शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

न्यायालयाच्या आदेशाची तब्बल अडीच वर्षांनंतर होतेय अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:53 IST

बेंबळा भूसंपादनाचा मोबदला : ओढवली होती जप्तीची नामुष्की

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, या न्यायालयाच्या काही प्रकरणातील आदेशाची अंमलबजावणी करण्यास शासनाला तब्बल अडीच वर्षाचा कार्यकाळ लागला. आता मोबदल्यासाठी ९७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, मोबदला वेळेत न मिळाल्याने सिंचन प्रकल्पाच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्कीही ओढवली होती.

सिंचन प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्यासाठी शासनाकडून चालढकल ही नित्याची बाब झाली आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी न्यायालयाचे दार ठोठावत आहेत. बेंबळा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही हेच झाले आहे. प्रकल्प आणि कालव्याच्या कामासाठी राळेगाव, मारेगाव, बाभूळगाव, कळंब आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दिवाणी न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ या ठिकाणी याचिका दाखल झाल्या होत्या.

मोबदल्यास विलंब, व्याजाचा भुर्दंडन्यायालयाच्या आदेशानुसार मोबदला देण्यास जितका अधिक विलंब होईल तेवढा अधिक व्याजाचा भुर्दंड सरकारवर बसतो. २७कोटी रुपये बेंबळा प्रकल्पग्रस्तांसाठी मिळाले आहे. यात काही रक्कम व्याजाचीही असल्याची माहिती आहे. मोबदला वेळेत देण्यात विलंब लावला जात असल्याने सिंचन विभागाच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्कीही आली आहे.

४१ हेक्टर क्षेत्राचा वाढीव मोबदलाराळेगाव, मारेगाव, बाभूळगाव, कळंब या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकूण ४१ हेक्टर क्षेत्राचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाल्यानंतर मोबदल्याची रक्कम मिळावी यासाठी वारंवार संबंधित विभागात शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती. बेंबळा कालवे विभागासह इतर विभागानेही निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लावण्यात आल्याने नाराजीचा सूर आहे.

७५ कोटी घेणे होतेन्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचा आदेश केल्यानंतर बेंबळा कालवे विभागाला शेतकऱ्यांना अडीच वर्षांपूर्वी ७५ कोटी रुपये देणे होते. दरम्यानच्या काळात न्यायालयाने आणखी निकाल दिल्याने या रकमेत वाढ झाली आहे. आजच्या स्थितीत बेंबळा कालवे विभागाला ९७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. याचे संबंधित शेतकऱ्यांना तातडीने वितरण केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ