणि कापसू उत्पादक शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे, याच मुख्य उद्देशाने पंतप्रधानांना पत्र पाठविले. या पत्राची पंतप्रधान दखल घेतील, अशी अपेक्षा आहे.- विजय जावंधियाशेतकरी नेते

टॅग्स :agricultureशेती