शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

३० लाख कापूस गाठींची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:40 IST

यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदर घसरण्याचा धोका शेतकरी अभ्यासकांचे पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशा आशयाचे पत्र शेतकरी अभ्यासक विजय जावंधीया यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे.यावर्षी राज्यात ४१ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही लागवड पाच लाख हेक्टरने अधिक आहे. यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. याच सुमारास दाक्षिणात्य व्यापाऱ्यांच्या लॉबीने ३० लाख कापूस गाठींची आयात केली. यामुळे हंगामात कापसाचे दर कोसळण्याचा धोका आहे. यावर वेळेपूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.यामध्ये कापसाला देशात आयात करण्यासाठी शून्य दर आयात कर आहे. हा दर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय कापूस निर्यात करताना अनुदान देण्यात यावे, कापसाचा बफर स्टॉक करण्यासाठी शून्य टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन द्यावे, कापसाला एक हजार रुपयांचा बोनस द्यावा, मोठ्या प्रमाणात हमी केंद्र उघडण्यात यावे असे केले तरच शेतकऱ्यांना हमी दराच्या बरोबरीने खुल्या बाजारात कापसाचे दर मिळतील. यासाठी हंगामापूर्वीच उपाययोजना कराव्या, असे पत्र विजय जावंधीया यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे. गतवर्षी राज्यभरात ६० शासकीय संकलन केंद्र उघडण्यात आले होते. हमीदरापेक्षा जादा दर बाजारात असल्याने या केंद्रावर कापूस आला नाही. मात्र यावर्षी त्याच्या विपरित चित्र निर्माण होण्याचा धोका आहे. यासाठी आधीच उपाययोजना करण्याची मागणी जावंधीया यांनी केली आहे.

हमी दर मिळण्याची शाश्वती नाहीयावर्षीच्या हंगामात केंद्र शासनाने कापसाला क्ंिवटलमागे १०० रुपयांची वाढ सूचविली. हा दर पाच हजार ५५० रुपये क्ंिवटल असणार आहे. कापसाची आयात, रुईचे घसरलेले दर, सरकीच्या घसरलेल्या किंमती, यामुळे कापसाला हमी दरही मिळणे अवघड आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हमी केंद्र मोठ्या प्रमाणात उघडावे लागणार आहे. इतकेच नव्हेतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीची व्यवस्थाही ठेवावी लागणार आहे.कापसाला चांगला दर मिळावा आणि कापसू उत्पादक शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे, याच मुख्य उद्देशाने पंतप्रधानांना पत्र पाठविले. या पत्राची पंतप्रधान दखल घेतील, अशी अपेक्षा आहे.- विजय जावंधियाशेतकरी नेते

टॅग्स :agricultureशेती