शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

३० लाख कापूस गाठींची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:40 IST

यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदर घसरण्याचा धोका शेतकरी अभ्यासकांचे पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशा आशयाचे पत्र शेतकरी अभ्यासक विजय जावंधीया यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे.यावर्षी राज्यात ४१ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही लागवड पाच लाख हेक्टरने अधिक आहे. यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. याच सुमारास दाक्षिणात्य व्यापाऱ्यांच्या लॉबीने ३० लाख कापूस गाठींची आयात केली. यामुळे हंगामात कापसाचे दर कोसळण्याचा धोका आहे. यावर वेळेपूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.यामध्ये कापसाला देशात आयात करण्यासाठी शून्य दर आयात कर आहे. हा दर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय कापूस निर्यात करताना अनुदान देण्यात यावे, कापसाचा बफर स्टॉक करण्यासाठी शून्य टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन द्यावे, कापसाला एक हजार रुपयांचा बोनस द्यावा, मोठ्या प्रमाणात हमी केंद्र उघडण्यात यावे असे केले तरच शेतकऱ्यांना हमी दराच्या बरोबरीने खुल्या बाजारात कापसाचे दर मिळतील. यासाठी हंगामापूर्वीच उपाययोजना कराव्या, असे पत्र विजय जावंधीया यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे. गतवर्षी राज्यभरात ६० शासकीय संकलन केंद्र उघडण्यात आले होते. हमीदरापेक्षा जादा दर बाजारात असल्याने या केंद्रावर कापूस आला नाही. मात्र यावर्षी त्याच्या विपरित चित्र निर्माण होण्याचा धोका आहे. यासाठी आधीच उपाययोजना करण्याची मागणी जावंधीया यांनी केली आहे.

हमी दर मिळण्याची शाश्वती नाहीयावर्षीच्या हंगामात केंद्र शासनाने कापसाला क्ंिवटलमागे १०० रुपयांची वाढ सूचविली. हा दर पाच हजार ५५० रुपये क्ंिवटल असणार आहे. कापसाची आयात, रुईचे घसरलेले दर, सरकीच्या घसरलेल्या किंमती, यामुळे कापसाला हमी दरही मिळणे अवघड आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हमी केंद्र मोठ्या प्रमाणात उघडावे लागणार आहे. इतकेच नव्हेतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीची व्यवस्थाही ठेवावी लागणार आहे.कापसाला चांगला दर मिळावा आणि कापसू उत्पादक शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे, याच मुख्य उद्देशाने पंतप्रधानांना पत्र पाठविले. या पत्राची पंतप्रधान दखल घेतील, अशी अपेक्षा आहे.- विजय जावंधियाशेतकरी नेते

टॅग्स :agricultureशेती