शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशाची तब्बल अडीच वर्षांनंतर होतेय अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:53 IST

बेंबळा भूसंपादनाचा मोबदला : ओढवली होती जप्तीची नामुष्की

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, या न्यायालयाच्या काही प्रकरणातील आदेशाची अंमलबजावणी करण्यास शासनाला तब्बल अडीच वर्षाचा कार्यकाळ लागला. आता मोबदल्यासाठी ९७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, मोबदला वेळेत न मिळाल्याने सिंचन प्रकल्पाच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्कीही ओढवली होती.

सिंचन प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्यासाठी शासनाकडून चालढकल ही नित्याची बाब झाली आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी न्यायालयाचे दार ठोठावत आहेत. बेंबळा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही हेच झाले आहे. प्रकल्प आणि कालव्याच्या कामासाठी राळेगाव, मारेगाव, बाभूळगाव, कळंब आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दिवाणी न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ या ठिकाणी याचिका दाखल झाल्या होत्या.

मोबदल्यास विलंब, व्याजाचा भुर्दंडन्यायालयाच्या आदेशानुसार मोबदला देण्यास जितका अधिक विलंब होईल तेवढा अधिक व्याजाचा भुर्दंड सरकारवर बसतो. २७कोटी रुपये बेंबळा प्रकल्पग्रस्तांसाठी मिळाले आहे. यात काही रक्कम व्याजाचीही असल्याची माहिती आहे. मोबदला वेळेत देण्यात विलंब लावला जात असल्याने सिंचन विभागाच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्कीही आली आहे.

४१ हेक्टर क्षेत्राचा वाढीव मोबदलाराळेगाव, मारेगाव, बाभूळगाव, कळंब या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकूण ४१ हेक्टर क्षेत्राचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाल्यानंतर मोबदल्याची रक्कम मिळावी यासाठी वारंवार संबंधित विभागात शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती. बेंबळा कालवे विभागासह इतर विभागानेही निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लावण्यात आल्याने नाराजीचा सूर आहे.

७५ कोटी घेणे होतेन्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचा आदेश केल्यानंतर बेंबळा कालवे विभागाला शेतकऱ्यांना अडीच वर्षांपूर्वी ७५ कोटी रुपये देणे होते. दरम्यानच्या काळात न्यायालयाने आणखी निकाल दिल्याने या रकमेत वाढ झाली आहे. आजच्या स्थितीत बेंबळा कालवे विभागाला ९७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. याचे संबंधित शेतकऱ्यांना तातडीने वितरण केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ